मुख्य सामग्रीवर वगळा

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करतात असच वाटत. आजोबापण खूप छान असतं हे तेच सांगतात आणि मनात असंख्य भावनांचा कल्लोळ होतो. 'आजोबा' अश्या कित्येक हाक कानावर पडतात आणि धावत येणार ते निरागस रोपट या वठलेल्या झाडास येऊन बिलगतं. घरात छोट्या पावलांनी फिरणार ते बाळ मला स्वतः सोबत घेऊन जात. अगदी राजा राणीच्या कथेथही, आणि मन अगदी पुन्हा माझ्याही बालपणात जातं.
  या आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोप येई पर्यंत आजोबा आणि आजी याच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेलं आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आल. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार  या चिमुकल्या मनावर करताना मी आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. ही जाणीव कदाचित मला माझ्यातील आजोबाला पुन्हा पुन्हा बोलायला भाग पाडते. इकडून तिकडे धावणारी ती छोटी पावले कदाचित माझ्यासारख्या थकलेल्या पावलास स्वतः सोबत धावायला लावतात पण शेवटी वय बोलत आणि थकलेल्या या हाताला त्याचा आधार मागतात. आधार कदाचित कधी थकलेल्या शरीराला नाही तर मनालाही मागतात. त्या छोट्या पावलांनी घरभर फिरताना या आजोबा आणि आजी भोवती फिरावं अस सतत वाटत राहतं.
  हे म्हातारपण एकटं असल तर किती भयाण वाटत हे कधी कधी कळून जातं. एकांतात बसल्यावर कित्येक विचार येतात आणि या नातवाच्या कित्येक खोडकर गोष्टी आठवल्या की सारं काही विसरून जात. आजच्या काळाशी जुळवून घेताना कदाचित आमच्या सारख्या म्हाताऱ्यांची दमछाक होत असेलही पण या नव्या फुलांना कित्येक संस्कारांचा ठेवा द्यायचा आहे ही जाणीव मनात कुठे तरी असते. एक आजोबा किंवा एक आजी ही घरातली वयस्कर व्यक्तीचं नाही तर एक अनुभवी व्यक्तीही असते. आयुष्याच्या शर्यती मध्ये कुठेतरी गुंतल्यावर आपल्या मुलांस योग्य संस्कार झालेच पाहिजेत असे सगळ्याचं आई वडिलांना वाटत पण कदाचित घरातल्या गरजाच इतक्या असतात की वेळ कुठल्या कुठे निघून जाते कळतही नाही. अगदीच दूर जाऊन पहायची गरजही नाही. आज आजोबापण कधी आणि कसे आले कळलेही नाही. कालपर्यंत एक वडील म्हणून भूमिका करताना कित्येक कठोर निर्णय मी घेतले पण आज एक आजोबा झाल्यावर कदाचित तो कठोरपण कुठेतरी राहून गेला आणि त्या नातवां सोबत आपणही पुन्हा लहान व्हावं अस वाटू लागलं आणि ते निरागस चेहरे या आजोबाला अगदी हसत हसत आपलस करून घेऊ लागले. कधी आम्ही कित्येक जुन्या दंतकथा मध्ये हरवून जावू लागलो, कधी नकळत कित्येक उत्तम संस्कार मी त्याच्यावर घडवू लागलो. मग कधी कधी वाटतं की इतकं सुंदर हे आजोबाच  आणि नातवाच नात असताना कुठेतरी ते का विरून जात. वृद्धाश्रमात आपल्या म्हातारपणावर कुढत का बसावं लागत, तर कदाचित तिथे या नात्याला कधी मुक्त अस फुलूचं दिलं नाही अस वाटत.
प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात हे नक्कीच नात फुलू दिलं तर ते सुंदर फुलतं पण फुलयाच्या आधीच जर ते खुडून टाकलं तर कदाचित त्याचं सौंदर्य आपल्याला कळलंच नाही अस म्हणाव लागेल. आजच्या काळात सतत मोबाईल मध्ये डोकं घालून बसणारी लहान मुले कदाचित आजी आणि आजोबा या सुंदर नात्याला मुकतात हे तितकंच खर आहे.  खरतरं त्यांना सांगावसं वाटत की बाळा त्यापेक्षा आपण सुंदर कथेतल्या एखाद्या राजकुमाराला भेटून येऊयात. पण सारच राहतं आणि आजी आणि आजोबा म्हणजे एक म्हातार माणूस एवढीच संकल्पना उरते.
  आजी आणि आजोबा घरात असणारी घरं ही तितकीच सुंदर भासतात हे मात्र नक्की. आपल्याला या वयातही एकही आजार नाही यापेक्षा नातवाने आपल्याला आजोबा म्हणून मारलेली हाक सर्वात जास्त आनंद देऊन जाते यात तिळमात्र ही शंका नाही.त्याच्या दुडक्या पावलांनी घरभर केलेला दंगा कदाचित रेडिओ वर जुनी गाणी लागल्यावर होणाऱ्या आवजापेक्षा ही सुंदर वाटतात हे मात्र खरं. अगदीच अखेर सांगायचं तर आजी आणि आजोबा नावाचं सुंदर पान सर्वांच्याच आयुष्यात असावं हेही तितकंच खरं,

घरभर छोट्या पावलांनी
अगदी मनसोक्त फिरावं
माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच
दुसरं टोक त्यांनी धरावं

कधी द्यावा आधार म्हातारपणात
तर कधी कुशीत यावं
या म्हाताऱ्याला फक्त आता
आपलसं करून घ्यावं

होतील कित्येक संस्कार मनावर
आजोबांचं बोलणं त्यांनी ऐकावं
कधी राजकुमाराच्या कथेत
अगदीच हरवून जावं

चार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा ...!!! एका आजी आणि आजोबाची !!!

✍योगेश

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...