मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही सगळं कस अगदी मजेत असायचं. शहरातल्या सारखं दरवाजा बंद करून घरात बसणं हा प्रकार म्हणजे गावाकड शेजारच्यांना चर्चेला विषय असं व्हायचं. गावातल्या त्या मोठ्या झाडाखाली कित्येक वेळ गप्पा चालायच्या. गावातल्या सुशीच्या लग्नापासून ते तिच्या बाळांतपणा पर्यंत सगळी माहिती थोडी थोडी सांगितली जायची. हो !! पण आपुलकीने बरं का!! शेजारच्या चावडीत खेळत असलेले पोट्टे आईने एकदा तरी तुडवल्या शिवाय घराची वाट धरायचे नाहीत. हे असं रोज व्हायचं. म्हणजे गावात जिवंतपणा होता हे बाकी खरं. शहरातून आलेला माणूस म्हणजे परग्रहावरील एखादा माणूस आपल्या घरी आला आहे अशी त्याची खातिरदारी व्हायची. म्हणजे एकंदरीत काय !! तर आलेला पाहूणा ४ २ किलोने लठ्ठ होऊन जायचा. उगाच नाही खेड्यात चला म्हणायचे बापू..!! असं सारं होत ते आपलं खेड!! राजकारण गेलं चुलीत म्हणत इथले प्रत्येक सण साजरे व्हायचे यात काहीं वाद नाही. आणि २ ४ चुणचुणीत पोर या कार्यक्रमाचं आकर्षण असायचे हे विसरूनही चालत नाही. अगदी गावात पूर्वी तमाशाचा फड आणण्यापासून ते मंदिरात भजन कीर्तन घेणं इथपर्यंत त्याचा सहभाग असायचा. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे , अगदी वेळप्रसंगी आपला विचार न करता समोरच्याचा विचार करणे याला खेड असं म्हणायचं . पण हे सगळं आधी व्हायचं बर का !! पूर्वी !!
  रंगीत चित्रपट आले आणि गावाकडच्या पोरांची डोकी सटकली. शेजारची सुशी लग्न करून सासरी गेली म्हणून महाद्या चार महिने रडकी गाणी ऐकत बसला. नंतर लग्न करून दिलं दुसऱ्या पोरी सोबत आणि ४ पोट्टे झाले बाहद्दराला ते वेगळंच. असो .. पण काळ बदलत गेला. तश्या गावाकडच्या रूपरेषा ही बदलत गेल्या. फक्त गावाकडच्याच असं नाही पण शहरातल्या ही . शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे हे म्हणतात ते काहीं खोट नाही. माणूस बदलतो आणि त्यासोबत त्याच्या गरजाही बदलत जातात.तसे खूप काही बदल होत गेले. संध्याकाळचा वेळेला घराच्या अंगणात तुळशी समोर एक सुंदर दिवा तेवत असायचा. आईने अगदी बजावून सांगायचं, शुभंकरोती म्हणल्या शिवाय रात्रीच जेवण मिळणार नाही बघ तुला.!! आणि मग बहीण भाऊ सगळे मिळून अगदी एका सुरात म्हणायची. रात्रीच्या वेळी रामरक्षा स्तोत्र पठण केल्याशिवाय तर झोपच येत नसायची. कधी कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायच आणि त्या सारखं सुख ते काय असायचं.!! पण ते सारं काळाच्या पडद्याआड गेल. असो !! पण हे सारं आज पुन्हा पाहताना खरंच त्या लहानपणी आपण खर आयुष्य जगलो याच समाधान देऊन जात.
  कित्येक वर्ष सरली आणि आताच्या काळात सगळं कस स्मार्ट झाल. मोबाईल आले , डिश टीव्ही आले..!!ज्या खेड्यात दूरदर्शन शिवाय चॅनल्स माहीत नव्हते तिथे आता लोक कित्येक चॅनल्स पाहू लागले. गाड्या आल्या सारं काही सुख आणि सोई घेऊन आल. पण कित्येक बदलही झाले. म्हणावे तर चांगले बदलही झाले आणि काही वाईटही.!! गावाकडच्या गाडीची वाट पाहणं आता बंद झाल, काही वेळात लोक प्रवास पूर्ण करू लागले. पूर्वी तालुक्याच्या गावाला जायचं म्हणजे गडावर जाऊन आल्यासारखं असायचं, पण आता आले काय गेले काय , काही नाही!! पण बदल झाला. शहरात तर ,लोक कमी आणि गाड्या जास्त झाल्या. रस्त्यावरच्या गाडीची किंमत आहे पण चालणाऱ्या लोकांची नाही अशी अवस्था झाली. रस्ते रुंद झाले आणि इमारती उंच..!! एकाच इमारतीत २० २० कुटुंब राहू लागले, पण कोण कोणाला ओळखत पण नाही अशी अवस्था..!! खेड्यात ही तेच सुरू झाल. मालिका नावाचं भूत साऱ्याच्या मानगुटीवर बसलं..  चुलितली भाकर करपून खाक झाली तरी मालिका बंद होईना अशी परिस्थिती झाली. चावड्या ओस पडल्या. पोट्टे मोबाईल मध्ये गेम खेळण्यात मग्न..!! म्हातारे कित्येक स्वर्गवासी झाले ,जे आहेत ते घराच्या कोपऱ्यात.
   पण परिस्थिती बदलली ती इथेच थांबली नाही. जे तरुण पोर प्रत्येक सणवार एकत्रित येऊन साजरे करायचे ते आता एकमेकांना जातीपातीच्या नजरेतून पाहू लागले. यातून समाजात एक वेगळीच दुफळी निर्माण झाली. खरतर ही आजही सौम्य प्रमाणात आहे .. याचा उद्रेक होण्या अगोदर ही फळी मोडायला हवी हे मात्र खर. राजकारण गेलं चुलीत म्हणारे तरुण राजकारणासाठी भांडू लागले !! खरतर हा बदल नको होता !! पिरावर जाऊन मस्तक ठेवताना जे सुख भेटायचं ते कुठेच नव्हतं.!! गावाच्या देवीच्या जत्रेत सलीम भाईच्या दुकानातली जलेबी आजही तोंडावर गोडी आणते!! बदल व्हावा पण नक्की कसा हे एकदा पाहायला हवं !! टुकार पोरांचे वाढदिवसही चौकाचौकात होऊ लागले. नेतृत्व बदलू लागले. काही चांगले झाले काही वाईट आले ..!! पण लोकांनी काय घ्यावे हे कळेनाच झाले.!! पण हे काही बदल वाईटच झाले.
   अशात आता पुन्हा गावाकडे फिरा किंवा शहरात फिरा वेगळेपण काय फार थोडेच राहिले. आता सगळीकडेच लोक सुधारले !! शहरातल्या सारखं गावाकड सुधा लोक दरवाजे लावून बसू लागले ..!! चावड्या नामशेष झाल्या !! आणि त्यात खेळायला पोरांना वेळ तर मिळायला हवा ना !! शाळा , ट्युशन , एक्स्ट्रा क्लासेस, हे!!  ते,  काय आणि काय !! ७५ वर्षाचा आजोबा अजुन ठणठणीत आहेत आणि या पोरांना कानावर जड होतो आहे इतक्या जड भिंगाचा चष्मा !! !! आणि त्यातून शुभंकरोती विसराच !!! हे पोर twinkle twinkle little star वाले !! त्यामुळे तुळशी समोरचा दिवा वैगेरे यांच्यासाठी संस्कार नाही तर भंमकपणा झाला!!! रागवायची सोय नाही त्यांना, तर आईने तुडवाव कधी !! सारं कस नाजूक झालंय !! पण मुलांना यातून बाहेर काढायला हवं !! Twinkle Twinkle पेक्षा यांना शिवराय आणि संभाजी महाराजांचे धडे द्यायला हवे !! आपली माती , आपला देश याबद्दल त्यांना प्रेम निर्माण करायला हवं हे मात्र नक्की !!असो !! बदल झाला याचा आनंद आहेच !! नवनवीन तंत्रज्ञान आले खूप काही बदलले !! पण आपली संस्कृती , आपले विचार बदलता कामा नये !!
  शेवटी! आपली माती , आपली माणसं !! यातच तर खरा आपलेपणा असतो !! आणि ते जपणं फार गरजेचं असतं !! नाही का ??
 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...