मुख्य सामग्रीवर वगळा

अधुरी प्रित...

'तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस , अनोळखी नजरेस ओळखू शकलो नाही!!' मंदार प्रियाच्या नजरेत नजर रोखुन सगळं बोलतं होता. प्रिया फक्त त्याच्याकडे पहातं होती. तिची ती शांतता त्याला नकोशी वाटतं होती.
'सांग ना मला प्रिया!! हवं तरं भांड माझ्याशी, पण हा अबोला नको!! ती अनोळखी नजर तुझी,  मला पाहुन न पाहिल्या सारखे करणे खरंच असह्य होतंय मला!! त्याच्या बोलण्यातुन त्याच तिच्यावरच प्रेम शब्दांतुन जाणवंत होतं. त्या भेटीत त्याला खुप काही बोलायचंय तिच्या मनातल्या रागास कुठेतरी संपवायचंय हे तिला कळत होतं. मनात मात्र प्रिया खुप काही बोलतं होती आपल्या कित्येक भावना ती सांगत होती तिच्या मनातल्या भिंती त्या सर्व ऐकत होत्या पण मंदारच्या मनात त्या ऐकु जातं नव्हत्या.
खुप काही सांगायचय रे मला पण कस सांगु ज्यावेळी खरंच मला तुझी गरज होती त्यावेळी तु कुठे होतास हे कस मी सांगु. नातं हे अस नसतं रे तुझ्या मनात येईल तेव्हा तु चिडायचं वाटेल तेव्हा निघून जायचं आणि पुन्हा माझी आठवण येताच मला मनवायचं असं किती रे दिवस हे चालणार. मनात सार प्रिया हे बोलत होती पण ओठांवर ते काहीच येऊ देतं नव्हती. कारण तिला मंदारला दुखवायचं नव्हतं.
  मंदारची चिडचीड पाहुन तिलाही दुखः वाटतं होतं पण हळव्या या मनास तिला कुठेतरी कठोर करायचं होतं. मंदारच हे वागणं आता असह्य झालं होतं. प्रिया त्याच्या प्रेमासाठी त्याला काहीच बोलतं नव्हती. पण अखेर तिने ही मंदारला मनातल सगळं सांगितलं. तिचा तो अबोला संपताचं ती बोलली.
'मंदार माझं न बोलणं, तुझ्याकडे पाहुनही न पाहिल्या सारखे करणे यांचा तुला त्रास होतो ना? मग अस तुही माझ्याशी वागताना माझ्या मनाचा विचार केलायस कधी? छोट्या भांडणातही तु माझ्याशी कित्येक दिवस बोललाच नाहीस ज्यावेळी आलास त्यावेळी तुला कोणीतरी बोललं म्हणुन तुला माझी आठवण आली ! खरं ना?? म्हणजे माझं स्थान तुझ्या आयुष्यात कुठे आहे हेच मला कळत नाहीये. तुला वाटेल त्यावेळी तु नातं जोडतोस आणि पुन्हा गरज संपताच ते तोडुन टाकतोस त्यावेळी नात्यांची किंमत तुला कधी कळतच नाही रे.!!
'प्रिया, खरंच माझं चुकलं मला माफ करं !!' मंदारच्या डोळ्यात पाणी आले होते.
'नाही मंदार प्रत्येक वेळी सगळं झाल्यावर माफी मागण्यात काय अर्थ असतो सांग ना? कित्येक वेळा हा मनास दुखवायचा आणि पुन्हा काही झालेच नाही असे म्हणुन माफी मागण्याचा खेळ चालणार? मला आता याविषयी काहीच बोलायच नाही आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही असं मी ठरवलंय! !
प्रियाच्या या निर्णयाचा मंदारला चांगलाच धक्का बसला त्याला काय बोलावे तेच कळेना. माफी तरी काय म्हणुन मागावी. आणि त्याचा आता काही अर्थ ही नव्हता. अखेर प्रिया जाण्यास निघाली मंदारने खुप तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण वेळ आता निघुन गेली होती. होतं त्यावेळी नातं जपता आलं नाही आणि आता ते दुर जाताना मंदारला त्याचा त्रास होत होता.
'माझं खरंच चुकलं मला करं !! मंदारचे हे शब्द प्रियाच्या मनापर्यंत पोहचलेच नाहीत आणि पोहचतील ही कसे मंदारनेच ते मन दुखाच्या वेदनेने घायाळ केले होते तिथे त्याचे  शब्द ऐकायलाही ते मन आता तयार नव्हतं पुन्हा नव्याने सुरू करण्यास तिचा मन आता तयार नव्हते.
कित्येक वेळ मंदार ती निघुन गेल्यावर तिथेच बसुन होता. हरवलेल्या नात्यास कुठेतरी शोधत होता. 'प्रिया, नकोस जाऊ तु मला सोडुन!! आठवणींना तो सांगत होता. आणि हरवुन गेलेल्या पाखरास उगाच एकटाच शोधत होता.
-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...