आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला
आयुष्यभर डावलेल्या नात्यात का
हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला
मी आणि माझे आयुष्य म्हणताना
का विसरलो आपुलकीच्या मित्रांना
पुन्हा नव्याने ओळख करण्यास का
दिसली आठवण ती सावल्यांना
हळुवार निघुन जाताना हे जीवन
विसरलोच मी स्वतःला ओळखायला
कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी
सुर्यास्त झाला का या जीवनाचा
पण मनात होती एक आस पुन्हा
सुंदर असावा क्षण अखेरचा
जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास
साथ हवी होती ती सावल्यांना
-योगेश खजानदार
रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग, खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply