मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर...!!(कथा भाग-४)

"कवितेत लिहिल कित्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं.  या चार ओळी गुणगुणत नाही मी तर माझ मन तस बोलतेय. तुझ्या प्रेमाची सावलीही मी का ओळखु शकलो नाही हेच मला सांगता येत नाही. प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणे नाही तर प्रेम म्हणजे साथ असते, प्रेम म्हणजे आपल्या माणसाच्या हाकेला दिलेली साद असते!!" योगेश त्या रविवारच्या सकाळी फक्त प्रियाचा विचार करत होता. मनातल्या विचारांशी नुसता भांडत होता. प्रियाच्या घरी जाण्यासाठी तोही तितकाच आतुर होता.
प्रिया कित्येक दिवसांनी स्वताला सावरत होती. योगेश कधीही येईल म्हणून सगळं काही व्यवस्थित करत होती. प्रियाची आई तिला मदत करत होती. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आतुरतेने दरवाजा उघडला आणि समोर योगेशला पाहून तिला खूप आनंद झाला. कित्येक वेळ दोघे दरवाज्यात घुटमळत होते.
"येणा!! "प्रियाने योगेशला घरात येत म्हटले.
"किती दिवसांनी भेटतोय योगेश!! मला वाटलं विसरूनच गेलास आम्हाला!! प्रियची आई योगेशकडे पाहत म्हणाली.
"कसा विसरेन काकू !! आयुष्यात काही नाती विसरावे म्हटलं तरी नाही विसरता येतं!!" योगेश प्रियाकडे बघत म्हणाला.
तेवढ्यात प्रिया किचन मधेन निघून गेली. योगेश कित्येक दिवसाने घरी आला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला आवडते ती कॉफी करायला.
"तुझ्या अस रागावू जाण्याने खूप मनातून कोसळली होती प्रिया!!" आई टेबलावर ठेवलेल्या तुषरच्या फोटो कडे पाहत म्हणाली.
"रागाला घर नसतं ते कुठेही सैरावैरा धावत जात!!" आणि मध्ये येणाऱ्या आपल्या लोकांनाही उध्वस्त करून जात!! मला हे सगळं कळलं पण वेळ तेव्हा निघून गेली होती!!" योगेश प्रियाच्या आईला मनापासुन बोलत होता.
"तूषारच्या आठवणींत प्रिया पुरती कोलमडून गेली होती. एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड किती प्रेम करू शकते याची सतत आठवण करून देत होती. पण तुला पुन्हा भेटण्यासाठीची ओढ काही वेगळीच होती. प्रियाची ती आजची ओढ तिला त्या आठवणीतून दूर घेऊन जात होती!! प्रियाची आई योगेशला पुन्हा प्रियाला सावरायला सांगत होती.
"पण एखादी व्यक्ती आपल्यावर इतकं प्रेम कसकाय करू शकते हेच मला कळेना. एखादया व्यक्तीला कवितेत किवा वहीत लिहन सोप असत पण त्याच्या आयुष्यात येऊन गोड आठवणी देणं खरंच खूप सुंदर असत!!" योगेश कित्येक शब्दाच्या गुंत्याना सोडवायचा प्रयत्न करत होता पण नात्यात ते पुन्हा गुंतत होते.
"श्र्वासांच्या अखेरच्या क्षणात सुधा तुषार फक्त प्रियावर प्रेमच करत होता!!मी गेलो तरी माझ्या आठवणीत रडायचं नाही म्हणून वचन मागत होता!!" प्रियाची आई अश्रू आवरत म्हणाली.
योगेश कित्येक वेळ फक्त निशब्द होता. एखाद्यावर रागावून रुसून जाणं किती सोप असत अस त्याला वाटू लागलं पण एखाद्यावर कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करण किती अवघड असत हे कळू लागलं. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती किती अवघड असते मिळणे अस मन सतत बोलू लागल.
"तुझ्या आवडती coffee!!!" प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली.
"थॅन्क्स!!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला हवी होती. तिचा निर्णय चुकला नाही तर बरोबरच होता.  आपण कोणावर प्रेम करतो याहीपेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा आपल्यावर पहिला हक्क असतो अस मनात योगेशला वाटू लागलं.
"कित्येक दिवसाने तुझ्या हातची कॉफी पितोय!!"
"आजही याची चव तशीच आहेना ??" प्रिया योगेशला म्हणाली.
"हो !! चव आहे तशीच आहे !! काही फरक नाही!
  कदाचित प्रियाला आपल्या नात्यातली चव तशीच आहे का विचारायचं असेन.अंतर पडतात नात्यात पण त्याची चव बेचव झाली की नाती चागली वाटत नाहीत.उरतात ती फक्त आठवणीची घर. तीपण रिकामी.
कित्येक वेळ योगेश प्रियाच्या घरी थांबला. प्रियाशी तिच्या आईशी मनमोकळेपणाने गप्पा मारत होता. जुन्या कित्येक आठवणी आठवत होता.
"बरं मी निघू आता!!" योगेश प्रियाला विचारत होता.
"वेळ किती आणि कसा गेला कळलच नाही!" प्रिया घड्याळाकडे पाहून म्हणाली.
"होना आपली माणसं जवळ आसले की वेळ कशी जाते कळतच नाहीना !!"
"होना!! उद्या तुला न्हायला येईन मी ..!! मला तुला काही बोलायच आहे प्रिया !!! भेटशील ना??
"नक्की भेटेन !!" प्रिया मनापासुन हो म्हणत होती.
योगेश आता प्रियाच्या घरातून बाहेर पडला होता. प्रिया योगेश नजरेआड होईपर्यंत दरवाज्यात उभीच होती .

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...