मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचा गोंधळ...!!

कधी शब्द सुचत नाहीत तर कधी स्वतः मनात घोळतात. याच नक्की होते तरी काय हेच कधी समजत नाही. तुम्ही तासन् तास लिहायचं म्हणून बसता आणि एक ओळही लिहून होत नाही आणि कधी कधी स्वतः शब्द मनात कोरले जातात. मला आजही कित्येक कविता लेख लिहिताना याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. कधी कधी तासन् तास बसून लिहिलेल्या ओळी मनास भावत नाहीत आणि कधी कधी सहज सुचलेल्या चारच ओळी मनात घर करतात. असे होत तरी काय की मनातले खेळ समजु शकत नाही. भावना मनातल्या खुप काही बोलतात. तर कधी बोलायचं म्हटल तरी शब्द सुचत नाहीत. कदाचित लिहिण्यासाठी त्या भावना भेटत नाहीत.  उरतात कधी नुसते शब्द आणि कधी कधीं नुसत्या ओळी..

मनातल्या भावना आज
सहज कोऱ्या कागदावर आल्या
कधी नुसत्या भावना होत्या
कधी नुसत्या ओळी आल्या

  म्हणजे नक्की म्हणायचं तरी काय मला तेच कधी कळतं नाही. आणि कधी न बोलता ही सर्व काही त्या ओळी बोलून गेल्या. माझ्या मनातल्या खुप काही गोष्टी मी अशाच व्यक्त झालो. कित्येकदा त्या मनास भिडल्या पण कित्येकदा नुसत्या ओळीच राहिल्या. मग लिहावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न मनी राहिला. मी समजलो का तुला  प्रश्नही कधी मनात आला. आणि कधी न लिहिता ही सर्व काही बोलला. अस लिहिताना का होतश? मी आज कित्येक वर्ष झाले ब्लॉग मार्फत किंवा कविता , लेख मार्फत लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. पण तो कित्येक मनाला भिडला हा प्रश्न कधी स्वतःला ही मी विचारला नाही. मी फक्त लिहीत राहिलो. व्यक्त होत राहिलो. असं म्हणतात की लेखणी हे समोरच्याला व्यक्त करून सांगण्याच सर्वात सुंदर साधन आहे. पण ही लेखणीही जर व्यर्थ ठरत असेल तर लिहावं तरी का असा प्रश्नही मनात आला.

कुठे बंदिस्त कवाड या मनाचे
लेखणी तु व्यक्त केलेस
घुसमटलेल्या विचारांचे
किती तु शब्दांनी खेळ केलेस

  मग कुठे अधुरे राहिले हे शब्द नी समोरचे मन कधी समजुच शकले नाही. आज मागे वळून पाहताना मला कित्येक प्रश्न हेच पडतात. मी का व्यक्त झालो आणि कोणासाठी. माझी लेखणी अधुरीच राहिली त्या मनासाठी जिथे शब्द पोहोचलेच नाहीत. कधी कधी लिहिलेलं सगळं व्यर्थ वाटतं. पण तरीही मनातले ते विचार शांत बसूच देत नाहीत आणि पुन्हा लेखणी हातात येते. होतो विचारांचा नुसता गोंधळ आणि शब्द हे आपोआप कागडव कोरले जातात. माहीत असतं हे सगळं व्यर्थ आहे पण ते तरी लिहिले जातात कोणासाठी तर बंद झालेल्या कवाडावर जाऊन निरर्थक पडण्यासाठी. कधी कधी मला वाटतही की ते शब्दही आता माझा तिरस्कार तर करतं नसतील ना? की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना? की लिहितोस तू इतका की समोरच्या मनाला साधं समजूनही सांगता येत नाही. मग आरे बंद कर तो व्यर्थ प्रयत्न तुझ्या लेखणीत तेवढी धमक ही साधी नाही.

लेखणी तुझी व्यर्थ बडबडत असते
नसेल त्याला अर्थ काही
दे फेकून ती कागदांची आठवण
ज्यात जळेल फक्त तुझे मन

  वाटतं तेव्हा द्यावं फेकून ते लिखाण वहीत बंदिस्त केलेलं त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळांत आणि मनाला सांगावं तुलाही असाच जळाव लागेल. पण तुझ्या ज्वाला दिसतं मात्र नाहीत रे.!! घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे?? मन कोणते ते बंदिस्त कवाडत आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला?? नाही ना ?? मग जळत रहा कायमच अगदी शेवटपर्यंत !! कारण तुला दुसरी चीता च नाही!

शब्दही साथ सोडतील तुझी
अशी कशी रे कवाड मनाची
जळून गेली मनात सारी व्यथा
अशी कोणती साथ आपल्यांची??

शेवटी एवढंच लिहावस वाटतं

किती विचार आणि किती लिहावे
व्यर्थ सारे वाहून जावे.
नसेल अंत या लिखाणास कुठे तर
स्वतःस का मग जाळून घ्यावे.

अखेर....!!!!!

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...