मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग - १)

"काकु !! समीर कुठे आहे ?? सायली समीरच्या घरात येत म्हणाली.
"संध्याकाळची वेळ!!! म्हणजे समीर गच्चीवर असणार ना!! समीरची आई सायलीकडे पहात म्हणाली.
सायली काहीच न बोलता थेट गच्चीवर जाऊ लागली. समीर गच्चीवर काहीतरी लिहिण्यात मग्न होता. सुर्यास्त होताना पाहायला त्याला खूप आवडायचं. सायलीला समोर पाहताच त्याने त्याची वही बंद केली.
"काय लिहितोय समीर?? सायलीला अचानक पहाऊन समीरला काय बोलावं तेच कळेना.
"काही नाही ग जनरल लिहीत होतो!!  समीर स्वतःला सावरत म्हणाला.
"प्रेम पत्र लिहितोय की काय कोणाला?? सायली मिश्किल हसत म्हणाली.
"प्रेम पत्र आणि मी ?? शक्य आहे का ते ?? "
"बरं बरं ते जाऊदे !! तु रोज संध्याकाळी काय करतोस पण इथे??"
"तो दुरवराचा सूर्य बुडताना पाहायला खुप आवडत मला !! " समीर लालबुंद सूर्याकडे पहात म्हणाला.
"रोज??"
"हो रोज !! रोज नवीन वाटतो तो मला !! अगदी मला बोलतो तो सूर्य !! " समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"पण ते जाऊदे !! तु इथे काय करतीयेस??"
"अरे!! राहिलाच बघ !! अरे मी तुला पुस्तक द्यायला आले होते !! हे घे तुज पुस्तक!! "
"वाचलं तु पुस्तक हे ??"
"हो वाचलं , किती सुंदर आहे हे पुस्तक !! मला ते तुला द्यायचंय न्हवत पण म्हटलं तुला हवं असेन म्हणून आले !!"
"तुला अवडल असेन तर राहुदे पुस्तक तुझ्याकडेच, हाकेच्या अंतरावर तर असतेस वाटेनं तेव्हा घेईन मी तुझ्याकडुन!!!"
"खरंच!! "
"हो खरंच राहुदे.!! समीर तिच्याकडे हसत म्हणाला.
सुर्य आता पुर्ण बुडाला होता. अंधाराने स्वतःचा पसारा मांडायला सर्वात केली होती. त्या सुर्यास्ता कडे पहात समीर अचानक बोलला

"कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!" समीर कविता म्हणत सायली कडे पाहू लागला. कित्येक वेळ सायली फक्त त्याच्याकडे पाहताच होती.
"समीर किती सुंदर आहे !!! कोणी लिहिली आहे रे ??" सायली समीरला विचारू लागली.
"काही माहीत नाही कोणी लिहिली, पण मनातुन भावना बोलल्या एवढंच!"
" बरं चलं मी जाते !! आई वाट पहात असेन माझी!!  " सायली समीर पासून दुर जात म्हणाली.
कित्येक वेळ ते शब्द तिच्या मनात तसेच घोळत होते.
समीर जाणाऱ्या सायलीकडे कित्येक वेळ पहात होता. सुर्यास्त केव्हाच झाला होता. त्या वहीत काहीतरी लिहिलं होत पण काय हे सायलीला का सांगितलं न्हवत . काही कळत न्हवत. सायली समीरच्या शेजारीच राहायला होती. रोज भेटही होत होती कदाचित ती वही सगळं काही लिहून घेत होती.
"समीर , अरे काय त्या वहीत लिहीत असतोस सारखं आम्हाला ही कधी वाचायला दे !!" आई समीर कडे पाहत म्हणाली.
"आई तुला वाचून दाखवणार नाहीतर कोणाला ऐकतेस ??" समीर गच्चीवरून खाली येत म्हणाला.
"हो ऐकते!!" आई समीर समोर येत म्हणाली.

"पाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा

त्या वाटेवरून जाताना
पुन्हा वळावे वाटले होते मला
पण पुन्हा नव्या वळणावर
भेटायचे होते तुला

कधी मनातलं सारं
सांगायचं होतं तुला
पण पुन्हा नव्या किवेतेमधे
लिहायचं होत मला ...!!" समीर आईकडे पहात कविता म्हणाला.
"समीर प्रेमात वैगेरे नाहीस ना तू कोणाच्या ??"  आई गालातल्या गालात हसत म्हणाली.
"प्रेम आणि मी !! नाही ग आई !! " समीर घरातुन बाहेर जात म्हणाला.

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...