मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग -३)

समीर घाईघाईत घरातून बाहेर पडला. त्याला कधी एकदा सचिनला भेटेन अस झाल होत. मनातल वादळ त्याला शांत राहू देत न्हवत. खरंच तुषार आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात का ? मग ही गोष्ट मला सायलीने का सांगितली नाही. अश्या कित्येक विचारात समीर सचिनच्या घरी आला. तिथे पोहचताच त्याला तूषारही तिथेच भेटला. आता त्याला काय बोलावे हेच कळत न्हवते. तुषार समोर कसे बोलणार सायली बद्दल म्हणून तो गप्पच राहिला.
"काय समीर कस काय येणं केलंस सचिनकडे?" तुषार थोडा मिश्किल हसत म्हणाला.
"काही नाहीरे सहजच आलो होतो!!"
"सहजच!! बरं बरं ठीक आहे !! अरे सायली होती कारे घरी?" तुषार असा विचारेन अस समीरला कधी वाटलं ही न्हवत.
"काही पाहिलं नाहीरे !!" समीर बोलून गेला.
"अरे आज भेटणार होतो आम्ही !! तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल!!" तुषार या बोलण्याने समीरला काय बोलावे तेच कळेना. तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला.
"चल मी जातो आता!!"
"अरे समीर आलास काय आणि चालास काय थांब थोडा वेळ!!" सचिन समीरला म्हणू लागला.
"नको अरे!! मला काम आहेत!! जायचं होत बाहेर!! "
  सचिनला तुषार जे बोलला त्यावर विश्वासाचं होत न्हवता. सायली आजपर्यंत माझ्याशी का लपवत होती. की तुषार आणि ते भेटतात म्हणुन. कधी तिने याचा विषयही का काढला नसेन. सायली का वागली आसेन माझ्याशी अशी. कित्येक विचाराचा कल्लोळ समीरच्या मनात होता. ती सांज वेळ होती आणि समीर घरी येऊन गच्चीवर बसून सुर्यास्त पहात होता. कदाचित आजही त्याला फक्त त्याचीच साथ होती. वहीच्या पानावर तो लिहू लागला मनातलं सगळं काही मांडू लागला.

"नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे

कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
कधी आपले दुखावले
तर कधी हासू हे परक्याचे

साद घालत आपुल्यास तेव्हा
मी शोधले माझ्या मनास
कधी भेटला एकांत नी
कधी भेटला उपहास

नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे!!!

सुर्य ही आज केव्हाच मावळला होता. समीर कित्येक वेळ तिथेच बसून होता. अंधार झाला तरी तो गच्चीवरच होता. तेवढ्यात समीरची आई तिथे आली कित्येक वेळ समीर आलाच नाही म्हणून त्याला पाहायला वर आली.
"समीर अरे अंधार झाला तरी आज तू गच्चीवर कसा थांबला?" आईच्या या बोलण्याने समीर अचानक भानावर आला. त्याच लक्ष कुठेतरी पार विचारत गडून गेलं होत.
"काही नाही आई असच आज बसावस वाटलं म्हणुन!!!"
"सुर्यास्त नंतर तुला ती संध्याकाळ उदास वाटते ना ?? तरीही तू वर आहेस ?? काय झाल समीर सांगशील??" आई समीरला मनापासून विचारू लागली.
"आई बघ ना!! काल परवा पर्यंत आपली वाटणारी माणसं क्षणात परकी वाटायला लागतात ना!!! समीर आता आईला मनातल बोलत होता.
"कोणा बद्दल म्हणतोय समीर ??"
"सहजच वाटलं अस म्हणुन!!कित्येक क्षण ते असे सहज विसरून जातात!! आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं!!"
"समीर!! आयुष्यात माणसं खुप येतात, काही सतत सोबत असतात तर काही क्षणाचे सोबती असतात!! " आई समीरकडे पहात म्हणाली.
"पण आई समोरच्याला इतकं विसरता येत??"
"विसरायचं असेन तर विसरायचं !! शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे!! तुझ्या आयुष्यात अस कोणी आल तर याच वाईट ते का वाटावं!!
समीर आणि आई बोलत होते कित्येक मनातले किंतू समीर आईला विचारत होता त्यांचं हे बोलण चालू असतानाच. सायली घरी येताना दिसली. समीर तिला पाहून थोडा गोंधळला पण काहीच न बोलता तो गच्चीवरून खाली आला.
"काकु , तुमच्याकडे काम होत!!" सायली समीरच्या आईकडे पाहत म्हणाली.
"हो आलेच!! "
समीर सायली कडे न पाहताच बाहेर निघून गेला. सायलीला हे लक्षात आल पण ती काहीच बोलली नाही.
"काकु समीर असा का निघून गेला??"
""तुला बोलला नाही तो??" आई सायलीला विचारत होती.
"नाही!! बरं काकु उद्या आईने तुम्हाला बोलावलंय आणि समीरला पण सांगा ये म्हणुन! उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन!!"
"अरे वा !! नक्की येऊ आम्ही!! "
"बरं !! येते मी काकु!!"
सायली निघुन गेली. समीर आपल्याशी का बोलला नाही याचा विचार करत ती घरी गेली. उद्या माझा वाढदिवस आणि समीर आला नाहीतर कस होईन. तुषार आणि सचिनही येतीन वाढदिवसाला. पण समीर असा वागला का माझ्याशी!! मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर ..??  अश्या कित्येक विचारत सायली होती.
पण उद्या आला की असा का वागतोय ते मी विचारणार आहे मी त्याला ...!!

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...