मुख्य सामग्रीवर वगळा

प्रजासत्ताक दिनी...

प्रजासत्ताक दिनी...!!!

   सर्वात प्रथम माझ्या सर्व बांधवांना "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!" प्रजासत्ताक शब्द तसा खूप सोपा वाटतो पण प्रजा म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे अंमल. जिथे लोकांचा अंमल असतो त्याला लोकशाही म्हणातात, आणि अशाच लोकशाहीची घटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारतास लागू झाली. आज गेली ६९ वर्षे अशी ही लोकशाही गुण्यागोविंदाने राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार. त्यांनी लिहिलेली ही घटना साऱ्या भारताने एकमुखाने स्वीकारली.
    लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून केले जायचे. शाळेतील मुलांनी केलेली महिनाभर तयारी त्या एका दिवसासाठी असायची. शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी जमा होऊन" राष्ट्रगीत" म्हणताना छाती अगदी गर्वाने भरून यायची. "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत!!" हे म्हणताना खरंच एक्याची आपुलकीची भावना मनात यायची. विविध कार्यक्रम झाल्या नंतर शाळेतर्फे गोड गोड पदार्थ वाटले जायचे. त्या गोडीची चव आजही मनात तशीच आहे. प्रजासत्ताक दीन म्हणजे साऱ्या भारतीयाची गर्वाची आणि आपुलकीची बाब. खरंच आपला देश विविधतेत एक आहे ते म्हणतात ते यासाठीच.
   आज कित्येक वर्षांनंतर सुधा ती आठवण मनात तशीच आहे. आता कित्येक संकल्पणा बदलल्या आहेत एवढंच. त्यावेळी शाळेत ध्वजवंदन करताना मनात एक गर्व असायचा की मी या भारताचा एक नागरिक आहे आणि आज त्याचा अभिमान वाटतो. प्रांतवार रचना करून सर्व भारतीय एक झाले ते याच प्रजेची सत्ता स्थापन करण्यासाठी. आज भारतात कित्येक भाषा बोलल्या जातात, कित्येक धर्म आहेत, कित्येक जाती ,पोटजाती आहेत, कित्येक संस्कृती आहेत पण हा भारत एक झाला तो स्वतंत्र भारतास प्रगती पथावर नेण्यासाठी. आज भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. स्वतंत्र भारताचे आज जगावर एक वेगळे प्रभुत्व आहे ते याच प्रजेच्या सत्तेमुळे.
  आज स्वतंत्र भारत जो उभा आहे त्यामागे त्याला स्वतंत्र करण्यासाठी झटलेल्या कित्येक क्रांतिवीरांचे योगदान आहे ज्यात स्वातंत्रवीर सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी ,  भगत सिंग , चंद्रशेखर आझाद  आणि कित्येक अशा क्रांतिवीर चे नाव घ्यावे. या सर्वांनी घडवला आजचा भारत. स्वतंत्र भारतात आज आपण कित्येक स्वप्न पाहू शकतो पण यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं आणि ते म्हणजे स्वतंत्र भारत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या सर्वांना अभिवादन.
   ६९ वर्षानंतरही आज जेव्हा भारताची लोकशाही मजबूत आहे हे पाहिलं जात तेव्हा स्वतंत्र भारतास एक योग्य दिशा देणाऱ्या आपल्या थोर पुरुषांचे, विचारवंतांचे कौतुक वाटते. आज भारत जगात आणि अवकाशात ही अग्रेसर आहे ते याच लोकशाहीमुळे. याच लोकशाहीने आपल्याला अब्दुल कलामांन सारखे महान राष्ट्रपती दिले, ज्याचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतात. अटल बिहारी वाजपेयी सारखे कवी मनाचे पंतप्रधान लाभले, ज्याच्या कविता आजही कित्येक लोकांना भुरळ घालतात. आणि हीच मजबूत लोकशाहीची खरी संपत्ती आहे.
  असे असले तरी भारत आजही काही ठिकाणी मागे आहे हे ही मान्य करावेच लागेल, पण सर्वांनी मिळून त्या सर्व उण्या बाजू भरून काढायला हव्यात आणि ते प्रत्येक भारतीयाच आद्य कर्तव्य आहे. आपला भारत कित्येक प्रश्नांशी लढतो आहे. महागाई , आतंकवाद , जातीयवाद  अशा कित्येक गोष्टी आता समुळ नष्ट करून एका नव्या भारताची सुरुवात करण्याची गरज आज प्रत्येक भारतीयाची आहे. एखाद्याची जात पात धर्म पाहताना शाळेत असताना म्हणायचो ती प्रतिज्ञा नेहमी आठवली पाहिजे ,की " सारे भारतीय माझे बांधव आहेत!! "  तरच समता प्रस्थापित होईल. आपण कोण हे सांगताना आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना वाढली पाहिजे. तरिही आज कित्येक धर्माचे जातीचे लोक अगदी सुखाने या लोकशाहीत राहतात आणि हेच खरं यश या प्रजेच्या सत्तेच आहे. भारतीय असल्याची भावना प्रत्येकाने मनात नेहमी ठेवली पाहिजे. कारण हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे नागरिक आहोत.

जय हिंद ...!!

वंदे मातरम् !!!

वंदे मातरम्!!!

वंदे मातरम्!!!

✍योगेश खजानदार
 

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...