मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा...!! (कथा भाग १)

    या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंद राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी  फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे. या शिकलेल्या आणि इज्जतदार लोकांना आपल्या वासना आणि इच्छा माझ्या इथे पूर्ण करायच्या आहेत. हो मी समाजानं बाजूला केलेली पण त्याच्या उपयोगाची वेश्या आहे! हो मी फक्त उपयोगाची . माझं नाव सुनंदा ! मला माझी कथा सांगायची आहे.पण सुरुवात कुठून करावी हाच मुळी प्रश्न आहे ,शेवट मात्र माझा वाईटच. मनाच्या कोपऱ्यात एक स्त्री आज बोलते आहे. माझी कथा ती सांगते आहे. मनात खूप काही राहील की ते आपोआप ओठांवर येतं तसच माझं झालेलं आहे.
  छोट्या खेड्यात राहणारी मी, गावाच्या वेशी बाहेर आमची वस्ती. रात्र झाली की आमच्या वस्तीकडे येणारे खूप लोक असतात. अगदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ही येतात. पण तरीही आमच्याकडे अगदी तुच्छतेने पाहिलं जात. माझा मुलगा सात वर्षाचा. त्याला कधी या लोकांचं वागणं कळलच नाही. कारण त्याने जग अजुन जवळून पाहिलच नाही. तुम्ही म्हणाल वेश्येला मुलगा?? पण हे खरं आहे! मला मुलगा आहे. त्याची आई म्हणून मी सर्व कर्तव्य करते.पण कधी कधी मला त्याची आई असल्याची लाज वाटते.
"ये सूनंदे !! उठ पटकन!! तुझा नेहमीच माणूस आलाय बाहेर!! " सुनंदा वहीची पानं मिटत उठली आणि बाहेर गेली.
"शेठजी तुम्ही !! या ना !! " शेठजी डोक्यावरची टोपी सांभाळत अगदी चोर पावलाने आता गेला.
"सुनंदे , आज रात्र इथेच राहणार आहे मी. तुझ्या सोबत असल की मला बर वाटत बघ, बायको नुसती डोक्याला ताप करती!!"दारू पिऊन गावचा सरपंच सुनंदाकडे रात्री झोपायला आला होता.
"राहा ना सरपंच !! पण पोराला जरा बाहेर झोपवून येते!! "अस म्हणून सुनंदा आपल्या पोराला बाहेर झोपवण्यास आली. श्याम ,सूनंदाच पोर ते आई जवळ झोपायचा हट्ट करत होते. पण सुनंदा त्याला वस्तीतल्या मोठ्या आजीकडे झोपवून आली.
"सुनंदे !!"  सरपंच सूनंदला हाक मारत होते. हा सरपंच सूनंदकडे मनातल अगदी मनमोकळे पणाने सगळं सांगणार.
"सुनंदा !! तुझ्याकडे एक जादू आहे बघ !! मला तुझ्याकडे आल की बर वाटतं! ती माझी कजाग बायको माझा नुसतं छळ करते. पण आमच्या शेजारची ती चंदा , मस्तच आहे. वाटत कधी कधी की तीच माझी बायको असती तर किती बर झालं असतं!! " सरपंच सुनंदाकडे पाहत बोलत होता.
"पण सरपंच ती तुमची लग्नाची बायको !! तिच्या बद्दल अस बोलण चागलं नाही!!"  सुनंदा चां जीव आपल्या पोरासाठी तळमत होता.  पोर रात्रभर रडेन पण माझ्याशिवाय झोपणार नाही हे तिला माहीत होत.
"कसली लग्नाची बायको!! कधी प्रेम करायचं माहिती का तिला!! तिच्या असल्या वागण्यानं तर मी इथ आलोय!! " सरपंच अगदी जोरात बोलत होता.
  सरपंचाच्या या  बोलण्याने सुनंदाच्या मनात विचारांचा गोंधळ झाला." वासना माणसाला नात्यातील गोडवा ही विसरायला भाग पडते ना!! अस तिला वाटू लागलं. या नष्ट होणाऱ्या शरीराच्या तात्पुरत्या गरजा, तरीही सर्वांना या हव्याच ना. भावनेच्या पलिकडे जाऊन याचा प्रभाव जास्तच असतो मनातल्या विचारांना बंद पाडते आणि उरतो फक्त सुखासाठी केलेला तो प्रयत्न. कशासाठी हा हट्ट तर फक्त वासना पूर्ण करण्यासाठी."
"आई !!!" विचारांच्या तंद्रीत असलेली सुनंदा अचानक भानावर आली. दरवाजा उघडत बाहेर श्याम तिला मिठी मारू लागला. तो त्या आजीच्या घरातून निघून आला होता.
"आई !! मला तुझ्या जवळ झोपायच आहे." श्याम आत मधे पहात म्हणाला.
"ये सुनंदा !! कोण आहे बाहेर!! आजुन गिऱ्हाईक आल असल तर निघून जा म्हणाव!! " सरपंच पलंगावर पडून म्हणाला.
"नाही सरपंच !! मुलगा आहे माझा!! " सुनंदा आत बघत म्हणाली.
"पोरगा आन तुझा !!" सरपंच बाहेर बघत म्हणाला.
"होय , माझ्या जवळ झोपायच म्हणून हट्ट करतोय!!"
"ये भाडकाव !! जाऊन निज की गप्प!! जरा शांततेसाठी आलो तर याची कटकट !! " सरपंच पोराला धक्का मारत आत निघून गेला. सुनंदाच्या डोळ्यात राग होता पण तिला काहीच करता येत न्हवत. ती शांतपणे श्यामला समजावून सांगत होती. अखेर ते पोर तसच रडत तिथेच झोपी गेले
  श्याम तसच दरवाजा बाहेर झोपी गेला. पण नाईलाजाने सूनंदाला आता जावं लागलं, ती रात्र सुनंदाला कधीही विसरता येत नाही अशी होती. आपल्या पोटचा गोळा बाहेर तसाच झोपी गेला होता आणि आपण आत असूनही काही करू शकत न्हवते याच दुःख तिला होत.
  पहाट होताच सरपंच चोर पावलांनी बाहेर निघून गेला. अगदी सुनंदाला कधी भेटलोच नाही या आविर्भावात तो निघून गेला. रात्रभर श्याम बाहेरच झोपला होता. सुनंदा पटकन बाहेर गेली आणि आपल्या पोराचे कित्येक मुके घेत ती त्याची माफी मागू लागली. "बाळा माझं चुकल रे !!" मला माफ कर!!" श्याम आईला घट्ट मिठी मारत होता.
  सकाळ होताच सुनंदा श्यामला शाळेत जाण्यासाठी आवरू लागली. पण श्याम काही केल्या जायला तयारच न्हवता.
"पोरा शिकून मोठा झालास तर या नरकातून बाहेर पडशील तू!" सुनंदा श्यामकडे पाहत म्हणाली.

क्रमशः

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...