मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा ..!!( कथा भाग -२)

"पण आई त्या दुसऱ्या जगात आहे तरी काय अस?? " श्याम सूनंदाचा हात हातात घेत म्हणाला.
सुनंदा कित्येक वेळ फक्त श्यामकडे पहातच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना. काय आहे तिथे ?? खरंच मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो,पण सुनंदा काहीच बोलली नाही, श्याम शाळेत जायला निघाला. सगळं आवरून तो चालत चालत शाळेच्या जवळही आला.
"काय श्याम रातीला कोण होत घरी ??" गावाची टवाळ पोर श्यामकडे बघून जोरात हसू लागली. पण श्याम सात वर्षाच पोर ते त्याला काहीच कळलं नाही. तो न बोलता पुढे निघून गेला. त्याच्या वर्गातली पोर मैदानावर खेळतं होती. ते पाहून श्यामही त्याच्या सोबत खेळायच म्हणून गेला.
"मी पण खेळू !!! " श्याम मित्राला विचारत म्हणाला.
"नको रे बाबा !! तुझ्या सोबत खेळताना बघितल तर बाप मारल मला !! " वर्गातला एक मुलगा श्यामला म्हणाला.
"का पण !!!"
"तू म्हण रांडेचा पोरगा आहेस म्हणून !!!"
"म्हणजे काय ???" श्यामला काहीच कळलं नाही.
"मला पण नाही माहिती!! पण बाप म्हणत होता मला!!"  जा बाबा इथून तू  आता!!" तो वर्गमित्र त्याला अगदी हाकलून दिल्या सारखं बोलला.
  श्याम कित्येक वेळ एकटाच बसून त्या मैदानावर त्याचाकडे पहात बसला. नक्की आपलं काहीतरी चुकतंय याच त्याला राहून राहून वाटत होत. पण काय ? रांडेचं पोर म्हणजे तरी नक्की काय. माझी आई माझ्यावर किती प्रेम करते. तिचा मी मुलगा आहे याच तर मला कौतुक वाटतं ना. खरंच ही दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप!!! श्याम कित्येक विचाराणं मधे बुडाला. दिवसभर त्याच लक्ष शाळेत कुठे लागलच नाही. शाळेची वेळ बघता बघता निघूनही गेली. श्याम घरी जायल निघाला. घरी पोहचताच त्याने आईला विचारलं.
"आई , मला तुला काही विचारायचं आहे ??"
"काय रे श्याम , आताच तर शाळेतून आलास जा जरा हात पाय धुऊन ये!! " श्याम बाथरूम मधे जाऊन हात पाय धुऊन आला. पण त्याने पुन्हा विचारलं.
"आई , विचारू का ??"
"बरं , विचार श्याम !! "
"आई , रांडेच पोर म्हणजे काय ग ??"  श्याम ने अस विचारताच सुनंदला काय बोलावं तेच कळेना.
"श्याम , काय बोलतोय तू हे !! जा जाऊन अभ्यास कर."
"सांग ना आई , मला शाळेत सगळे रांडेचं पोर का म्हणत असतात?"
"श्याम, कोणी काहीही म्हटलं तरी आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं !! "अस म्हणून सुनंदा घरात निघून गेली.
  सुनंदा कित्येक वेळ डोळ्यातील टिपूस गाळत घरातच बसून होती. मनात असंख्य विचार करत होती " हा समाज मला नाव ठेवतो. पण याच समाजाने मला इथे आणून ठेवलं हे कोण का सांगत नाही. थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा मुलगा शिकून मोठा व्हावा अस मला वाटत तर यात माझं काय चुकलं? का माझ्या मुलानेही इथेच चोऱ्या माऱ्या करून आयुष्य तुरुंगात घालायचं! मला वेश्या करणारा हा समाज पहिले स्वतःचा आंधळ्या वासना का पहात नाही. मला सुधारायचा म्हटलं तरी हा समाज मला जवळ करत नाही. प्रत्येक वेळी जिथे जावं तिथे वासनेने अंध झालेली कुत्री फिरत असतात. मग मी लाज का बाळगावी. दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर मी नाचत घरी आले होते, तेव्हा माझ्या बापाने माझा हिशोब केला होता घरी. ओढत घेऊन जाताना कुठे गेला होता हा समाज. ?? "
"सुनंदे !!! " वस्तीतली आजी सुनंदाला हाक मारत घरात येत होती. सुनंदा डोळे पुसत स्वतःला सभाळून घेत होती.
"काय झाल ग !! रडतेस का ??" आजी सुनंदाची विचारपूस करू लागली.
"काही नाही!! नेहमीच दुसर काय !!! "
"कोण काय म्हणालं!!" आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
"श्यामला आज कोणीतरी शाळेत रांडेचा म्हणाला !! तर श्याम अर्थ विचारत होता मला!! "
"बाई ग !! एवढं मनाला नाही लावून घ्यायचं!! हे का नवीन आहे आपल्याला!! तू बाकी मनानं खूप हळवी आहेस बघ !! सुनंदा या जगात आणि त्या जगात खूप अंतर आहे बघ !! एकदा का इकडे आल की सुटका नाही!! आणि ते जग काय म्हणत याचीही परवा करायची नाही!!" आजी अगदी मनातल बोलू लागली.
"मलाही खूप मोह होता ग !! या दुनियेतील आपला प्रवास संपवून त्या दुनियेत जाण्याचा!! पण सारी गिधाड टपून बसतात आपला फडशा पाडायला. "आजी सुनंदा कडे सगळं काही बोलू लागली.
"म्हणून , हे असलं जीवन जगायचं???" सुनंदा भरल्या आवाजाने म्हणाली.
"हे आपलं जीवन आहे पोरी!! आपलं काम फक्त वासना पूर्ण करण्यासाठी !! पण आपण माणुसही आहोत हे मान्य कोणी करणार नाही. आपाल्या मनात असंख्य भावना आहेत हे कोणी मान्य करणार नाही. आपण फक्त याच्या उपभोगाची वस्तू !! आजी पदराने डोळे पुसत म्हणाली.
"ये सुनंदा!!! दार उघडं !!! " बाहेरून कोणी इसम मोठ्याने ओरडून बोलू लागला.
"कोण आहे !!! " सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
"सरपंच तुम्ही !!! आणि यावेळी ?? "
"आता काय तुला विचारून येत जाऊ का मी ??"  सरपंच दारूच्या नशेत सुनंदा वर खेकसला.
" नाही , तसं नाही !! पण लवकर आलात म्हणून विचारलं!!! "
"बरं चल!! बसं कर बोलणं !! ये म्हातारे निघ चल आता !!! मला निवांत पडायचं आहे इथे!! " सरपंचाच्या  या बोलण्याने आजी बाहेर निघून गेली.
"आई, दरवाजा का बंद केला ??" श्याम बाहेरून हाक मारत आईला बोलू लागला.

क्रमशः

✍ योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...