मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा...!! (कथा भाग ३)

"सूनंदे , तुझ्या पोराला गप्प कर!! कोणाला माहित कोणाची घाण आहे ते !!! " सरपंच एकदम बोलून गेला.
"श्याम , तू आजीकडे जाऊन ये !! " सुनंदा सरपंचाकडे रागाने पहात म्हणाली. तीच्या ओठांवर कित्येक शब्द आले पण ते तिने परतून लावले. या सरपंचाला माझं पोर कोणाची तरी घाण वाटत. पण कित्येक वेळी हा सरपंच इथेच येतो ना घाणीत. मी वाईट मग का येतो इथे हा ! या गोष्टी वाईट वाटतात मग माझ्याकडे आल्यावर याला शांतता का भेटते, पण फक्त स्वतःची शांतता. कधी या नीच माणसाने विचार केलाय माझा किंवा स्वतःचा बायकोचा तरी. नाहीना !! याला फक्त स्वत:ची शांतता हवी आहे. खरंच ही स्वार्थी वृत्ती कधीच कमी होत नाही. म्हणून मला वेश्या , रांड केलं जातं. फक्त आणि फक्त या स्वार्थी आणि नीच माणसांसाठी.
"ये !!! कुठ आहे लक्ष?? " चला!! " सरपंच एकदम बोलला.
"हो !! आले !! " सुनंदा सरपंचाच्या जवळ जात बोलली.
श्याम कित्येक वेळ बाहेरच बसून होता. तो आजीकडे गेलाच नाही. कित्येक वेळा नंतर सूनंदाने दरवाजा उघडला. सरपंच अगदी लपत निघून गेला.
"आई , कोण आहे तो?? मला नेहमी रागवतोच बघ !!! " श्याम सूनंदाकडे पहात म्हणाला.
"कोणी नाही !! चल तू घरात !! तुला म्हटलं होत ना आजीकडे जा म्हणून!! सुनंदा श्यामचा हात हातात घेत म्हणाली.
"श्याम , अंग गरम लागतंय रे तुझ !! "
"नाही आई , बाहेर झोपलो होतो ना!! त्यामुळे वाटत असेन. " श्याम आईला समजावत बोलला.
  श्यामला ताप आला होता हे सुनंदा ने ओळखले होते. पण एवढ्या रात्री कोण वैद्य भेटेल म्हणुंती सकाळची वाट पाहू लागली. घरगुती काही उपायही केले तिने.
"आई , तू पण झोप ना!! " श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला.
"नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! " सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.
"आई , तू एवढी छान आहेस !! मग या लोकांना तू वाईट का वाटतेस ??"  श्यामच्या या प्रश्नाने सुनंदा काहीवेळ निशब्द झाली.
"कदाचित त्यांना मी फक्त बाहेरूनच कळले!! मनात कोणी कधी डोकावलच नाही रे !! म्हणून असेन कदाचित!!"
"म्हणजे काय आई ??"
"काही नाही बाळा!! " झोप तू!!! अस म्हणताच श्याम अलगद डोळे मिटून झोपी गेला. पण सुनंदा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दिव्याकडे पहात राहिली. कदाचित तिला श्यामला सांगायचं होत की " भावनेच्या पलिकडे वासना राहते आणि तिला मन कधी कळलंच नाही. तुझ्या नशिबी ही नरकं यातना देणारी मी, मला वाईट म्हटलं तर काही चुकीचं नाही. माझ्यासारख्या वेश्येच्या उदरात तुझ्या सारखं गोड आणि हुशार पोर देऊन कदाचित त्या विधात्याने तुझ्यावर अन्यायच केला आहे. मी वाईट आहे पण तुझ काय रे !! तुलाही हा समाज रांडेच पोर म्हणूनच हिणावतच ना!! हा दोष फक्त माझा!! त्याचीच शिक्षा कदाचित मी भोगते आहे!! तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होऊ न द्यायची म्हणूनच मला तुला शिकवुन मोठं करायचं आहे. या नरकातून बाहेर काढायचं आहे. असंख्य विचारांचा गोंधळ रात्रभर मनात करत सुनंदा झोपी गेली.
सकाळी तिला जाग आली ती शेजारच्या आजीने दरवाजा वाजवला तेव्हा.
"सुनंदा !! ये सुनंदा!! " आजी दरवाजा वाजवत बोलली.
"आले !! " दरवाजा उघडताच आजी आत आली.
"काय ग !! कधी गेला मग तो खवीस!! " आजी अगदी तिरस्काराने बोलत होती.
"रात्री उशिरा गेले सरपंच !! ते गेले आणि श्यामला पाहिलं. म्हटलं होत त्याला तुझ्याकडे झोपायला जा म्हणून पण नाही, झोपला बाहेरच!! ताप आलीय त्याला!!"
"काय म्हणायंच या पोराला!! मधे पण असाच रात्री आला होता हा तुझ्याकडं माझा डोळा चुकवून!! आई शिवाय क्षणभरपण राहत नाही पोर!! " आजी श्यामच्या जवळ जात म्हणाली. श्याम अजूनही झोपला होता. डोक्यावर हात ठेवत आजी म्हणाली.
"बाई !! ताप जास्तच वाटतोय ग आता !!! "
"रात्रीपासून आहे !!! " सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
"शेजारच्या वाडीतल्या वैद्याकडे घेऊन जा बरं पटकन त्याला!! " आजी काळजीच्या स्वरात म्हणाली.
"हो आता आवरून जाणारच आहे!!"
"तोपर्यंत त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते मी!! "आजी एकदम पुढे सरकत म्हणाली.
सुनंदा सगळं आवरू लागली. आपलं पोर बर होत नाही तोपर्यंत तीच मन कुठेच लागतं नव्हतं.
"ये सुनंदा!!"
"कोण आहे !!"
"मी आहे सरपंच!! "
"सरपंच तुम्ही या वेळी ?? " माझ्या पोराला बर वाटत नाही सरपंच जाऊ द्या मला!!!" सुनंदा केविलवाणी विनवणी करत सरपंचाला बोलत होती.
"ये , असली नाटक माझ्या समोर नाही करायची !! रांड साली!! मला नाही म्हणती !! " सुनंदाला कानाखाली मारत सरपंच खोलीत घेऊन गेला. आजी कित्येक वेळ श्याम जवळ बसून त्याची काळजी घेत होती.
"सरपंच , पोराला खूप ताप आलंय मला लवकर जायचं आहे !"
"ये , मरू दे मेल तर ते!! मला उगाच त्रास देऊ नकोस !!! "
कित्येक वेळ गेला, सरपंच आला आणि वासनेच्या जगात बुडून गेला ही. सुनंदा पलंगावर पडून होती डोळ्यात पाणी होते आणि अंगावर कित्येक घाव, तिच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू एकच बोलत होता, " अरे हा बलात्कार नाही तर काय आहे? पण तुम्हाला, या समाजाला हा बलात्कार वाटणार नाही कारण वेश्येला कुठली आलीय इज्जत ना?? " तिच्या मनाला काहीच नसेन ना वाटत आता!! शेजारी फेकलेल्या पैश्याना हातही लावू वाटत नसेन या घुसमटलेल्या जीवना पुढे. अरे हो असे बलात्कार काय होतच असतील ना !! त्यात नवल काय ते!!! कारण इथे फक्त वासना नांदते!!
"सुनंदा !! ये पोरी !! चल लवकर!! श्यामकडे चल पटकन!! " आजी एकदम ओरडतच आली.
  आजीच्या बोललण्याने सुनंदा एकदम भानावर आली . अंगावरचे कपडे नीट करत ती श्यांमकडे गेली.
"श्याम !! काय झाल बाळ !! उठ ना!! उठ ना रे बाळा!!! "

क्रमशः....

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...