मुख्य सामग्रीवर वगळा

नाते भरकटलेले

  कित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बसला होता. खूप वेळ बोलण झाल्या नंतर मी त्याला रोज एक संध्याकाळी तिला मेसेज करायला सांगीतला. त्यामध्ये बाकी काही नाही फक्त त्याला आपल्या गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्या व्हायला हव्या एवढंच लिहायला सांगितलं होत आणि शेवटी एक वाईट शब्द लिही अस निक्षून सांगितलं. तसे त्याने महिनाभर केले त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तिने त्याला सगळीकडे ब्लॉक केले फोन रिसिव्ह करणे सोडून दिले.
  महिना झाल्या नंतर मी दोघांनाही त्यांच्या नकळत मला भेटायला सांगितल. वेळ एकच पण दोघेही अचानक समोर येतील या गोष्टी पासून अनभिज्ञ. अचानक समोर एकमेकांना पाहून दोघेही गोंधळून गेले. तिला एवढं समजावून सांगूनही ती समजू शकली नाही या गोष्टीमुळे तोही थोडा चिडलेला. कारण व्यक्तीला समजून सांगूनही जर समजत नसेन तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो. तिने त्याच्याकडे बघून न पाहिल्या सारखे केले. थोडा वेळ जाऊ दिला आणि विषयाला हात घातला. तो म्हणाला आता मला तिला समजावून नाही सांगायचं . आणि ती म्हणाली मला आता त्याला बोलायचं नाहीये. दोघांचेही मत ऐकून घेतल्यावर मला त्यांना विचारावं वाटलं. गेला महिना याने तुला कित्येक मेसेजेस केले तरीही तुझा राग का गेला नाही?? तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही ?? तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास?? तर त्याच उत्तर अगदी अपेक्षित होत की तू म्हणालास म्हणून. दोघांच्या ही बाजू कित्येक वेळ ऐकून घेतल्या नंतर मी माझे मत मांडले.
  खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला. तिने त्याच्या मेसेजेस मध्ये फक्त तेच वाईट शब्द पाहिले पण त्याची तिच्या बद्दलची काळजी कधी पहिलीच नाही. दोघेही चुकत न्हवते पण नाते कुठे विसरले जाते आहे हे त्यांना कळलं नाही. कित्येक चर्चा अशाच घडत जातात. आपण नेहमी आपल्या नात्यामध्ये  वाईट गोष्ट धरून ठेवतो जी पूर्ण नातं उध्वस्त करून जाते. नात हे खरतर दोघांच्या समजुतीने टिकते, ना की कोणाच्या सांगण्यावरून. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोण दुसऱ्याने सांगितले म्हणून वाईट म्हणणे खरंच चूक असते. खरतर यात त्याच काहीच चुकत नसते नात्यातील कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातून नकळत घडून जातात. कोणीतरी म्हटलं म्हणून, किंवा कोणाकडे पाहून नात कधीच सुधारू शकत नाही.त्याला लागतात एकमेकांमध्ये विश्वासाचे धागे जे कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू नयेत असे . अखेर दोघांनाही कळून चुकलं की नात्यात छोट्या छोट्या वाईट गोष्टी पहायच्या नसतात अशाने नात टिकवायचं अवघड होऊन बसतं. त्या छोट्या मेसेजेस ने त्यांना खूप काही शिकवलं. कोणीतरी सांगितल म्हणून आपल्या व्यक्तीला नाव ठेवायचं नसत हे त्यालाही कळून आले. बाकी नाती काय मनातून सुरू होतात आणि अखंड ओठातून बोलू लागतात .. अगदी अखेर पर्यंत ... हो ना???

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...