मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा (कथा भाग ५) अंतिम भाग

"आजे , उठवण श्यामला!! " सुनंदा अगदी केविलवाणा चेहरा करून आजीकडे पाहू लागली.
आजी श्यामला आपल्या जवळ घेत पाहू लागली. तिच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला.
"बाळा , अस नाही करायचं बर!! हे असं !!! " आजी हुंदके देत बोलू लागली. तिच्या मनाला कित्येक गोष्टी कळून चूकल्या होत्या.
"आजे , रडायला काय झाल ..!! माझा श्याम उठतं का नाहीये !!! " सुनंदा अगदी मोठ्याने बोलत होती.
"सुनंदा , सावर बाई स्वतःला!!! श्याम गेलाय !!! " आजी तिला जवळ घेत बोलत होती.
"काहीही काय म्हणतेस आजे!!! माझा श्याम असा जाणार नाही !!! नाही !!! " सुनंदा श्यामला जवळ घेत म्हणाली.
"सुनंदा, सावर स्वतःला!!! " अस म्हणताच सुनंदा कित्येक मोठ्याने आक्रोश करत आजीकडे पाहू लागली.
"माझा श्याम !!! माझा गुणी श्याम !!! गेला ?? नाही आजे गेला नाहीये तो !!! बघ एकदा त्याला बोल म्हणाव मला !!!  आईची कसली रे लावली ही चेष्टा !!! ये श्याम !!! श्याम!!!! उठ रे बाळा!! आता तुला माझी शप्पथ आहे बर !! " सुनंदा कित्येक अश्रू पुसत बोलत होती. सुनंदाच्या आवाजाने वस्तीतील लोकांनी गर्दी केली.
  काही केल्या सुनंदा श्यामला सोडायला तयार नव्हती. कित्येक प्रयत्ना नंतर श्यामच्या त्या देहाला स्मशानात आणलं होत. सुनंदा आता एक शब्दही बोलत नव्हती. ती फक्त पहात होती. सरणावर ठेवलेल्या आपल्या मुलाचा चेहरा शेवटचा पहात होती. हळू हळू ते पेट घेत श्यामला आपल्यात सामावून घेत होते. हो ती चिता रचली होती.
"या दोन्ही जगात तुला कधीच सुख मिळालं नाहीच ना रे!! इकडे तुला माझ्या पासून दूर केलं!! आणि त्या समाजाने नेहमीच रांडेच पोर म्हणून हिणवलं!! पोरा पण का सोडून गेलास मला ?? माझ्यासाठी तरी !! पण त्या देवाला कदाचित तुझ्यासारख गोड पोर पाहिजे होत म्हणून ते त्याने बोलावून घेतल, तू रांड आहेस, तू वेश्या आहेस तुझी तेवढी लायकी नाहीये हे गोड पोर सांभाळायची म्हणून कदाचित तुला त्याने बोलावून घेतलं!! हो बाळा सुटलास तू !! माझ्या सारख्या बाईला पण प्रेम करायचं शिकवून गेला तू!! माय काय असते हे सांगून गेलास तू !!! श्याम !!! " सुनंदा पेटत्या ज्वालाकडे शांत पहात विचार करत होती.
"सूनंदे , चल पोरी घरी !!! "आजी सूनंदेला उठवू लागली. स्मशानात फक्त त्या दोघीच राहिल्या होत्या. बाकी लोक केव्हाच निघून गेले. विसुरू गेले.
"आजे !! बघणं !! होत्याचं नव्हतं झालं !! कालपर्यंत आई आई करणार पोर !! आईला न बोलताच दूरच्या प्रवासाला निघून पण गेलं!! " सुनंदा भरल्या डोळ्यांनी बोलत होती.
"असच असतं पोरी!! जीव लावणारी माणसं लवकर दुरावतात!! "
"आणि आयुष्याची आठवण ठेवून जातात!! " सुनंदा शांत बोलत होती.
सुनंदा घरी येताच कित्येक वेळ एकटीच त्या खोलीत बसून रडत होती. ज्या श्यामसाठी जगायचं तोच निघून गेला मला सोडून, मग आता जगायचं तरी कोणासाठी. अस म्हणत कित्येक वेळ ती बसून होती. श्यामच्या कित्येक वस्तू तिला त्याची आठवण करून देत होते." श्याम !! माझं पोर श्याम!! त्या सरपंचाच्या डोळ्यात सलनारा श्याम!!! त्या शाळेतल्या पोराला रांडेच पोर वाटणारा श्याम !! सतत आई आई करणारा माझा श्याम !! आई तू पण झोप ना म्हणत माझी काळजी करणारा श्याम !! " सुनंदा श्यामच्या आठवणीत पुरती बुडाली होती.
"ये सुनंदे !! " बाहेरून दरवाजा जोरात वाजत होता.
"कोण आहे !! " सुनंदा स्वतः ला सावरत म्हणाली.
"मी आहे सरपंच !! दरवाजा उघड !! " सरपंच जोरात ओरडला.
"सरपंच तुम्ही जावा इथून !! " सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
"काय ग ये रांडचे !! मला काय जा म्हणती तू?? कोण जास्त पैसे देणार भेटलं का काय तुला?? "  सरपंच सुनंदा वर हात उगरात बोलला.
"सरपंच माझं पोर आताच गेलं!! आणि आता तुम्ही कधीच नाही आलात तर चाललं मला!! "
"चला घाण गेली एकदाची !! पोर लैच त्रास देत होतं !!"
"सरपंच !!!" अस म्हणत त्याच्या कानाखाली मारत सुनंदा त्याच्याकडे कित्येक वेळ पहात होती. सरपंचाला हे अनपेक्षित होत.
"साली रांड !! आली ना लाईकी वर !! चल आत !! खूप झाली तुझी नाटक !! साली छिनाल !!! "  सरपंच सूनंदाला खेचत खोलीत घेऊन जाऊ लागला.
"सोड !! सोड रे!! अरे राक्षस आहे का कोण आहेस तू!!! " सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली.
"अरे भाड्या जरा तरी दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की!! वासनेची भूक एवढी कसली रे तुला!!! जा एकदा स्मशानात जाऊन बघ !! तिथं प्रेम ,वासना , राग , तिरस्कार सगळं काही राख झालंय !!"
"जास्त बोलू नको सुनंदे !! गप्प चल आत!! आणि कित्येक लोकासोबत झोपणारी तू !! तुला कसली आलीय प्रेम आणि माया !! " सरपंच पुन्हा तिला खेचू लागला.
"यावेळी नाही !! नाहीच !!" सुनंदा हात सोडवत घरातून बाहेर पळाली.
"सुनंदा !! " पळत जाणाऱ्या सुनंदाकडे पाहत आजी हाक मारू लागली.
सरपंच हळूच निघून गेला. सुनंदा कुठे आहे हे त्याने पाहीलही नाही. पण आजी थकत थकत सूनंदाच्या मागे मागे जाऊ लागली.
"सुनंदा!! " आजीचा आवाज सुनंदा पर्यंत पोहोचलाच नाही.
ती फक्त पळत होती. हो या दुनियेपासून , ती फक्त पळत होती. तिला भान नाहीं राहिले स्वतःचे , स्वतःचे अस्तित्व विसरून ती पळू लागली. कित्येक वेळ. त्या वस्तीपासून दुर लांब कुठेतरी !! पण कुठे हे माहीतच नव्हते.
"आई , ती दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप !! " श्यामचं हे बोलणं तिला अचानक आठवल. मग मी जाऊ कुठे बाळा ??" सूनंदाच्या मनाने हा प्रश्न केला.
"आई !!! इथे ना मला खूप बरं वाटतंय !! आणि कोणी काही बोलत पण नाहीये !! कोणी उठवत पण नाहीये !! कोणी हाकलून पण देत नाहीये !! " सुनंदा पळत पळत स्मशानभूमीत आली होती. ती राख कदाचित तिला बोलत होती.
"आई , आता ही राख पाहून कोणी ओळखणार पण नाही मला !! की मी रांडेच पोर आहे म्हणून!! " आई तू नकोस उगाच पळू!! कारण ते जग खूप वाईट आहे, तुला ते कसही धरनारच !!! " सुनंदा फक्त पहात होती.
"काय करू मी पोरा !! तुझ्याशिवाय मला एक क्षणही राहवत नाही!! " कस जगू मी !!! "सुनंदा त्या राखेकडे पहात बोलत होती.
बोलता बोलता ती अचानक गप्प झाली, चालत चालत बाहेरच्या नदीजवळ आली. आपल्या आयुष्याची ही कथा इथेच संपवायची या निर्धाराने ती चालू लागली. कदाचित नदीला आपलस करायला निघाली.
  कित्येक वेळा नंतर आजी तिथे पोहचली. सूनंदाच्या प्रेताकडे पहात बोलू लागली.
"ये सुनंदे !!! " उठ की ग !!" आजी रडत बोलत होती.
गर्दीतल्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करत होती. मदतीसाठी!!
"कोण हो ही ? " गर्दीतला एक माणूस दुसऱ्या माणसास बोलत होता.
"रांड साली !!! " वरच्या वस्तीतली !! मेली बघा !!! "
  " हो !!! रांड साली !!! कित्येक वेळा वासनेच्या तुझ्या सारख्या कुत्र्याला सांभाळणारी मी सुनंदा रांड !! अरे रांड मी नाही रांड तुझी वासना आहे !!! जिला ना भावना कळतात , ना प्रेम !! फक्त हवी आहे मी एक रांड म्हणुन!! उपभोगायला फक्त !!! " कदाचित ते सूनंदाचे प्रेत असेच काही सांगत होते .
अखेर त्या वस्तीतल्या घरात वासना आणि प्रेम या दोघांचाही अंत झाला होता, ना वासना जिंकली ना प्रेम, उरल्या होत्या भिंती काही आठवणीच्या साक्षी देत , स्वतःशीच बोलत.
"बाळा शिकून मोठा झालास ना की तू या नरकातून बाहेर पडशील!!!"
"पण आई !! ते जग खूप वाईट आहे !!!! "

समाप्त.

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...