मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास!! (कथा भाग ३)

सुमेधा रात्रभर सायली जवळ बसून होती. तिथेच ती झोपी गेली होती. सकाळी दरवाजाची कडी वाजल्याचां आवाज झाला आणि तिला जाग आली. सकाळी सकाळी सुमेधाची सासू तिला भेटायला आली होती. दरवाजा उघडत सुमेधा म्हणाली.
"सासूबाई तुम्ही सकाळी सकाळी ??"
"गावाकडे मनच लागेना!! तुला भेटावसं वाटलं म्हणून आले परत !! " सुमेधाची सासू  घरात येत म्हणाली.
"बरं झालं तुम्ही आलात !! " सुमेधा आत जात म्हणाली.
कित्येक वेळ ती घरातलं सगळ आवरत होती. एक चहाचा कप ती सासुबाईकडे देत म्हणाली.
"गावाकडे कसे आहेत सगळे !! "
"मजेत आहेत !! रमण बद्दल कळालं म्हणून विचारपूस करत होते!! "
सुमेधा हातातल्या चहाचा घोट घेत फक्त पाहात होती.
"इतकं चागलं पोर माझं !! त्या दारू पायी गेलं !! की मारलं कोणास ठाऊक!! " सासू पदराने डोळे पुसत म्हणाल्या.
"म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला ??"सुमेधा अचानक बोलून गेली.
"जिवंतपणी मारलं माझ्या पोराला तू !! त्याची बायको झालीस !! पण फक्त शरीराने!! "
"काय बोलताय तुम्ही सासूबाई ??" सुमेधा हातातला चहाचा कप खाली ठेवत म्हणाली. तिला हे सगळं अनपेक्षित होत.
"२५ वर्षांपूर्वी झाल त्याची शिक्षा तू त्याला प्रत्येक क्षणाला दिलीस !! मारलस माझ्या पोराला !! "
"सासूबाई मी कशाला मारू त्यांला !!बायको म्हणून सारी कर्तव्य पार पाडलीचना मी !! " सुमेधाला खूप काही बोलायचं होत पण ती शांत झाली.
"फक्त कर्तव्यच केलीस तू !! " सासूबाई तिरस्काराने सुमेधाकडे पाहत म्हणाल्या.
त्या दोघींच्या आवाजाने सायलीला जाग आली. ती लगबगीने बाहेर आली. आजीला समोर पाहून ती आई जवळ जाऊन उभी राहिली.
"माझच चुकलं !! तुझ्यासारख्या रांडेच्या पदरात माझ पोर टाकलं!! आणि मारल मी !! क्षणाक्षणाला !! २५ वर्ष !! "
"सासूबाई !! तोंडाला येईल ते काय बोलताय!! " एव्हाना आता सुमेधाचा ही पारा चढला होता.
आईचं हे रूप पाहून सायली थोडी घाबरली होती.
"नाही माझच चुकलं!! चुकलचं माझं !! " अस म्हणत सुमेधाची सासू तडक बाहेर निघून गेली.
सायली आजीच्या मागे जाणार तोच.
"सायली !! कुठेही जाऊ नकोस !! जाऊ दे त्यांना !! " सुमेधा राग शांत करत बोलली.
सायली काहीच न बोलता आत निघून गेली. सुमेधाने घराचं दार बंद करून घेतलं.
"तुम्हाला झाकायला जागा आहे म्हणून तुम्ही पुरुष !! माझ्या आयुष्याची लाज काढली तरी तुमचंच पुरुषपण जपत राहायचं आम्ही !! कशासाठी रे !! फक्त लाज राखायला!! करा हवा तेवढा छळ करा !! वाटेल तेव्हा अंगा खाली घ्या !! आणि पुन्हा आमच्याच लाजेचे लखतर आमच्याच मढ्यावर ओढून मोकळे व्हा!! २५ वर्ष या माणसाने दुसर केलं तरी काय!!" सुमेधा डोळ्यातून ओघळत्या अश्रूनसोबत त्या तिच्याच नशिबाशी बोलत होती.
"एक बायको म्हणून मी त्यांची राहिलेच ना !! परपुरूषाचा स्पर्शही या देहाला कधी माहीत नाही !! आज मला कळतेय की काल एवढी लगबग का होती माझी!! मनोजला भेटायची !! कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं !! मनसोक्त प्रेम केलं!! फक्त प्रेम केलं !! कोणतीही अपेक्षा न ठेवता !! " सुमेधा डोळ्यातले अश्रु पुसत उठू लागली.
सायली स्वयंपाक घरात आवरत होती. सुमेधा तिथे येताच ती एकदम सावरली.
"आई !! आजी एवढी का चिडली होती !! "
"काही नाही ग !! असच !! " सुमेधा सायलीकडे पाहतही नव्हती.
"आई !! मला एवढं तरी कळतं की नक्की काय झालंय ते !!! आजी जे काही म्हणत होती ते !! "
"बाळा !! आयुष्यात कितीही श्रीमंत झालात तरी प्रेम नाही विकत घेता येत !! त्यासाठी समोरच्याला जीव लावावा लागतो !!"
सायली सुमेधाकडे पाहत म्हणाली.
"म्हणजे तुझ बाबांवर प्रेम नव्हतं ??"
"एक पत्नी म्हणून मी सारी कर्तव्य केली !! पण एक स्त्री म्हणून कधीच नाही !! मी फक्त त्यांची पत्नी होते !! "
"म्हणजे तुझ बाबा वर प्रेम नव्हतं तर!! "
सुमेधा काहीच न बोलता गप्प राहिली.
पण सायली मनातून पुरती गोंधळली.  तिच्यासाठी हे आईचं नवीनच रूप होत. आईच्या मनात बाबा बद्दल प्रेमचं नाही हे ऐकुन ती अबोल झाली.
सुमेधा मात्र या सगळ्या गोष्टीतून आता सावरण्याचा प्रयत्न करत होती.
"माझ्याही अश्या असण्याला काही कारणे आहेत बाळं !! एक स्त्री मनातून खूप कठोर असते !! कारण तिने स्त्रित्वाचे कित्येक घाव सोसलेले असतात!! अंतरीच्या या पटलावर कित्येक गोष्टी आहेत ज्या तुला मी वेळ आल्यावर नक्की सांगेन !! बाळ तुझ्या आईला वाईट समजू नकोस !! " सुमेधा आपल्या मना सोबतच व्दंव्द करत होती.
सायली मात्र आता सुमेधाला जास्त बोलत नव्हती. मोजकेच पण तुटक बोलत होती.
"बाळ सायली !! तुझे ते शिक्षक आहेत ना मनोज देसाई ते उद्या आपल्या घरी येणार आहेत !! " सुमेधा सायलीकडे बघत म्हणाली !
"ठीक आहे !! " सायली खाली मान घालून काहीतरी लिहिण्यात व्यस्त होती.
"विचारलं नाहीस का ते ??"
"का ??" सायली वर सूमेधाकडे पहात म्हणाली.
"ते माझे जुने मित्र आहेत !! परवा तुला सोडायला आले होते तेव्हा भेट झाली माझी !! "
"बरं !! "
"सायली काय झालंय तुला !! माझ्याशी नीट बोलत नाहीस !! तुटक तुटक वागतेस !! काय झालं आहे तुला ??"
"कुठ काय?? काही नाही !!!
"तुला याचाच राग आलाय ना की मी तुझ्या बाबांवर प्रेम का केलं नाही ते !!  बाळा प्रेम मनातून होत !! आणि जे मन, दुसऱ्याच प्रेम प्रेमाने जिंकत ना !! त्याला प्रेम म्हणतात !! यापुढे मी काही बोलू शकत नाही !! तुझे बाबा आहेत ते!! तू नक्कीच त्याच्यावर प्रेम कर आणि करत राहा !! मला त्याविषयी काहीच बोलायचा हक्क नाही!!" सुमेधा अगदी मनापासून बोलत होती. डोळ्यातले अश्रू पुसत होती.
ती काहीच न बोलता खोलीत निघून गेली. सायली कित्येक वेळ बाहेरच बसून होती. आपण आईशी अस वागायला नव्हतं पाहिजे अस मनातून तिला वाटत होत.
सुमेधा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दीव्याकडे पहात होती .

अखंड जळत राहिले मी
माझेच मला विसरून
अखेरच्या क्षणी उरले
ते कलकांचे काजळ जगी

क्रमशः..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...