मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास !!(कथा भाग ४)

जळत्या दीव्या सोबत ती रात्र अखंड जळत राहिली. सुमेधा त्या रात्री कित्येक अश्रुंशी बोलत होती. पण ऐकणार ते कोण! मनातल्या विचारांचं  गाठोड उघडायचं तरी कुठे !! कित्येक आणि कित्येक विचार.
सकाळ होताच सुमेधा सगळं घर नीट आवरून घेऊ लागली. कोणत्याही क्षणी मनोज येईल आणि मग!! या विचारांनी ती काम करत होती. सायली कित्येक वेळ खोलीतून बाहेर आलीच नाही. सुमेधा  अखेर तिला उठवायला गेली.
"सायली !! सायली!! उठ आता चल !!"
कित्येक वेळ हाक मारल्या नंतर सायली उठून बाहेर आली.
"आई !! " सायली सुमेधा कडे पाहत म्हणाली.
"काय ग??" सुमेधा काम करत करतच तिला बोलत होती.
"आई !! काल जे झालं त्याबद्दल मला माफ कर !! "
"अरे !! त्यात काय एवढं !! जा बर आवरून घे !! मनोज सर कधीही येतील !! "
"हो आई !! पण मला माफ कर !! आयुष्यात आपण कोणावर प्रेम करावं की करू नये !! हे सांगण्याचा अधिकार किंवा त्याबद्दल बोलायचा हक्क आपल्याला नसतोच !! "
सुमेधा हातातलं काम बाजूला ठेवून सायलीकडे बघू लागली.
"बाळ !! कोणावर प्रेम होईल हे जस आपल्या हातात नसतं !! तसच कोणावर प्रेम कर हे पण आपण नाही सांगू शकत !! सगळं मनच ते बोलत! "
सायली एक हास्य देत सुमेधाकडे पाहू लागली.
"जा आवर पटकन !! "
सायली आईकडे पाहत निघून गेली.
"आज कदाचित मनातलं सारं बोलून मोकळं व्हावं असं का वाटतं. मनोज कधीही येईल!! आणि कित्येक जुन्या आठवणींना घेऊन येईल. त्या बागेतील त्याची आणि माझी पहिली भेट आणि बाबांना मी त्याच्यावर प्रेम करतेय हे सांगणं !! किती ते धाडस होत न माझ!! अखंड प्रेम करत राहिले मी त्याच्यावर !! लग्न केलं रमण सोबत पण हे मन त्याचंच राहील !! शेवट पर्यंत !!! "  सुमेधा कित्येक विचार करत सारं काम करत होती.
अचानक दरवाजा वाजला. सुमेधा चमकुण दरवाज्याकडे पाहू लागली. आणि लगबगीने दरवाजा उघडायला गेली.समोर मनोज होता. एक स्मित हास्य करत तो म्हणाला.
"खूप वेळ लागला तुझ घर शोधायला!!"
"होका !! येणा !! "
मनोज घरात येत म्हणाला.
"थोडा उशीरच झाला !!
"बस ना !! मी पाणी आणते तुझ्यासाठी!! "
मनोज समोरच्या सोफ्यावर बसला. सुमेधा पाणी आणायला आत गेली. शेजारच्या टेबलावर सुमेधा आणि रमणचां फोटो तो बघू लागला. तितक्यात सुमेधा जवळ येत म्हणाली.
"२० वर्षां पुर्वीचा आहे फोटो!! "
"हो !! ते कळलं मला !! वय बोलत माणसाचं !! फोटोतही!! "
मनोज पाण्याचा ग्लास घेत म्हणाला.
तितक्यात सायली तिथे आली. आपल्या सरांना समोर पाहून गोंधळली.
"ये ना !! " सुमेधा तिच्याकडे पाहत होती.
"सर तुम्ही माझ्या आईला ओळखता हे माहीतच नव्हतं मला !! काल आई म्हणाली मला !! "
सायली अगदी सहज मनोजला बोलू लागली.
"आम्ही दोघे जुने मित्र आहोत !! आम्ही दोघेच कित्येक वर्षानी भेटतोय !! दोन दशकं गेली आणि पुढे ५ वर्ष !! "
मनोज सायलीकडे पहात बोलला.
तिघे कित्येक वेळ बोलत होते. सोबत जेवणही केलं.जेवण झाल्यानंतर सायली आपल्या खोलीत निघून गेली.सुमेधा आणि मनोज घराच्या अंगणात बसून बोलू लागले.
"खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! " सुमेधा मनोजकडे बघू लागली.
"आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास आपल्या आवडत्या व्यक्तीचा असेल तर बर वाटत !! नाहीतर एकांत कधीही गोडच वाटतो !! माझ्यासारखा !! "
सुमेधाला या बोलण्यात कित्येक दुःख साचल्याच जाणवलं.
"खरंय तुझं !! आवडत्या व्यक्तीचा सहवास असेल तर आयुष्य छान वाटतं !! नाहीतर सहवासात असेन तरी मन एकटच राहत !! माझ्यासारखं !! " सुमेधा मनोजकडे एकटक पाहू लागली.
"इतकंच एकटं होत हे मन तर कधी आपल्या लोकांना शोधावं अस वाटल नाही ??"
"मन अडकून पडलं होत!! रक्ताच्या नात्यात !! "
"म्हणजे आजही मी शून्यच आहे !! " मनोज अगदी भरल्या मनाने म्हणाला.
"काही गोष्टी बांधून ठेवतात रे मनोज !! "
"मला त्या गोष्टी ऐकायच्या आहेत !! " मनोज अगदी निर्धाराने बोलला.
सुमेधा कित्येक क्षण अबोल राहिली. मनाशी कित्येक विचार करून ती बोलली लागली.
"तुला ऐकायचे आहे ना!! मी रमण सोबत का लग्न केले ते !! "
मनोज होकारार्थी मान डोलावु लागला.
"तर ऐक मग !! " सुमेधा आता मनमोकळे बोलू लागली.
"तुझ्या आणि माझ्या प्रेमाबद्दल मी जेव्हा घरी सांगितल तेव्हा बाबांचा साफ नकार होता!! तुझ्याकडे मला द्यायला काहीच नाही असं त्यांना वाटत होत!! त्याच काळात रमणच स्थळ माझ्यासाठी आल. मुलगा श्रीमंत आहे !! खूप कमावतो असे वाटून बाबांना स्थळ आवडल.!!" मनोज सगळं मनापासून ऐकत होता.
"पण माझा लग्नाला साफ नकार होता!! बघायचाही कार्यक्रम झाला!! मला बघताच मी रमणला आवडले!!  पण काही दिवसात बाबांनी त्यांना नकार कळवून टाकला!!  रमणला हे खरच वाटेना !! आणि तो मला पाहताच प्रेमात पडला होता!! त्याला हा नकार नको होता!! नंतर कित्येक दिवस तो माझ्या मागे होता!! सुमेधा भरल्या डोळ्यांनी सांगू लागली.
"पुन्हा एक दिवस तो मला बाहेरच भेटला!!  मला बळजबरी करत त्याच्या घरी घेऊन गेला.!! घरी त्यावेळी कोणीच नव्हते !! २ दिवस माझ्यावर अत्याचार करत होता. इकडे आई आणि बाबा दोघेही माझा शोध घेत होते!! पुन्हा घरी आल्यावर सगळी हकीकत मी दोघांनाही सांगितली!! पण समाज !! लाज !! आणि इज्जत !! या गोष्टीत तो माझ्यावरचा बलात्कार माझ्या घरच्यानीच झाकून घेतला!! " मनोजला काय बोलावे कळत नव्हते. तो फक्त ऐकत होता.
"तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम होते!! अशात काही महिने गेले !! माझ्या पोटात बाळं आहे असं कळताच बाबां गप्प झाले !! पण आई मला कित्येक विनवण्या करू लागली. अखेर मी लग्नाला होकार दिला !! "
सुमेधा शांत झाली.
"पण तू त्याचवेळी पोलीसात तक्रार का केली नाहीस ??"
"समाजात काय इज्जत राहील !! माझ्यावर बलात्कार झालाय हे जर बाहेर कळाल तर काय होईल अशा कित्येक भीती मला घरच्यांनी दाखवल्या !! आणि असही रमण लग्नासाठी चालून आलेल स्थळ होतच ना!! अस म्हणून २५  वर्षाचा त्याचा आणि माझा नरक सहवास सुरू झाला!! !!"सुमेधा डोळ्यातले अश्रू पुसून म्हणाली.
"तुला माहितेय मनोज !! एक गोष्ट आजही माझ्या मनात आहे !! स्मरणात आहे !! माझ्यावर नाहीतर माझ्या दिसण्यावर प्रेम करणाऱ्या रमणे मला आपलस केल्या नंतरचे ते हास्य!! आजही मला लक्षात आहे !! "सुमेधा   उठतं म्हणाली.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...