मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास !! (कथा भाग ६ ) अंतिम भाग.

सुमेधाने मनोजला पत्र पाठवले होते. त्याला ते सगळे अनपेक्षित होते.तो पुढे वाचू लागला.

प्रिय मनोज ,

      खरतर त्या दिवशी कित्येक गोष्टी मी मनमोकळेपणाने तुला बोलले. मनाला हलकं वाटलं. २५ वर्ष मनात साठून राहिलेल, त्या दिवशी सगळं रित केलं मी. तुझ्या मनाचा खरंच विचार न करता मी माझ्या आयुष्याच्या कित्येक निर्णयांवर ठाम राहिले. पण तू माझ्यावर प्रेम करायच्या या एकाच निर्णयावर आजही ठाम आहेस. २५ वर्ष मी नको त्या माणसा सोबत, त्याच्या सहवासात काढले, आणि तू तेच वर्ष माझ्या आठवणीच्या सहवासात काढले. तू त्या दिवशी लग्न केलच नाहीस म्हणालास आणि मनातल्या कित्येक भावना मलाच दोष देऊ लागल्या. तुझ्या एकटेपणाचा दोष माझ्याच माथी मारू लागल्या. हो मी तुझी गुन्हेगार आहे हे नक्की.पण मला माफ करशील एवढं मात्र नक्की.
  त्या दिवशी अचानक समोर आलास आणि मनाला आनंद झाला. तुझ्या सोबतच्या कित्येक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पण ही वेळ पुन्हा भेटण्याची नाहीये.  कदाचित पुन्हा कधीच न भेटण्याची आहे. तुला हे सगळे वाचून थोडे दुःख होईल पण मी हे शहर सोडून जाते आहे. कायमची!!  मला पुन्हा भेटण्याचं वचन नको !!  पण माझ्या त्या गोड आठवणी तशाच जपून ठेव एवढं मात्र मी हक्काने सांगेन .त्यावेळी मी अचानक लग्नाचा निर्णय घेतला म्हणून तू रागावलास पण आज या माझ्या निर्णयाने रागावू नकोस.
   रमण गेला!! पण आयुष्याची सारी गणिते सांगून गेला. मला मिळवलं त्याने !!! पण माझा होऊ नाहीं शकला तो कधी. याच एका दुःखाने त्याला मरण जवळ करावासं वाटलं. या त्याच्या सहवासात काही पहिली वर्ष सरली द्वेशाची !!  पण त्याने नंतर खूप प्रेम केलं माझ्यावर. पहिल्या साऱ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न ही केला त्याने. पण त्याचच मन त्याला आतून खात राहील. आयुष्याच्या संध्याकाळी त्याने फक्त मला एवढंच मागणं मागितलं होत की माझ्या नंतर मला अग्नी दिल्यावर अखेरपर्यंत मी तिथे थाबावं. आणि त्याची ती इच्छा मी पूर्ण केली. शेवटची ती राख ही मला माफी मागते आहे असा मला भास झाला." मनोज डोळ्यातील अश्रू पुसून पुढे वाचत होता.
"सगळं सहन करूनही अखेर माझ्याच माणसांनी मलाच दोषी धरले याची खंत खूप आहे मला. पण माझ्याच कोणीतरी अखेरपर्यंत माझाच होऊन राहावं हेही खूप काही बोलत मनाशी. हो मनोज!! तुझ्या या प्रेमा समोर मी निशब्द झाले. खरंच इतकं का रे प्रेम करतोस माझ्यावर तू??  कदाचित या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी अनुत्तरितच राहील.असो जास्त काही अजुन लिहिणार नाही!!  आयुष्यात कोणाचा तरी सहवास हवा असतो !! तुला माझ्या आठवणींचा आहे आणि मला तुझ्या आठवणींचा!! काळजी घे !!

तुझीच

सुमेधा ...

  पत्र टतसेच हातात ठेवून मनोज कित्येक वेळ खिडकीतून बाहेर बघत राहिला. जणू मनाशी कित्येक गोष्टी बोलू लागला.
"आयुष्यात माणूस खऱ्या प्रेमाला का मुकतो!! तेच मला कधी कळत नाही!! कित्येक वर्ष सुमेधाच्या आठवणी या उराशी बाळगून होतो मी. ती पुन्हा भेटली तर जाऊ नाही द्यायचं तिला!! अस मनाशी पक्क ठरवल होत ना !! मग आता कुठे जाऊ शोधायला पुन्हा तिला!! की जाऊन भेटाव सुमेधाला आणि खडसावून सांगावं की पुन्हा निघून गेलीस तर बघ !!! पण शोधावं तरी कुठे तिला?? त्या दाही दिशांनी एकच कल्लोळ केला असे का भास व्हावे !! जायचं असेन तर खुशाल जा म्हणावं तिला!! पण या आठवणींचा सहवास नको आता मला !! घेऊन. जा त्याही सोबत !! " अचानक मनोज भानावर आला.
आयुष्यात एकदा नाही तर दोनदा प्रेम केलं.  पण दोन्ही वेळा ती ओंजळ फक्त आठवणींनीच भरून गेली.
मनोज पुन्हा त्या जुन्या कट्ट्यावर गेला. एकटाच जणू भरलेल्या आठवणीची ओंजळ रिकामी करण्यास. पण तिथे आज कोणचं का नव्हते?? त्या कल्लोळातही तो एकटेपणा खूप काही सांगत होता.  सुमेधा पुन्हा आपल्याला आठवणीच्या सहवासात सोडून गेली !! जणू  कायमची !!

आठणींचा तो सहवास
उगाच मला का छळतो
तुझ्या असण्याचे खोटे भास
मनास आज का देतो

शोधतो दाही दिशा
पुन्हा पुन्हा तिथेच येतो
तू ना दिसताच त्यास
बावाऱ्या मनास का बोलतो

सांगु कसे मी त्याला
उगाच का व्यर्थ शोधतो
आठवणीतल्या तुला
माझ्या अश्रू मध्ये रोज भेटतो !!

मनोज कित्येक वेळ त्या कट्ट्यावर बसून होता. सुमेधाच्या आठवणींच्या सहवासात ...!!!

*समाप्त*

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...