मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न..(कथा भाग १)

"माझ्यासारखा नतध्रष्ट आणि स्वार्थी माणूस शोधूनही सापडायचा नाही. हो करतात काही लोक माझ्या लिखाणाचं कौतुक !! पण ते सगळं निरर्थक !! तुम्ही म्हणालही कदाचित!!  एवढा मोठा लेखक स्वतः बद्दल हे काय लिहून ठेवतोय. पण जे काही आहे ते खरेच आहे !! दादांच्या जाण्याने या सगळ्या गोष्टी नजरेस पडल्या एवढंच. कोणी डॉक्टर झाले , कोणी मोठ्या हुद्द्यावर पोहचले. पण आम्ही झालो एक मूर्ख लेखक. ज्याला ना सुरुवात ना अंत! उगाच शब्दांशी खेळत बसायचं हाच तो काय आमचा प्रपंच!! आणि आत्मचरित्र म्हणजे आमच्यातला वेडा माणूस उगाच सर्वांना दाखवायचा! बाकी मी फक्त लिहिणारा, आता यातून काय हाती लागते ते तुमचे तुम्हावर सोपवून मी हा प्रपंच करतो आहे. दादांच्या जाण्याने आयुष्याची खरतर दुसरी बाजू सुरू झाली. मंदा सारखी सर्वगुण संपन्न बायको आयुष्यात आली , काही दिवसात सुनील माझा मुलगा आमच्या आयुष्यात आला. पण दुःख याचंच होत की दादा!! माझे वडील हे सर्व पाहायला नव्हते. नाही म्हणायला तेवढी माझी आई आजही माझी सोबती आहे. मी आत्मचरित्र लिहितोय म्हटल्यावर शेजारच्या कुमी बद्दल त्यात काही लिहू नकोस असं तिने अगदी गमतीने सांगितल.!! आता कुमी कोण हा प्रश्न नसावा एवढीच माफक अपेक्षा !! असो, या पुस्तकाच्या रूपाने मी अगदी स्वतःशीच पुन्हा भेटेन!!  तारुण्याची मज्जा अगदी दुरून का होईना अलगद पाहून घेईन ..!! " आप्पा वहीत लिहिताना अचानक दरवाजा वाजू लागला बाहेरून आवाज आला.
"आप्पा !! आप्पा!! जेवायला येताय ना ?? "सुनील विचारू लागला.
"अरे आलोच !!" असे म्हणत आप्पा दरवाजा उघडून बाहेर आले.
"काय हो आप्पा !! एवढं काय लिहीत असता हो दरवाजा बंद करून ??"
"वेडेपणाचे खेळ रे सगळे !! बाकी काही नाही!! आमच्या सारख्या शब्द वेड्यांना काय असणार ध्यास दुसरा !!  प्रियसिची तगमग !! शांत निथळ समुद्र !! आणि एक वेडा प्रेमी!! " आप्पा मनसोक्त हसत म्हणाले.
"चला आता !! " सूनीलही हसत हसत स्वयंपाक घरात जाऊ लागला.
"आज दक्षिणोत्तर दिशा एकाच बाजूला येऊन बसल्या की काय !!! "
" अगदीच अस काही नाही !! पण आप्पांच्या खोली पासूनच एकत्र आल्या आहेत !! "  आप्पा अगदी गमतीने म्हणाले.
" बरं चला जेवायला बस!!! " आजी आप्पांची आई अचानक मध्येच म्हणाली.
जेवायला बसताच आप्पांच्या आपल्या आई सोबत कित्येक गप्पा चालू झाल्या. अचानक मंदा मध्येच म्हणाली.
"पुढच्या वर्षी सूनीलला आपण तालुक्याच्या कॉलेजात घालुयात !! शिकून मोठा झाला तर  त्याचच कल्याण होईल !! "
"आई मी कुठंही जाणार नाहीये !! "
"तुला शिकायचं नाहीये का पुढे ??"मंदा एकदम रागात येत म्हणाली.
"तसं नाहीये पण मला दुसरं काही करायचं आहे !! माझी स्वप्न माझी ध्येय वेगळी आहेत..!! " सुनील अगदी जोरात म्हणाला.
"अरे हो पण तू ते तिकडे जाऊनही करू शकतोस ना ??" आप्पा अगदी मध्यस्था सारखे बोलले.
"नाही !! मला ते इकडेच राहून करायचं !! "
"कशाच काही नाही करायचं त्याला !! नुसतं फिरायचे आहे !! "
"आई तू आता काहीही बोलू नकोस बर!! "
"अरे जेवताना तरी नकोस ना बोलू त्याला !!" आई मंदाकडे पाहत म्हणाली.
"आहो पण कधीतरी हे बोलायलाच हवं ना!!"
"मला ना बोलायचं नाहीये तुम्हाला !! "  सुनील अगदी रागारागाने ताटावरून उठून गेला.
"अरे सुनील !! थांब जेवण तरी करून जा !! " आप्पा पाठमोऱ्या सूनीलकडे पाहून म्हणाले.
  कित्येक वेळ पुन्हा आप्पा आणि मंदा दोघेच बोलत बसले.
"मंदा यापुढे तू त्याला कसलाच विषय बोलू नकोस !! "
"आहो, पण मी त्याच्या भल्यासाठीच बोलत होते ना!!!"  मंदा डोळ्याला पदर लावत म्हणाली.
"मंदा हे वयंच अस असतं की मन दुसऱ्या कोणाचं ऐकतंच नसतं !! काहीतरी करायचे आहे म्हणून धडपडत असत !! आणि मंदा मी सुनीलच्या डोळ्यात ती चमक पाहिली आहे !! मला वाटतं आपण त्याला बळजबरी करू नये !! "
"आता तुम्हीच असे म्हणताय म्हटल्यावर प्रश्नच मिटला.!! " मंदा निघून जात म्हणाली.
आप्पा खोलीत येत कित्येक विचारांशी बोलत होते. मनात कित्येक शब्द खेळत होते वहिवर येण्यास उत्सुक होते.
"आत्मचरित्र लिहिताना कदाचित मी किती श्रेष्ठ आहे हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन !! पण ते सगळं ढोंग असेल !! मी हट्टी आहे !! मनाला हवं ते करणारा आहे!! कॉलेजात होतो तेव्हा तर भयंकर हट्टी!! कोणाला विचारायचं नाही !! मनाला वाटेनं ते करणारा !! एकदा असेच दादांच्या सोबत जेवायला बसलो होतो, तेव्हाचा एक प्रसंग,
"कारे सदा !! " आता सदा कोण ते विचारू नका तो मीच सदाशिवराव उर्फ आप्पा.
"फुकणीच्या !! तुला पोस्टात नोकरी लावून देतो म्हटलं तर सरळ नाही म्हणालास.
"दादा!!! आहे एवढ्या मोठ्या जमिनदाराच्या पोरान पोस्टात काय नोकरी करावी बर !! "
"अरे !! जमीनदार मी !! मेल्या तुझी ती लायकी काय रे !!  उद्या वाटलं तर  एक दमडी तुझ्या नावे करणार नाही की रे !! "
"नका करू !! " मी अगदी सरळ बोलून गेलो.
"आयुष्याचे काही गणित मांडलेस की असेच फुकाचे दिवस ??" दादा अगदी ताटावर दोन बोट चढून म्हणाले.
"हो मांडलेत तर !! पण वेळ आल्यावर सांगेन !! "
"मेल्या उद्याची उद्या तालुक्याला निघून जा !! "
"दादा मला काहीतरी वेगळं करायचं आहे हो !!! " अस म्हणत मी ताटावरून उठून निघून गेलो.
यावरून दादांचं आणि माझ नात अगदी कस होत हे कळेन. पण अगदीच हाडवैर अस काही नव्हतं. दादांचं प्रस्थ काही वेगळंच होतं . ते मला नेहमी म्हणायचे,

"स्वप्नातल्या ध्येयास तू
उगाच फुंकर घाल
वेड्या मनास आज तू
उद्याची साद घाल
नसेल सोबती कोणी तरी
एकटाच तू पुढे चाल
मागे उरले काय ते पाहण्या
मनास आवर घाल..!!

मागे उरले काय ते पाहण्या .. मनास आवर घाल!! " दादांच्या ओळी सतत मनात असायच्या . आयुष्यात ध्येय गाठायचे असेल!! तर काय राहिले हे पहात बसण्यात व्यर्थ वेळ दवडू नकोस असे ते नेहमी सांगायचे...!!"
अचानक मंदा खोलीत आली. आप्पा लिहिता लिहिता थांबले.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...