मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न ..(कथा भाग २)

"काय म्हणता मंदा देवी ??" आप्पा मंदाकडे हसत हसत म्हणाले.
"देवी काय हो !!"
"नाही ,मगाशी आपलं वेगळंच रूप पाहिलं !! म्हणून वाटलं मला!! "आप्पा खुर्चीवरून उठंत म्हणाले.
"पोराची काळजी वाटली म्हणून बोलले !! "
"सुनीलची ती काळजी काय करायची मंदा !! आपला पोरगा हुशार आहे!!"
"दिसत तर नाही कुठे !! नुसते फिरण्यात वेळ वाया घालत असतो !! " मंदा आप्पांकडे पहात म्हणाली.
"नाही ग मंदा !! आपलं पोर अस करणार नाही बघ !! मध्यंतरी फुलेंच पुस्तकं वाचताना पाहिलं त्याला !! टीळकांचे पण विचार बोलत होता मध्ये !! डोळ्यात नुसते तेज !!" आप्पा हातात लिहिलेला कागद पाहात म्हणाले.
"त्यांनी पोट थोडंच भरणार आहे?? मला त्याच्या भविष्याची काळजी वाटते !! " मंदा.
"करेल ग नक्की काहीतरी करेन आपलं पोर !! बरं चला झोपा आता, लवकर उठायचं ना उद्या !! " मंदा आप्पांकडे होकारार्थी मान हलवत बघत होती.
  पाहता पहात किरणाची एक माळ पूर्वेकडून आली आणि साऱ्या आसमंतात भरून गेली. सुनील सकाळची न्याहारी आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मंदा त्याची लगबग पाहात होती.
"आज कुठे मग ?? आणि ती सोबतीन आली नाही ती अजून ??" मंदा अगदी जोरात म्हणाली.
"आई सोबतीन काय !! मैत्रीण आहे माझी ती !!" सुनील हतातली पिशवी आवरतं बोलत होता.
"वागते तर तशीच !!! " तेवढ्यात दरवाज्यातून कोणीतरी येत आहे अस मंदाला वाटलं, आणि ती म्हणाली.
" या आपलीच कमी होती !!"
"काकू सुनील ???" सुनीलची खास मैत्रीण आणि त्याची सोबतीन उमा मंदाकडे पाहत म्हणाली.
"हे काय आवरतच आहे तो ..!! "मंदा सुनीलकडे हात करत म्हणाली.
सूनीलची खास मैत्रीण म्हणजे उमा. आता हे दोघे बाहेर काय करतात ते मंदाला सांगूनही कधी कळलं नाही. त्यामुळे त्याचे कित्येक अर्थ काढून ती मोकळी होत असे.
"आई !! आज यायला थोडा उशीर होईल बर !!" अस म्हणत सुनील बाहेर निघून  गेला.
उमा आणि सुनील त्यांच्या रोजच्या जनजागृतीच्या कामास लागले.
"आज कुठे पथनाट्य घ्यायचं म्हटलीस तू उमा??"
"अरे शेजारच्या गावातील बोरुवस्ती म्हणून आहे तिथे !!" उमा सुनीलकडे पाहात होती.
"चला मग !! आणि आपले मित्र कुठे आहेत ?? "
"पोहचले असतील कधीच तिथे !! "उमा आणि सुनील बोरुवस्तीत जाऊ लागले.
सुनील काहीतरी वेगळं करेन या आप्पांच्या वाक्यात कुठे तरी स्वानुभव होता हे नक्कीच. उमा आणि सुनील तिथे पोहचताच त्यांनी वस्तीतल्या लोकांसमोर पथनाट्य सुरू केले. काहीतरी वेगळं आहे की काय अशा नजरेत सारे बघत होते. सुनील आणि उमाचा खणखणीत आवाज साऱ्या वस्तीत फिरत होता.
"अरे यारे !! अरे यारे !! अरे यारे !! यारे यारे यारे!!" सुनील मोठ्याने म्हणाला. आजूबाजूला लोक जमा झाले.
"आहो ताई !! आक्‍का  !! काका !! आणि तात्या !! यारे यारे !!! " उमा म्हणाली.
"सांगतो एक गोष्ट
तुम्ही लक्ष देऊन ऐका
पोरीस द्या शिक्षण
आणि शान वाढवा बरका!! "

अरे यारे !! अरे यारे !! आमचं काही ऐका रे !!!

घराचा दिवा पोरगं जणू
घराची वात पोरगी असते
घरात सारे शिकले तर
घराची प्रगती होत असते

अरे यारे !! अरे यारे अरे यारे !! " सुनील आणि त्याचे सोबती सगळे मिळून म्हणू लागले .
  तेवढ्यात गर्दीतून कोणी एकाने सुनीलच्या दिशेने दगड भिरकावला. सुनीलच्या तो डोक्यावर लागला. रक्त आले. कोणी तो एक गर्दीतून म्हणाला.
"निघा रे इथुन लवकर !! तुमची मती बुडाली पण आमची नका बुडवू !! पोरीच शिक्षण म्हणजे!! धर्म बुडाला म्हणजे !! हाकला रे यांना !! " गर्दी आक्रमक झाली.
सुनील अचानक डोक्याचे रक्त पुसत उभारला.
"अरे धर्म शिक्षणाने बुडत नाही !! आणि मुलगी तर दोन घरांची वात !! जाईल तिथे उजेड करेन !!"
"ये तू आम्हाला नको शिकवू रे !! " अस म्हणत सुनील, उमा आणि त्यांच्या मित्रांना वस्तीतून बाहेर काढलं.
घरी येताच मंदाने सारा प्रकार पाहिला. आणि ती रागाने लालबुंद झाली. कित्येक वेळ ती सुनील आणि उमाला बोलत होती. डोक्यावर मलमपट्टी करून सुनील घरी आला आणि मंदा चिडली. तो राग आईच्या मायेचा होता हे सुनीलला कळायला वेळ लागला नाही. रात्री जेवताना आप्पांना सगळी कहाणी सांगून सुनील  आप्पांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता.
"स्त्री ही खूप मोठी शक्ती !! आणि ती शिकली तर समाज अजून पुढे जाईन !! सुनील तुझ्या या कार्याला खरंच  खूप सलाम !! बदल घडेल!! नक्की घडेल !! फक्त तो बदल करण्याची ताकद कमी पडता कामा नये !! " आप्पा सुनीलच्या डोळ्यात पाहात म्हणाले.
"आप्पा !! खरंच तुमच्या या विचारांनी मला अजुन प्रेरित केले !! "
सुनील आणि आप्पा कित्येक वेळ बोलत बसले. रात्री बोलून झाल्यावर आप्पा आपल्या खोलीत आले. लेखणी हातात घेत लिहू लागले.
" कधी कधी आपण आपल्याच बालपणास , तारुण्यास!! आपल्या मुलात पुन्हा पुन्हा अनुभवत असतो. सुनीलच्या रूपाने मला माझे कित्येक जुने क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता आले. पण त्याच्या जन्माच्या आधी आठ दिवस स्वातंत्र्यासाठी कोठडीत राहावं लागलं होत हे आज खुप आठवतं. गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याची आवृत्त्ती आम्ही इकडे आमच्या गावात केली. दादांना काहीही न सांगता मी सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी झालो. पोलिसांनी त्या नंतर आठ दिवस आम्हाला कित्येक अत्याचाराणी त्रस्त केले.  आम्ही मात्र एक पाऊलही मागे झालो नाही. पुन्हा नंतर सोडले तेव्हा दादांची प्रतिक्रिया बाकी मोलाची होती.
"सदा माझ्या पोरा !! देशासाठी झटतो आहेस पाहून मनाला आनंद झाला..!! अरे ते टिळक ,बापू म्ह्णजे या स्वातंत्र्य संग्रामाचे अग्निकुंड रे !! पोरा अभिमान वाटतो तुझा !!!" अगदी मनसोक्त दादा बोलले.
आप्पा हातातली लेखणी खाली ठेवत खोलीतल्या दिव्याकडे एकटक पहात राहिले, कित्येक वेळ.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...