मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न ..!! (कथा भाग ६)

"एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती हा प्रयत्न !!एक एक ओळ सुंदर व्हावी म्हणून मी तरी किती कागदांच्या पानांना चुरागळून टाकून द्यायचं! आणि हा अट्टाहास फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ना!! आज माझ्या लिखाणाचा शेवट माझा मुलगा आज समाज , देश यासाठी काही तरी करतो आहे याने व्हावा यापेक्षा दुसरी स्वप्नपूर्ती ती काय! पण आजही एक स्वप्न अधुरेच राहिले आणि ते कधीच पुरे झाले नाही. दादांच्या समोर मला कित्येक गोष्टी बोलायच्या होत्या. माझ्यातील एका यशस्वी लेखकाची त्याना भेट घडवायची होती. माझ्या उभरत्या काळात, त्याच्या सारखा दुसरा आत्मविश्वास देणारा कोणी नव्हता. आज ती खंत मला सतत बोलते. पण मुलाच्या या कार्याने मन शांत होते!! बघते पुन्हा स्वतःतील कित्येक स्वप्नात जे पूर्ण झाले काही अधुरे राहिले!! पण आयुष्य म्हटलं की काहींना काही सुटनारच ना!! काही स्वप्न पुर्ण होतात काही अधुरी राहतात!! माझ्या यशस्वी लेखकाची एक कादंबरी दादांच्या हाती द्यायचं स्वप्न अखेर आजही अधुरेच राहिले!! माझ्या स्वप्न या माझ्या आत्मचरित्रात हे स्वप्न अधुरेच राहिले!! पण पुरे झाले ते आभाळाला ही आनंदाने बरसायला सांगेन असे माझ्या मुलाचे स्वप्न !! एक बाप म्हणून त्यासारखा आनंद नाही!! "आप्पा लिहीत राहिले

"बरसल्या सरी अगणित वेळा
त्या शांत कराया मातीस
तूही प्रयत्न कर अगणित वेळा
मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस

कडाडली वीज अगणित वेळा
भेटायला त्या मातीस
तूही लख्ख प्रकाशित जा
चालायला त्या स्वप्न पुर्तीस

बरसून जा अगणित वेळा
अधुऱ्या त्या स्वप्नांच्या पूर्तीस ..!! " आप्पा लिखाण करून शांत बसले.
कित्येक वेळ ते लिहिलेल्या त्या ओळी गुणगुणत राहिले.
"आप्पा !! " सुनील बोलावू लागला.
"आलो रे सुनील!!" म्हणत आप्पा बाहेर गेले.
"काय रे !! "आप्पा.
"सकाळ झाली आणि तुम्ही अजुन लिहिताय !! आप्पा रात्रभर झोपला नाहीत ??"
" अरे लिहिण्यात इतका मग्न झालो की लक्षातच नाही आल!!" आप्पा बाहेरच्या अंगणात बघत म्हणाले.
"बरं चला !! आशीर्वाद द्या !! आणि सोबत चला आमच्या !! "सुनील आप्पांना बाहेर घेऊन येत म्हणाला.
"अरे पण कुठे ??" आप्पा विचारू लागले.
"चला तर सांगतो !! " सुनील आप्पांना म्हणाला.
आप्पा आणि मंदा दोघांनाही घेऊन सुनील शाळेकडे चालू लागला. शाळा जवळ येताच सगळेच दिसू लागले. उमा , सारे मित्र , रखमा , सुहास , आजी, चंदा ,तारा आणि बोरुवस्तितल्या बायका आणि मुले , सारे वाटच पाहत थांबले होते.
"काय रे हे सुनील !!" आप्पा आणि मंदा दोघेही विचारू लागले.
"आई !! आप्पा !! या शाळेच्या नव्या स्वप्नाची वाट आता सुरू झाली आहे !! आमच्या सर्वांची इच्छा आहे की आप्पा तुम्ही आज या साऱ्यांना, आम्हाला मार्गदर्शन करावं !! आणि आमच्या नव्या वाटेस बळ द्यावं.!!" उमा म्हणाली.
"अरे पण !! " आप्पा.
"पण नाही आणि काही नाही!! "उमा आणि सारे लोक त्या नव्या शाळेत बसले.
आप्पा साऱ्यां समोर उभा होते. त्यांना बोलायला.
"खरंतर मी काय बोलावं हाच खरा प्रश्न आहे !! तुम्ही मुल इतकी हुशार आहात की माझ्या शब्दांनाही कदाचित आज विचार करावा लागेल. स्त्री शिक्षण !! खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही!! माझ्या सारख्या लेखकाला एका स्त्रीने घडवल ती माझी आई !! तिला त्या जुन्या समाजाने शिकू नाही दिल पण तिने घडवलं आमचं घर !! मग स्त्री शिकली तर अजुन किती बदलून जाईल ना सारं हे !! मुलांनाही शिकायला हवं !! पण या देशासाठी काहीतरी करायचं म्हणून शिकायला हवं !! धर्म शिक्षणाने कधीच बुडाला नाही !! उलट कोणताही धर्म आपल्याला प्रत्येकाला कसं जगायचं हे शिकवत असतो!! मग कोणता धर्म तुम्ही शिकू नका असे म्हणेन?? " टाळ्यांचा आवाज सगळीकडे झाला.
" मी जास्त काहीच बोलत नाही !! पण मुलगी आणि मुलगा हा भेद विसरून जायला हवा !! तिलाही शिकायचा अधिकार आहे हे नक्की !! या शाळेत तुमच्या भविष्याची स्वप्न कित्येक घडणार आहेत!! त्या स्वप्नांना फक्त तुम्ही रंग भरा !! आयुष्य खूप सुंदर होईल!! " आप्पा आपल बोलणं पूर्ण करून सर्वांना भेटू लागले.
कार्यक्रम आटोपून आप्पा आणि मंदा आता शाळेतून घराकडे जायला निघाले.
"मंदा !! खरंच आज सूनिलचा मला अभिमान वाटतो !!"
"मंद डोळ्यातले पाणी टिपत म्हणाली.
"होणं !! खरंच !! स्वतःसाठी कोणीही जगेन !! पण समजासाठी जगणं खरंच खूप वेगळं!!"
आप्पा आणि मंदाला जाताना सुनील आणि उमा पाहू लागले. आत शाळा सुरू झाली. कित्येक मुले शाळेत शिकायला आले.
"उमा !! हे तर स्वप्न पूर्ण झालं !! पण अजुन एक तसंच राहील आहे !! " सुनील उमाकडे पाहत म्हणाला.
"कोणते रे ??" उमा चेहऱ्यावर कित्येक भाव बदलत विचारू लागली.
"तुझ्या सोबत सार आयुष्य जगायचं स्वप्न !! ते तू हो म्हणालीस तर पूर्ण होईल !!" सुनील हसत म्हणाला.
उमा थोडा वेळ शांत झाली. सूनिलकडे हसत पाहत म्हणाली.
" माझं ही एक स्वप्न आहे !! आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची !! तू हो म्हणालास तर पूर्ण होईल !! "
उमा असे म्हणताच दोघेही मनसोक्त हसले. एकमेकांकडे पाहत राहिले. मागे शाळेतून आवाज येऊ लागले.
" तर लक्षात असू द्या !! अ अननसाचा !! कशाचा सांगा बरं !! " वर्गातून सुहासचा आवाज येत होता.
"अननसाचा !! " सगळे विद्यार्थी एकदम म्हणाले.

समाप्त

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...