मुख्य सामग्रीवर वगळा

अधुरे स्वप्न !!!

  "कुठेतरी ती सांज तुझी आणि माझी वाट पहात असेलच ना !! तो खळखळ आवाज करणारा समुद्र !! त्याच्या त्या लाटा आजही तुझ्या आणि माझ्या येण्याची वाट पाहत असतीलच ना !! तो मावळतीकडे जाणारा सूर्य कदाचित उद्या मला एकटा पाहून कित्येक प्रश्न विचारेल !! त्याला मी काय उत्तर द्यावं!! हे तरी सांगून जा !! ज्या वळणावरती आपण रोज भेटायचो तिथे मी एकटाच कित्येक दिवस तुझी वाट पाहत बसलो तर त्या वाटेवरचे ते पारिजातक माझ्यावरच रुसून बसेल ना!! मग आयुष्यभर साथ देण्याच वचनं दिलेली तू मला एकांताच्या या काळया रात्रीत का सोडून जावीस !! सांग ना ??" त्या अबोल सायलीकडे पाहून कित्येक वेळ सोहम एकटाच बोलत होता. आपल्या मनातलं सारं काही तिला सांगत होता.
सायली एकटक फक्त त्याच्याकडेच पाहतच होती. कित्येक वेळ शांत होती. सोहम फक्त तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतं होता.
"सायली हा तुझा अबोला मला खरंच खूप त्रास देतोय !! बोल काहीतरी !! शेवटचं एकदा मनातलं सगळं सांगून टाक मला !! कदाचित तुझ्या या बोलण्याने माझ हे हृदय तू नसताना रडणार तरी नाही!! "
"मला खरंच कळतं नाहीये रे सोहम मी काय बोलावं !! तुझ्या असण्याने मला पूर्णत्व आहे !! माझ्या कित्येक भावना तुझ्याशीच बोलतात रे !! पण माझ्या सोबत कदाचित तुझ्याही आयुष्याला काही अर्थ नसेल !! तुला अजुन खूप काही करायचं आहे !! मला त्यात गुंतवू नकोस एवढंच सांगेन मी तुला !! " सायली डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.
"पण का ?? कालपर्यंत आयुष्यभर सोबत राहायचं वचन देणारे आपण आज काय झालं की वेगळं व्हावं ??" सोहम कित्येक मनातले भाव शब्दात आणत होता.
" मी नाही सांगू शकत तुला सोहम !! पण कदाचित आपण वेगळं होण चांगलं !! कदाचित मलाही !! आणि तुलाही !! माझ्या या आयुष्याची कथाच वेगळी आहे !! नियती कदाचित माझ्याशी कित्येक डाव मांडून बसली आहे !! मी यात गुरफटून गेले !! आणि कदाचित यातून कधी बाहेर पडेल असे वाटत नाही !! " सायली सोहमचा हात हातात घेत म्हणाली.
"मला हेच कळतं नाही!! प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांना सांगणारे आज अस काय झालं की तू काहीतरी माझ्यापासून लपवते आहेस !!" सोहम.
"काही गोष्टी आपल्या सोबतच गेल्या तर बरं असतं सोहम !! त्याने समोरच्या व्यक्तीला त्रास कमी होतो !!" सायली सोहमच्या डोळ्यात पहात म्हणाली.
"पण तू सोडून जाते आहेस यापेक्षा मोठा त्रास कोणता असेल मला !!!सायली आयुष्यभर हे मन मला खात राहील !!" सोहम डोळ्यातले अश्रू पुसुत म्हणाला.
"मला विसरून जा सोहम !! एवढंच म्हणेल मी !! माझ्या नसण्याने या हृदयाला तू उगाच त्रास नकोस करून घेऊ !! "
"इतकं सोपं असतं ते ??"
"कदाचित इतकं अवघडही नसेल सोहम !!"
"तू विसरून जाशील मला ??"
"हो !!"  सायली सोहमच्या नजरेस चुकवून म्हणाली.
"आपण ज्याला सर्वस्व मानलं !! ज्याला आपण आपलं हृदय दिलं !! त्याला इतकं सोप असतं विसरण ??" सोहम स्वत:ला सावरत म्हणाला.
"मनाला समजवाव लागतं !! ते कदाचित हट्ट करत पण त्याला शांत करावं लागतं !! या मनाचं तरी किती ऐकावं आपण !! " सायली सोहम पासून लांब जात म्हणाली.
"कदाचित सायली तुझा निर्णय झालाय !! तू फक्त सांगायला आलीस ना??"
"हो !! मला यापुढे कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नकोस !! कारण मी तुला सापडणार नाही !! शोधायचं असेल तर त्या चांदण्यात शोध मी तिथेच असेल तुझ्यावर प्रेम करतं !! " सायली आकाशाकडे पाहत म्हणाली.
"हे बघ तू काय म्हणतेय मला काही कळत नाही !! पण मला वाटतं तू जावू नयेस !! " सोहम तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
"सोहम मला जावच लागेल रे ! माझ्याकडे वेळ नाहीये !! " सायली आपला हात सोडवत म्हणाली.
"म्हणजे काय ??"  सोहम जाणाऱ्या सायलीकडे फक्त बघत राहिला.
कित्येक वेळ फक्त पाहत राहिला. त्या एकांतातल्या काळोखास बोलत.
"वेळ नाही म्हणजे !!! नक्की म्हणायचं तरी काय आहे सायली तुला ?? माझ्यासाठी वेळ नाही की!!! प्रेमाच्या या वाटेवर तू मला अस का सोडून गेलीस ते तरी सांगायचं होतस!! हक्काने प्रेम केलं होतस मग एवढाही हक्क ठेवला नाहीस तू मला, की मी तुला पुन्हा बोलावून घ्यावं. सायली हे प्रेम असेच असते का ग??? आपल्याला  वाटेल तेव्हा आपण एखाद्यावर करायचं आणि वाटेल तेव्हा त्याला एकटं टाकून निघून जायचं !! पण बघ ना सायली !! तुझ्यावर रागावू की तू गेल्याच दुःख मनात ठेवू!! तू का गेलीस सोडून हेच मला कळलं नाही !! तुझ्याकडे वेळ नाहीये !! पण तो माझ्यासाठी का अजुन काही?? ते तरी सांगायचं !! पण नाही. या एकट्या काळोखात मला अखेर तू एकटं सोडून गेलीसच!! " सोहम कित्येक वेळ शांत बसून होता.
जणू कित्येक वेळ गालावरचे अश्रू त्याला बोलत होते..

विसरून जाशील मला तू
की विसरून जावू तुला मी
भाव या मनीचे बोलताना
खरंच न कळले शब्द ही

वाट ती रुसली माझ्यावरी
की वाट ती अबोल तुलाही
वळणावरती ते पारिजातक
सुकून गेले ते फुलंही

ती सांजवेळ शोधते तुला
की त्या सांजवेळेस सोबती मी
समुद्राच्या कित्येक ओढीस
बोलते ती लाटही

न तुला पाहिले मी
की मला शोधले तू
काळया रात्रीस या मग
बोलतो तो एकांतही

आठवणीत शोधतो मी
की आठवणीत राहतेस तू
अबोल या नात्याचे आपुल्या
अधुरेच राहिले स्वप्नही..!!

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...