मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ...!!(अंतिम भाग)

विशाल आता शांत होता. त्याच्या नजरे समोर फक्त प्रिती होती. त्याला बोलावंसं वाटत होत, पण बोलता येत नव्हतं. त्याची बोलण्याची धडपड पाहून प्रिती म्हणाली.
"तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!" प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिचा हात धरत विशाल तिला नकारार्थी मान हलवून लागला. कदाचित त्याला म्हणायचं होत "अखेरच्या या क्षणात माझ्या समोरून तू कुठेही जाऊ नकोस प्रिती!!"
प्रिती पुन्हा बसली. त्याला बोलू लागली.
"अरे डॉक्टरला बोलावून आणते !! "  पुढे तिला बोलवेना ती शांत झाली.
तिच्या हातात त्याचा होत होता. तो आयुष्याची शेवटची घटका मोजत होता. चूक कोणाची यावर स्वतःशीच भांडत होता.
"नाही!! ती आज माझ्या समोर आहे !! आणि मला तिला काहीही दोष द्यायचा नाहीये !!! त्या देवाला कशासाठी भांडू मी, या शेवटच्या क्षणी की..!! आयुष्यभर त्याने मला एका खोलीत खितपत मारलं म्हणून, का आनंद मानू त्याचे की त्याने माझ शेवटचं मागणं तरी ऐकलं.!! पण मी म्हणेन आता कसला राग आणि कसलं काय!! या इतक्या वर्षात या खोलीत कधीच इतकं मोकळं वाटलं नाही, ते प्रितीच्या नुसत्या समोर पाहिल्याने वाटलं मला!! मी नाही दोष देणार कोणालाच !! ना तिच्या वडिलांना , ज्यांच्या रागाची शिक्षा आयुष्यभर मला भोगावी लागली, मग नको आता आरोप प्रत्यारोपाच हे घोंगड!! आता फक्त शांत होउन जायचं आहे !!" विशाल शेवटच्या त्या क्षणांना कित्येक मनातलं बोलत होता.
"प्रिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे !!  कदाचित हे सांगायला मी उद्या नसेल !! पण माझ्या आठवणींचा पसारा तुला सगळं काही सांगून जाईल!! उरल्या माझ्या प्रेमाची हीच तुला भेट असेल !! आठवण !! अगदी कायमची!!" विशाल निशब्द झाला. क्षणांशी त्याचा संवाद संपला.
"विशाल !! विशाल !! " प्रिती विशालला उठवत होती.
"मारिया , बघ ना विशाल उठतं नाहीये!ये विशाल !! तुझे हात किती गार पडले आहेत रे !! उठ बरं !! आपण मस्त उबदार त्या शेकोटी जवळ बसुयात !! ये विशाल!!" प्रिती भावनिक होऊन बोलू लागली.
मारिया प्रितीला सावरू लागली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"कदाचित मी यायला उशिरच केला विशाल , पण तुझ्या असण्याची जाणीव मला नीट जगू देत नव्हती हे मात्र खरं!! मी रमले माझ्या संसारात!! पण तुझं प्रेम कधीच मी विसरले नाही!! तुझी एक सोबत तेवढी होती मला !! पण आज खऱ्या अर्थाने तू मला एकटं केलंस !! तू कुठेतरी आहेस !! सुखात आहेस कदाचित !! ही जाणीव मला जगण्यासाठी प्रेरणा देत होती!! तुझ्या या प्रितीला माफ कर विशाल!! " प्रिती कित्येक वेळ अश्रू ढाळत होती.
"मला एकटं सोडून गेलासचं ना विशाल बेटा!! आता या म्हातारीने कोणाकडे बघून जगायचं हे तरी सांग !! मारिया!! ही तुझी हाक कानावर पडावी म्हणून माझे कान आतुर असायचे!! तुझ असणं माझ्या म्हातारीच्या जीवनाला एक आधार होता!! तू अपंग जरी होतास तरी मला तुझा आधार होता !! विशाल पुन्हा ये माझ्या बाळा !! ही मारिया तुझ्या तोंडून ती हाक ऐकण्यासाठी वाट पाहते आहे रे !! " मारिया विशाल जवळ बसून त्याच्या चेहऱ्याकडे बघत मनाशीच कित्येक वेळ बोलत होती.
"हे बंधन झुगारून मी कदाचित मोकळा होईल असं मला वाटतं होत !! पण मी अडकलो इथेच पुन्हा!! प्रितीच्या अश्रूंमध्ये !! मारियाच्या त्या हाकेमध्ये ..!! मी अडकलो या नव्या बंधनात पुन्हा !! ज्यातून माझी कधीच सुटका नाही !! त्या प्रितीच्या प्रत्येक अश्रुत मी अडकलो!! त्या तिने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मी अडकलो!! ते अपंग होऊन त्या पलंगावर पडून त्या बंधनात राहणं किती सोप होत ना?? पण हे नवे बंध कदाचित मला आता पुन्हा नव्याने जखडून घेत आहेत !! ही बंधने कदाचित मला झुगारून देता येणार नाहीत !! कधीच नाहीत !! कारण मी उरलोय तिथेच फक्त आता !! त्या आठवणीत !! त्या नव्या बंधनात !! " विशालची ती शांत मुद्रा खूप काही सांगून जात होती. जणू शांत तो विशाल कित्येक भाव नकळत सांगून जात होता.
"अखेरच्या क्षणात मी तुझ्या सोबत होते, यापेक्षा त्या देवाने अजून काय द्यावे मला विशाल!! माझ्या या कवितेत अखेर उरलाच तू..

उरल्या क्षणात आता
शोधू मी कुठे तुला
सावल्याही आज माझ्या
अबोल का झाल्या मला

श्वास जणू आज हे
साथ न देता तुला
आठवणीच्या या खोलीत
छळते ते का मला

सांग मनीचे आज सारे
न कोणते बंधन तुला
खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला

खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला!! " पण बोलायला विशाल तू राहिलासचं कुठे !! मला एकटं सोडून गेलास !!! " प्रिती  एकटक पाहत होती.
  अखेर त्या जळत्या चितेत जणू सारी बंधने जळत होती. पण ती शरीराची , मनाची बंधने तशीच होती. आठवणीत , त्या क्षणात , त्या हृदयात !! अगदी कायमची. प्रिती आणि मारिया कित्येक वेळ त्या जळत्या चितेकडे पाहत बसली होती. आपल्या विशालला शेवटचं बंधनातून मुक्त होताना पाहत होती.

*समाप्त*

©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...