मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ..✍(कथा भाग २)

सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी.
" उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!"  विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
"काय विशाल बेटा , झाली का झोप??" मारिया खोलीत येत म्हणाली.
"हो !! " विशाल शेजारच्या पुस्तकांकडे पाहत म्हणाला.
मारिया आपल्या कामात व्यस्त झाली. विशाल एकटक खिडकीतुन बाहेर पाहत होता. जणू ते सूर्याचं तेज त्याला खूप काही बोलत होतं.
"रोजच कसं प्रसन्न होऊन जगायचं!! आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्यांना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही !! नाही का ??
" विशाल !! विशाल !! " मारिया विशालकडे पाहून बोलू लागली.
विशाल आपल्याच विचारात मग्न होता. मारियाच्या आवाजाने तो भानावर आला.
"काय मारिया !! "
"तुला, चहा हवाय??" विशालच्या होकारार्थी उत्तराने मारिया खोलीतून बाहेर निघून गेली.
विशाल आज सकाळपासून पलंगावर होता. मारिया चहा घेऊन आली आणि हातात तिच्या काहीतरी आहे हे विशालने पाहिलं.
"काय आहे ते ??"
"पत्र आहे!! " मारिया चहा विशालकडे देत म्हणाली.
"कोणाचं ??" विशाल कुतूहलाने विचारू लागला.
"प्रिती सरदेसाई!!" मारिया पत्र विशालकडे देत म्हणाली.
विशालला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. या आधी प्रितीच पत्र कधीच आल नव्हतं. आज अचानक तिचं पत्र आलं आणि विशाल निशब्द झाला.
"तूच !! तूच वाच पत्र !! " विशाल मारियाकडे पत्र देत म्हणाला.
मारिया पत्र हातात घेत वाचू लागली.
"नमस्कार निरंजन !! " मारिया विशालकडे पाहू लागली.
"मी निरंजन या नावाने पत्र लिहीत होतो !! " मारिया काहीच न बोलता पुढे वाचू लागली.
"तुमचे कित्येक पत्र मला मिळाली , माझ्या लिखाणावर इतकं प्रेम करणारे कोणी वाचक आहेत ह्याचा मला खरंच खूप आनंद झाला. खूप शोधल्या नंतर मला तुमचा पत्ता मिळाला. तरी माझी एक इच्छा आहे , की मी पुढच्या आठवड्यात तुमच्याच गावी येणार आहे. तरी मला तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे !! माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं !! त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे !! तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच !! तर भेटुयात नक्की !! " मारिया पत्र वाचून शांत झाली.
"मला भेटायचं म्हणते !! नाही .!! मला नाही भेटायचं पण तुला !! " विशाल अचानक अस्वस्थ झाला. खूप काही बोलू लागला.
"मारिया !! कागद आणि पेन घेऊन ये !! मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे !! मारिया जा ना !! घेऊन ये लवकर !!! " विशाल उठण्याची धडपड करू लागला. आणि अचानक पलंगावरून खाली पडला.
खाली पडलेल्या विशालला सावरायला मारिया पुढे आली आणि म्हणू लागली,
"अरे !! येऊ देत ना विशाल !! त्याने काय होणार आहे !! तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ !!"
"नाही मारिया !! ती मला भेटू नये कधी !! ती आली तरी तिला सांग !! मी नाही म्हणून !! "
प्रिती विशालला भेटायला येणार या विचाराने विशाल अस्वस्थ झाला.
"कशाला येणार आहेस मला भेटायला !! निरुपयोगी मला पाहायला !! की अजून स्वतः ला त्रास करून घ्यायला !!! नको प्रिती तुला नाही सहन होणार हे !! मी एक रुबाबदार !! तुझ्यासाठी वाट्टेल ते करणारा विशाल !! असा असाहाय पहायचा आहे का तुला ?? देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत !! हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे !! " विशाल प्रितीच्या त्या पत्रास हातात घेऊन विचार करत होता.
मारिया त्याला कित्येक वेळ समजावत होती.
"मारिया !!आपण एक महिनाभर कुठे निघून जाऊया का ??"
"बेटा !! मी तुला अस काही करू देणार नाही !! "
"पण मला तिला भेटायचं नाहीये !! " विशाल मोठ्या आवाजात बोलत होता.
"तू नकोच भेटू तिला !! एक लक्षात ठेव !! तू कदाचित लपवून ठेवशील तुझं हे दुःख आयुष्यभर तिच्यापासून !! पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल !! " मारिया अगदी मनापासून सांगत होती.
विशाल मारियाच्या या बोलण्याने शांत झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
प्रिती सुधा निरंजला भेटायला अतुर झाली होती. कधी एकदा त्याच्या समोर जाऊन,
"तुला माझ लिखाण इतक आवडत, की तू त्या लिखाणातील माझे भाव कसे काय ओळखू शकतोस ??" हेच जणुकाही तिला विचारायचं होतं.
"आपल्या अगदी जवळच्या कोणीतरी आपल्याशी बोलल्या सारखं का वाटावं. निरंजनच पत्र आलं की ते वाचायची एवढी ती काय उत्सुकता असावी बर मला!!  की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी!! जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला !! खरंच किती वेड असेल ना ते माझ मन !! ते आजही त्याचाच विचार करत !! कुठे असेल?? कसा असेल ?? काही काही माहीत नाही !! माहिती तर एकच !! त्याच प्रेम !! " प्रिती निरंजन ला भेटण्यासाठी आतुर झाली. आपल्याच वहीच्या पानांना खूप काही सांगू लागली.

क्रमशः

©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...