मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ...!✍ (कथा भाग ४)

"तुझ्यासाठी कित्येक कविता लिहिल्या विशाल !! माझ मन मला सांगत होत, तू कुठेतरी नक्कीच वाचत असणार!! पण ते असं !! याचा कधीच विचार मी केला नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं !! एक प्रेयसी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून यावं !! एवढीच इच्छा होती माझी!!" प्रिती विशाल समोर व्यक्त होत होती.
"पण .. ते ... अस भेटावं .. अस मला ..ही नको होत!! " विशाल हळू आवाजात प्रितीला बोलू लागला. बोलताना  त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला.
हे सगळं पाहून प्रिती त्याला सावरायला पुढे आली. मारिया बाहेर विशालसाठी पाणी आणायला गेली.
"तू गेल्या नंतर कित्येक दिवस मला काहीच सुचत नव्हते!! आई आणि बाबांनी नंतर लग्नासाठी हट्ट धरला
, आणि लग्न केले. पण त्या नंतरही मला तुला विसरण अवघड होतं. पण संसार मात्र चांगला केला. आपल्या प्रेमाचं दुःख संसारावर पडू दिलं नाही. तुझ्या आठवणी होत्याच सोबत , नंतर लिखाणाला सुरुवात केली. तुला तिथे जपलं , माझ्या जवळ ठेवलं. अगदी कायमचं!! " प्रिती विशालला खूप काही सांगु लागली.
तेवढ्यात मारिया खोलीत आली. पाण्याचा ग्लास प्रितीकडे देत ती म्हणाली.
" पाणी !!!"
प्रिती मारियाकडे पाहत पाण्याचा ग्लास घेत विशाल जवळ आली. विशालला मानेला अलगद आधार देत थोड उठवत पाणी पाजू लागली. पण पाणी पिताच विशालला खोकला लागला.
"हळू !!" प्रिती.
"मारिया , तुला आठवत !! जेव्हा तू आम्हाला पहिल्यांदा सोबत पाहिलं होतस तेव्हा काय म्हणाली होतीस!!"
प्रिती ग्लास तिच्याकडे देत बोलू लागली.
"आठवत ना !! " मारिया थोड स्मित करत म्हणाली.
"पण बघ ना !! आज मात्र मी तशी नाहीच !! खूप काही बदल झाला आता !!" प्रिती.
तेवढ्यात विशाल काहीतरी बोलू लागला. मारिया आणि प्रिती त्याच्याकडे पाहत होत्या.
"मी तरी... कुठे .. आता तसा ... राहिलो... मीच मला हरवून गेलो !! या बंदिस्त खोलीत हरवून गेलो .... हरवून ... गेलो... !! " विशाल स्वतः ला सावरत म्हणाला.
"गप्प बस !! उगाच ....!!" प्रितीला पुढचं बोलवेना. ती खोलीतून बाहेर गेली. तिच्यामागे मारिया ही आली.
"मारिया !! मला खर खर सगळं सांग !! विशालची ही अवस्था का झाली. तो असा अंथरुणाला खिळून का आहे??? सांग मारिया !!" प्रिती मारियाल विचारू लागली. कित्येक अश्रू तिला बोलू लागले.
"प्रिती !! कस सांगू !! विशाल !!! " मारिया खोलीकडे पाहू लागली.
"मारिया !! त्याला मी काही बोलत नाही!!"
मारिया आता प्रितीला सगळं सांगायचं या निर्धाराने बोलू लागली.
"तुझ्या आणि विशालच्या प्रेमाला खरंतर तुझ्या बाबांनीच वेगळं केलं प्रिती !!"
हे ऐकताच प्रिती प्रश्नार्थक मुद्रेने मारीयकडे पाहू लागली आणि म्हणाली.
"माझे बाबा !! कसे काय !! आणि विशालच्या अवस्थेला ते कसे जबाबदार ??"
"तुला भेटायचं म्हणून विशाल त्या दिवशी घरातून बाहेर पडला. पण तुला भेटायच्या आधी त्याला तुझ्या बाबांची भेट झाली. त्यांचा तुमच्या या नात्याला विरोध होता. विशालने खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते नाहीच समजू शकले. बोलताना तुझ्या बाबांचा राग अनावर झाला आणि !!!" मारिया बोलता बोलता थांबली.
"पुढे काय मारिया !! " प्रिती अगदिक होऊन म्हणाली.
"पुढे जे झाल ते तू पहातेच आहेस !! तुझ्या बाबांनी रागात विशालला धक्का दिला !! रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे दोघे, पण तुझ्या बाबांच्या धक्क्याने विशाल रस्त्याकडे फेकला गेला . रस्त्यावरून जाणारे वाहन विशालला धडकले!! आणि त्याला त्यात त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले!!" मारिया डोळे बंद करून ते सगळं बोलू लागली.
"नाही मारिया !! हे सगळं खोटं आहे !! "
"पहिल्यांदा मलाही हे खरं वाटलं नाही !! पण जेव्हा तुझे बाबाच त्याला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा त्यांनीच मला हे सगळं सांगितलं.!! त्याची चूक झाली अस ते म्हणाले !!" मारिया.
प्रिती हे सगळं ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावं तेच कळेना. कित्येक क्षण दोघीही शांत होत्या. मारिया पुन्हा बोलू लागली.
"हे सगळं घडल्या नंतर तुझे बाबा रोज विशालकडे येत होते !! आपल्या केलेल्या चुकीची माफी मागायला. पुढे आज कित्येक वर्ष या खोलीत तो पडुन आहे !!  त्यामुळे कित्येक आजारांनी त्याला त्रस्त केलंय!!"
"पण बाबांनी हे केलं ! माझ्या प्रेमाला अशी शिक्षा का?  प्रेम मीही केलं होत !! मग त्याची शिक्षा मला द्यायची !! " प्रिती मनातलं बोलू लागली.
तेवढ्यात खोलीतून आवाज आला. प्रिती आणि मारिया दोघीही पळत खोलीत गेल्या.
"विशाल !! विशाल !! " प्रिती विशालच्या जवळ जात बोलू लागली.
"मारिया !! विशालला दवाखान्यात घेऊन जाऊयात का?"
मारिया काहीच बोलली नाही. ती फक्त पाहत होती.
"तुला .. शेवटचं .. पहायचं .. ही एकच .. इच्छा होती माझी !! पण तेही माझ्या ... आठवणीतून .. तू मला कधी ... पुन्हा ... भेटूच नये ... असच वाटायचं ... " विशाल अडखळ त बोलत होता.
"का ?! माझ्या लिखाणावर प्रेम केलंस !! मग ती पत्र पाठवलीस !! निरंजन म्हणून पाठवलेलं प्रत्येक पत्र मला निरंजनाचा नाही ,तुझ्या प्रेमात पाडत होत !! पुन्हा पुन्हा!! मी फक्त तुझ्याच सारखा अजून कोण आहे हेच पाहायला आले होते !!" प्रिती विशालच्या हात हातात घेत म्हणाली.
विशाल फक्त हसला. तिचा हात घट्ट पकडत तो बोलू लागला.
"तुझ्या लिखाणाने ... मला तू... माझ्यापासून ... दूर .. आहेस असं .. कधी .. वाटलच नाही ... !! न. .. राहवून मी तुला ..... पत्र लिहायचो....! मला तुझ्या त्या ... चार .. ओळी खूप .. आवडतात..... पहिल्या ... पावसाच्या .... सरी "

प्रिती पुढे त्या ओळी म्हणू लागली.
"पहिल्या पावसाच्या सरी
हळुवार भिजली ती माती
त्या मातीच्या वासात जणू
आठवांचा गंध गवसला

तुझ्या असण्याची ती जाणीव
प्रत्येक थेंबात तुला शोधून
त्या थेंबात जणू मज तेव्हा
तुझाच चेहरा पुन्हा दिसला

कश्या पुन्हा नव्याने आता
त्या वेली जणू बहरल्या
साऱ्या हिरवळती जणू मज
नव्याने मज तू भेटला

दाटून आल्या आभाळी
ढगांच्या कित्येक लहरी
हळुवार वाऱ्यासवे तेव्हा
जणू तूच सख्या, पुन्हा बरसला

अगदी मनसोक्त !!!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत शांत झाली. क्षणभर ती स्वतःलाही हरवून बसली भानावर येताच ती विशालकडे पाहू लागली. विशाल शांत होता .
"विशाल !!! विशाल !!! " प्रिती विशालकडे पाहून बोलू लागली.

क्रमशः ...

©✍योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...