मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध.. ✍(कथा भाग २)

"मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! " सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
"ती शोधत तरी काय होती बरं ?? " सुहासला त्या कागदाची आठवण झाली. तो पटकन स्वयंपाक घरात गेला. समोरच तो कागद होता. त्याकडे पाहून सुहास विचार करू लागला.
"प्रियाला नक्की हाच कागद हवा आहे का !! हा कागद मला प्रिया काल जिथे पडली तिथेच मिळाला होता !! बघुयात तरी !!" सुहास कागद उचलून तो वाचू लागला.
"प्रिया .. मला माहितेय तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे !! तुझ्या वडिलांच्या हट्टामुळे तुला त्या सुहास सोबत लग्न करावं लागलं ते !! पण तू आजही परत येऊ शकतेस !! तुला माहितेय मी तुझ्या नवऱ्या इतका श्रीमंत नाहीये!!पण तरीही मी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन !! तुझ्या पोटात वाढणार बाळ आपलंच आहे !! आणि त्याबद्दल तू तुझ्या नवऱ्याला काहीच बोलू नकोस !! फक्त अजून काही दिवस, आपलं काम झाल की तू माझ्याकडे निघून ये !!! .... तुझाच .. विशाल ..." सुहास पत्र वाचून सुन्न झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना. एकटक त्या पत्राकडे तो पाहत बसला.
  "वेडी आशा लावून बसलो होतो मी !! आज नाहीतर उद्या कधीतरी प्रिया माझी होईल!! ती जुनं सार विसरून मला आपलंसं करेल !! पण नाही !! सार काही संपलय आता!! ज्या व्यक्तीला आपलं कधी व्हायचं नाही !! ज्याला आपल्या अश्रूंची साधी कवडी किंमत ही नाही अशा व्यक्तीला का माफ करायचं मी!!! नाही!!! आता उठतो नी माझ्या आयुष्यातून हाकलून देतो तिला..!! पण तिला पहिल्यांदा पाहिलं होत तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो ना!! त्याच काय !! नाही नाही !!!!! नाही!! बस्स्.!!! " डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रुला खूप काही बोलायच होत.पण तरीही सुहास शांत होता..
"सुहास !! " बाहेरून प्रिया सुहासला बोलावत होती.सुहास स्वतः ला सावरत बाहेर गेला.
"काय ??" सुहास प्रिया जवळ जात म्हणाला.
"माझा एक महत्त्वाचा कागद मिळत नाहीये !! तू पाहिलास का??"
सुहास त्याला काहीच माहीत नसल्याचे भाव करत.
"नाही पाहिला!! काय एवढं महत्त्वाचं होत !!"
"अरे विशेष काही नाही !!"  एवढ बोलून प्रिया निघून गेली.
  प्रियाने सगळी खोली शोधली पण तिला विशालने लिहिलेले पत्र कुठेच मिळाले नाही. ती हताश होऊन मनात कित्येक विचार करू लागली. तिला ती चिठ्ठी सुहास वाचेल याची भीती वाटू लागली.
" विशाल माझ्यावर किती प्रेम करतो !! आजही त्याला भेटल्यावर सार जग कुशीत घेतल्या सारखं वाटतं!! पण हा सुहास आमच्या मध्ये कधी आला कळलंच नाही!! हा माझा आयुष्याचा जोडीदार फक्त समाजाला दाखवण्या पुरताच आहे !! पण खर माझं प्रेम माझा विशालचं आहे !! एकदा का काम झाल की मी, विशाल आणि आमचं बाळ !! एवढचं जग असेल आमचं !! या सुहासची सावलीही नको मला पुन्हा!! " तेवढ्यात दरवाजा वाजला आणि प्रिया सावध झाली.
"प्रिया !! तुला कोणीतरी भेटायला आले आहेत !!" सुहास दरवाजातून म्हणाला.
"आता यावेळी कोण आल आहे अजून !!" प्रिया सुहासला पाहत म्हणाली.
"विशाल !!!" सुहास प्रियाच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
विशालच नाव सुहासने घेताच प्रिया थोडी गोंधळली. तिला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती तडक बाहेर धावतच गेली.
खोलीच्या बाहेर येताच प्रिया सगळीकडे पाहू लागली.
"इथे तर कोणाचं नाहीये !! "
"आहे ना !! विशाल आहे ना !" सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
"ही काय थट्टा लावली आहेस सुहास तू ??" प्रिया रागात विचारू लागली.
"थट्टा कुठे !! खरंच आलाय विशाल भेटायला तुला!! " सुहास प्रियाच्या पोटावर कान ठेवून म्हणू लागला.
" हा काय विशाल !! हा बघ तुला भेटायला आला आहे !!! "
"बरं !! म्हणजे तू पत्र वाचल आहेस तर !!"
"हो !!! " दुःख वाटलं की एवढ प्रेम करूनही तुला माझ प्रेम कधी कळलं नाही !! त्याच उत्तरही मिळालं !! हा विशाल !!  समाजाच्या लाजे खातर इथे माझी बायको असल्याचं फक्त एक नाटक करते आहेस तू !! " विशाल मनातलं बोलत होता.
"हो आहेच माझ त्याच्यावर प्रेम !! तू माझ्या आयुष्यात येण्या आधीपासून!! खरतर तूच आमच्या प्रेमाच्या मध्ये आलास !! " प्रियाच्या डोळयात राग दिसत होता.
"हो मग तू जाऊ शकतेस !! त्या विशालकडे !! मी तुला कधीच अडवत नाहीये !!"
"नाही !! मला ते करायचं नाहीये !!"
"पण का ??" सुहास अनावर होऊन म्हणाला.
"माहीत नाही !!" प्रिया एवढचं बोलून निघून गेली.
  सुहासच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा खूप आघात झाला. तो अबोल झाला, त्याने स्वतःला अंधाऱ्या खोलीत बंद करून घेतले. तो अंधार त्याला काही सांगत होता..
"सुहास !! या अंधाराची सोबत खूप वाईट रे !! जेव्हा आपले दुरावतात तेव्हाच याची आठवण येते !! याला सुखही माहिती नी दुःखही..सुख त्या एकत्रीत क्षणाचे !! आणि दुःख त्या एकटेपणाचे!!  जी कधी तुझी झालीच नाही तिच्याबद्दल अश्रुंते काय वाहू द्यायचे !! जे नात कधी सुरूच झाल नाही त्याच दुःख तरी काय करायचं ..!! ती तुझी फक्त पत्नी झाली!!! सहचारिणी झालीच नाही !!

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे
आजच्या क्षणात थोडे
जगायचे राहून जायचे

भेटलेच नाहीं असे
नाते तरी काय जपायचे
दूर त्या क्षणात कोणी
अनोळखी वाट पाहायचे

बघ एकदा वाट बदलून
नव्या आकाशात फिरायचे
भेट त्या एका वळणावर
खूप काही सांगून जायचे

उगाच टिपूस गाळून
कालचे दुःख भिजायचे ..!!"  होणं !! सुहास त्या अंधारात हरवून गेला होता.

क्रमशः ..

✍© योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...