मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध ..✍(कथा भाग ३)

"भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली. मग हे नात आहे तरी काय ?? खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का ??  त्या मनाच काय?? त्याला खरंच त्या नात्याला सात जन्म टिकवायचं आहे का ?? "  सुहास त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता.
"सुहास !! बाहेर ये !! मला तुला बोलायचं आहे!!" बाहेरून प्रिया सुहासला बोलावू लागली.
कित्येक वेळ प्रिया त्याला बोलावत होती. पण तो आलाच नाही. अखेर कित्येक वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते.
" हा काय वेडेपणा लावलायस तू सुहास !! एवढ काही आकाश कोसळलं नाहीये !!" प्रिया उद्धांपणे सुहासला बोलत होती.
"खरंच म्हणतेयस तू !! एवढ काही झालचं नाही!!" प्रियाच्या डोळयात पाहत सुहास म्हणाला.
" मला वेगळं व्हायचं आहे सुहास !!! मला घटस्फोट हवाय !!" प्रिया शांत बोलत होती.
"ज्या नात्यात काही अर्थ राहिलाच नाही त्याला जपून तरी काय करायचं !! " सुहास प्रियाकडे न पाहताच बोलत होता.
"तेच म्हणायचं आहे मला !! पण ..!!!"
"पण काय ???" सुहास विचारू लागला.
"मी वाईट आहे, असं मनाला कधी वाटून घेऊ नकोस!! मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी!!" प्रिया .
"तू आताही जावू शकतेस प्रिया!!मला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता !!" सुहास डोळ्यातील ओघळणाऱ्या आश्रुला आवरत म्हणाला.
प्रिया काहीच न बोलता निघून गेली. सुहास जागच्या जागी बसून राहिला. सगळं काही आवरून प्रिया घरातून बाहेर पडली, ती थेट गेली विशालकडे.
"विशाल !! विशाल !! "
"कोण आहे ??"
"मी आहे प्रिया !!" प्रिया विशालला पाहताच त्याला मिठी मारतच म्हणाली, विशालाल ती अचानक समोर आली हे पाहून आश्चर्य वाटलं.
"प्रिया !! तू इथे कस काय??"
"मी सुहासला सोडून आले विशाल !! कायमची !! "
"काय वेडेपणा आहे हा ??" विशाल थोडा चिडक्या स्वरात म्हणाला.
"पण आपलं ठरलं होत ना !! मी त्याला सोडून येणार!! आणि आपण एकत्र येणार ते !! "
"हो पण ते आता नाही !!" विशाल तिला लांब करत म्हणाला.
"मग कधी विशाल..!! मला नाही राहायचं तिकडे आता !!!" प्रिया अगदीक होऊन म्हणाली.
"आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुहासला सहन करावचं लागेल प्रिया !!"  विशाल मनातलं बोलला.
प्रिया एकटक विशालकडे पाहत होती.
" किंवा तू परत गेलीस तरी चालेल प्रिया !! माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे !! "  विशाल मनातले कित्येक विषारी विचार बोलत होता.
प्रिया आणि विशाल कित्येक वेळ बोलत बसले. पण सुहास मात्र आता एकटा पडला होता. त्याच्याकडे प्रियाच्या आठवणीं शिवाय काहीचं उरलं नव्हतं. त्या आठवणीतून तो काही गोड क्षण शोधत होता.
   "हा ऐकांत मला किती छळतो पण त्याच ते छळन मला आता हवंहवंसं वाटायला लागलं आहे !! कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार !! खोटी नाती !!! खोटं हासू !! खोटी वचने !! सारं काही खोटं वाटायला लागलं होतं !! पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही !! कारण तिचं अस्तित्व असतं ..!! अगदी कायमचं !! त्या घरात!!! त्या मनात कुठेतरी !!! होना !! प्रिया गेली !! अगदी कायमची सोडून गेली!! जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे !!माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं !! पण ती आनंदी असेल तिच्या जगात, हेच महत्त्वाचं !!
  तो एकांत सुहासला खूप काही बोलू लागला. त्याच्या प्रत्येक क्षणाला विचारू लागला. इतक सार मिळवूनही अखेर तू एकटाच का?? सुहास मात्र शांत बसू लागला. त्या क्षणाला काहीच बोलत नव्हता. कारण क्षण सारे निरर्थक वाटू लागले होते.
आता दिवस आणि रात्र सारे एकच वाटू लागले. सुहास आपल्या कामात व्यस्त होता. मनात काही शब्द होते .. आठवणीतले.

"नात्यास नाही म्हणालो तरी
आठवणी कश्या पुसल्या जाणारा
नाही म्हणून ती वाट टाळली जरी
त्या मनास कोण आवर घालणार

होतील किती रुसवे नी फुगवे
किती काळ मग दूर राहणार
आज नी उद्या पुन्हा त्या घरात
भेट अशी मग त्यासवे होणार

हो !! चिडले ते क्षण काही आज
उद्यास मग ते विसरून जाणार
नको त्या कटू आठवणीं सोबत
गोड हासू तेव्हा त्यात शोधणार

असेच हे नाते जपायचे
अखेर काय हाती उरणार
संपतील हे श्वास जगायचे तेव्हा
सारे काही  इथेच राहणार ..!! "

" अगदी खरं आहे !!! सार काही इथेच राहणार !! " सुहास स्वतः ला पुटपुटला..

क्रमशः

✍©योगेश खजानदार
 

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...