मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध..✍(कथा भाग ४)

"माझ्या आयुष्यात कधी प्रिया नव्हतीच !!  अस मनाला कितीही सांगितलं, तरी ते तिची आठवण पुन्हा करून देतं ना !! म्हणे मी मधे आलो तिच्या आणि विशालच्या प्रेमात !!  ती एकदा म्हणाली असती तरी मी त्याच्या मध्ये आलो नसतो..!! " सुहास स्वतःशीच बोलत होता. अगदी मनात भांडत होता स्वतःशीच.
तेवढ्याच दरवाजा वाजला. बाहेरून कोणी सुहासला बोलावत होत.
"सुहास !! "
"कोण आहे !! " सुहास दरवाजा उघडत म्हणाला.
"मी आहे प्रिया !! "
सुहासला हे ऐकुन आश्चर्य वाटल्या शिवाय राहील नाही. तो दरवाजा उघडतो तोच प्रिया त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिला सावरत सुहास म्हणाला.
"काय झाल प्रिया !!! "
"सुहास !! खरंचं माझं चुकलं!! मी तुला सोडून जायला नको होत !!" प्रिया रडक्या चेहऱ्याने बोलत होती.
"हो पण झाल काय ???"
"सुहास !! तो खूप वाईट आहे !! त्यानं मला कित्येक स्वप्न दाखवली !! पण सगळी खोटी ठरली!! "
" त्याने तुला काही केलं तर नाही ना ??"  सुहास म्हणाला.
"खूप त्रास दिला मला त्याने !! विशाल खरंचं खूप वाईट आहे सुहास !! आज मला त्याच खरं रूप कळलं!! ते प्रेम खोटं होत !! ते सगळं खोटं होत सुहास !! माझी खरंच खूप मोठी चूक झाली!!! " प्रिया कित्येक अश्रू वाहत बोलत होती.
"आधी तू शांत हो प्रिया !! आत ये !! शांत बस इथे, आणि काय झाल ते नीट सांग !! " सुहास तिला शांत करत म्हणाला.
प्रिया जवळच्या खुर्चीवर बसली. सुहास तिच्या जवळ बसला. तिला शेजारीच ठेवलेल्या पेल्यातल पाणी देत म्हणाला,
"जे झाल ते एक वाईट स्वप्न होत अस समजून आपण विसरून जावूयात प्रिया !! नव्याने सुरुवात करुयात आपल्या नात्याची !! तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही कधी मी अंतर देणार नाही !!प्रेम केलं आहे प्रिया मी तुझ्यावर !! तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत मी तुला साथ देईन याच वचन ही दिलं आहे तुला !! त्या सात फेऱ्यांमध्ये !! सगळं पुन्हा नव्याने सुरुवात करू !!" सुहास प्रियाकडे पाहत बोलत होता. तिला आपलंसं करत होता.
"इतकं सोपं आहे सुहास ??"
"इतकं अवघडही नाही !! " सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला.
"मला खरंच काय बोलावं ते कळत नाहीये!!" प्रिया थोडी शांत होत म्हणाली.
"माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे प्रिया !! तू करू शकते पुन्हा नव्याने !!"
   प्रिया फक्त सुहासकडे पाहून हसली. पण काही क्षणांपुरतेच. तिच्या हसण्यात कदाचित जुने सारे दुःख लपले होते. त्यानंतर प्रिया आणि सुहास कित्येक अश्रू पुसून आनंदाने राहु लागले. सुहासला सार काही हवंहवंसं वाटू लागलं. त्याच्या मनात प्रिया बद्दल अजून प्रेम वाढू लागलं.
"खरंच सार अचानक बदलून जावं !! आणि वठलेल्या झाडालाही पालवी फुटावी. अस काहीस माझ्या आयुष्यात झालंय !! जे नात संपलं म्हणून मी आसवे गाळत होतो , ते नात नव्याने फुलाव !! खरंच माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही!! सार काही आता मला सुंदर वाटतंय!! होणं !! आपल माणूस आपल्या जवळ असलं की कस सुंदर वाटत ना!! प्रिया!!! माझ जिच्यावर मनापासुन प्रेम आहे ती ,आता माझ्यावरही प्रेम करायला लागली असेल ना!! सार काही स्वप्न तर नाहीना ???" सुहास स्वतःलाच विचारू लागला.

"अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी

सांगून कानात या निघून जावी
अल्लड हसून मज वेड लावी
प्रेम मनातले पाकळ्यात लपवावी
हातात येताच लाजून पहावी

कधीं दिसताच उगाच रुसवी
खोट्या रागास गालावर आणावी
प्रेमात साऱ्या चिंब भिजावी
जणू कळी आयुष्य फुलवून जावी..!!"

होणं !! ही कळी किती सुंदर आहेना !! माझं हे रुक्ष आयुष्य पुन्हा फुलवल या कळीने !!" सुहास गालातल्या गालात हसत मनातच बोलत होता.
  प्रिया पुन्हा आयुष्यात आली म्हणून सुहास खूप आनंदी होता. प्रियाही आता पुन्हा पहिल्या सारखं वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला होणाऱ्या बाळाचा काहीच दोष नव्हता ना?? मग त्याला मारायचं का ?? अस सुहास म्हणाला आणि त्याने प्रियाची आणि त्या बाळाची काळजी घ्यायची ठरवल.
"प्रिया !! " सुहास तिला बोलावत होता.
"काय रे सुहास !! "प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"बाहेर येतेस माझ्या सोबत ??"
"हो चल ना !! "
प्रिया आणि सुहास दोघेही समुद्र किनारी फिरायला गेले. सार काही चांगलं चालू होत. कित्येक वेळ मजा मस्ती करून दोघेही घरी आले.
"तू बस !! अस अवघडल्या अवस्थेत जास्त त्रास करून घ्यायचा नसतो प्रिया !! "
"अरे पण आपल्या दोघांना मस्त कॉफी करते ना मी ??"
"नाही मी करतो !! तू बस !!" सुहास आग्रह करू लागला.
"अजिबात नाही !! कॉफी तर तुला माझ्याच हातची देणार मी !!" प्रिया जागेवरून उठतं म्हणाली.
"नाही !!" सुहास तिला अडवत होता. पण प्रिया काहीच न ऐकता तडक स्वयंपाक घरात गेली .

क्रमशः ..

✍©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...