मुख्य सामग्रीवर वगळा

विरुद्ध..✍(कथा भाग ५) अंतिम भाग.

"किती गोड क्षण असतात ना !! आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत, आणि त्या व्यक्ती सोबत कित्येक वेळ बोलत बसायला लावणारी ती एक कॉफी !! त्या समुद्रावरील माझे आणि प्रियाचे सोबतीचे क्षण किती सुंदर होते ना !! आणि आता हे काही क्षण !! " सुहास हॉलमध्ये बसून विचार करत होता.
तेवढयात प्रिया कॉफीचा कप घेऊन आली.
"सुहास !! घे कॉफी !! "प्रियाच्या डोळयात वेगळीच चमक दिसत होती.
"बस ना!! " सुहास कॉफीचा कप घेत म्हणाला.
"तुझ्या सोबतचे हे क्षण कधीच विसरणार नाही मी प्रिया !! खरतर सगळं संपलं म्हणून मी हताश झालो होतो!! पण तू अचानक आलीस आणि जगण्याची नवी प्रेरणा मिळाली !! पुन्हा नाहीना मला सोडून जाणार ??" सुहास कित्येक डोळ्यातले भाव बोलत होता.
"नाही !! कधीच नाही !! " प्रिया थोडी तुटक बोलली.
"घेणं !!! तुझ्यासाठी खास बनवली आहे मी कॉफी !! " प्रिया कॉफीचा एक घोट घेत म्हणाली.
"मग तर घ्यायलाच हवी !! " सुहास कॉफी घेत म्हणाला.
"क्या बात है !! तुझ्याच सारखी झाली आहे कॉफी !! एकदम सुंदर !! " सुहास कप बाजुला ठेवत म्हणाला.
"सगळं काही विसरून नव्याने नात सुरू करण्याची मजाच काही वेगळी असते ना !! "
सुहासच्या या बोलण्याला प्रियाने फक्त एक हासू देऊन प्रतिक्रिया दिली.
"विशालच्या नादी लागून  खरंच खूप मोठी चूक केली रे सुहास !!" प्रिया अगदी शांत बोलत होती.
"जाऊदे !! जे होत ते चांगल्यासाठीच होत !! " सुहास थोडा अस्वस्थ होऊ लागला.
"पण यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही सुहास !! " प्रिया त्याच्याकडे पाहून बोलत होती.
"यापुढे ...!!!"सुहास बोलता बोलता थांबला. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची धडपड बघून प्रिया त्याच्या जवळ आली.
"काय होतंय सुहास !! "
"काही नाही !! थोड बैचेन वाटतंय मला !!"
"शांत बस जरा !! बरं वाटेल !! " प्रिया त्याला बसवत म्हणाली.
"नाही !! खूप ... कसतरी होतंय मला...!! चक्कर येते!! प्रिया ....!!!!!" सुहास स्वतःला सावरत होता.
"होणारच ना सुहास !! "प्रिया भेसूर हसत म्हणाली.
सुहास जमिनीवर कोसळला. प्रिया फक्त बघत होती. त्याची मृत्यूशी धपडपड चालली होती.
"तुला कायमच माझ्या आयुष्यातून घालवायला आले होते सुहास मी !! तुझ्या नंतर ही सगळी संपत्ती माझी होणार !!! मी आणि विशाल मजेत राहणार !! तुझ्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नको होती मला सुहास !! मला  माफ कर !! पण तुझ्या जाण्यातच माझं सुख आहे !!" प्रिया मनातलं विष ओकत होती.
सुहास कित्येक वेळ धडपडला. आयुष्याशी अखेर जुंज संपली. विश्वासाची किती मोठी किंमत मोजावी लागली.
"तुला माहितेय !! अखेरच्या क्षणी सुद्धा माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होत प्रिया!! विश्वास होता त्याचा घात केलास तू !! अखेर तुझ्या मागुन विशाल येताना मी पाहिला आणि डोळे मिटले !! अगदी कायमचे !!! " सुहासचां प्रत्येक अखेरचा श्वास त्याला बोलत होता. तो शांत पडला होता.
"आणि अखेर माझ्या या देहाला ती शिक्षा भेटलीच पाहिजे !! त्याला त्या मागच्या अंगणात पुरून टाकलं म्हणे यांनी !! नाही ती शिक्षा त्याला व्हायलाच हवी !! कारण त्याच्यातील मला त्याची शिक्षा मिळते आहे !! सुटका नाहीच ना !! इथेच या घरात आजही मी तसाच आहे !! विश्वास आणि विश्वासघात या दोघांचे भांडण बघत !!   शेवटच्या श्वासानंतर ती मला कधीच दिसली नाही !! विष दिलं मला तिने !! तिला वाटलं माझी सुटका झाली!! पण त्या नंतर या घरात माझ्या शिवाय पुन्हा मला कोणंचं दिसल नाही!! धुळीत पडलेले ते कॉफीचे दोन कप आजही तसेच आहेत !! कोणी त्याला उचलतंही नाही !! कारण कोणी आता इकडे येतही नाही !! "
"मी म्हटलं होत ना ही कथा माझी आहे !! विश्वासाला तडा जाणारी आहे !! खरतर सांगायची नव्हती मला !! पण तरीही मी सांगीतली आहे !! कारण या मृत्यू नंतरच्या या शिक्षेतून मला खरंच सुटका हवी आहे !! कुठे आहे प्रिया !! जिच्यावर मी इतके प्रेम केले !! तिला बोलावून घ्या इकडे आणि मला या एकांताच्या शिक्षेतून सोडवं म्हणून सांगा !! ना मला भूक आहे !! ना मला तहान !! ना मी अस्तित्व आहे !!ना आभास !! हो मी एक झुळूक आहे !! ज्याला ना कुठे जायचे आहे !! ना कुठे थांबायचे आहे.!! "
शेवट माझा अजूनही अपूर्ण आहे ....

*समाप्त*

✍©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...