मुख्य सामग्रीवर वगळा

आई बाबा तुम्ही अडाणी आहात ?? || Prashn Uttar ||

  आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक आईला ऐकावी लागणारी ही वाक्य आता अगदी सवयीचा एक भागच झाली आहेत. बाबांबद्दल ही हेच होत. पण नव्याने तारुण्यात आलेल्या मुलांना आपल्या आई बाबांबद्दल हे का वाटत असावं याच आश्चर्य वाटावं अस काही नसतं. प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा advance असते, वागण्यात ,बोलण्यात अगदी राहणीमानातही. मग बदल जो होतो तो पुढच्या पिढीला आउटडेटेड वाटायला लागतो. पण थोडा विचार केला तर आई बाबाही त्यांच्या वयात तेवढेच advance होते हे त्यांचे जुने फोटो पाहिल्यावर चटकन लक्षात येत. आईला लतादीदी खूप आवडतात आणि मुलांना श्रेया घोषाल. पण मुलांना हे लक्षात येतं नाही की जसे जसे दिवस सरत जातात तसे आपणही नकळत जुन्या गोष्टीत अडकून राहायला लागतो. अगदी आठवणीतली गाडी, शाळा , मित्र, आवडता पेहराव यातच आपणही गुंतून जातो आणि मग आपणही आउटडेटेड व्हायला लागतो. हो ना ?? मग विचार येतो की खरंच आई आणि बाबा अडाणी , आउटडेटेड  आहेत का ?? तर नाही !! तेही रमले त्याच्या पिढीत जसे पुढे जाऊन आपणही रमु!!




  Fashion , lifestyle या गोष्टी सतत बदलतं राहता. आपल्यापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता advance झाल्या तर आई बाबा अडाणी कसे होतील ?? नाही का !! त्यामुळे आई बाबा नेहमीच advance असतात हे लक्षात येतं, कारण , आपण जेव्हा शाळेत असतो तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेजची तयारी केलेली असते. आपण धडपडतो तेव्हा त्यांनी सावरायची तयारी केलेली असते. ते गुरफटलेले असतात आपल्याला advance आणि up-to-date ठेवण्यासाठी. कधी कधी राहून जातं शिकायचं कारण आपल्याला पुढे शिकवण्यासाठी. त्यामुळें मग या गोष्टी राहूनच जातात. तुम्ही त्यांना अडाणी म्हणाल पण हे कधी विसरू नका की आपल्याला शिक्षित करायलाही तेच कारणीभूत असतात. कुठे परिस्थिती थोडी वेगळी असते , आई आणि बाबा त्यांच्या गरिबीमुळे , त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे शिकुच शकत नाहीत. पण त्यांनीं आपल्याला शिकवलं मग ते अडाणी आहेत हे म्हणून कसे चालेल. शाळा शिकली, दोन पुस्तकं वाचली तर माणूस शिक्षित होतो, अस जर वाटत असेल तर हा गैरसमज पहिला मनातून काढून टाका. कारण शिक्षण आणि जीवन यात खूप अंतर असतं. शिक्षण तुम्हाला जगण्याचा मार्ग देतो तर अनुभव तुम्हाला या मार्गावर चालण्याची ताकद, आणि अशावेळी कित्येक अनुभवातून शिकत गेलेली पिढी आपल्या मुलांना शिकून फक्त माणूस नाही तर एक चांगला माणूस कसा असावा हे बनवते. त्यामुळे आई आणि बाबा अडाणी कधीच नसतात कारण त्यांच्या सोबत शिक्षण नसेल तरी संकटाना सामोरे जाण्याचा अनुभव असतो.

जेव्हा अगदी आपण मनापासून या सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतो तेव्हा आईचा तो साधेपणा , त्या outdated गोष्टी हव्या हव्याशा वाटायला लागतात. बाबांचा तो जुना चष्मा अगदी आपल्याला ऊर्जा देऊन जातो. कारण या गोष्टी आपल्याला सांगत राहतात की भलेही कितीही आपण advance झालो, तरी आपण आपल्या जिथे आठवणी जोडल्या जातात त्यांपासून दूर नाही जाऊ शकत. मग हेही कळायला लागतं की बदल तर होतच राहतात पण यात आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला up-to-date ठेवण्याची जास्त गरज आहे. मग एक वय अस येत की बदल म्हणजे नकोसा वाटायला लागतो.  शेवटी आपणही आई बाबा झाल्याशिवाय ह्या गोष्टी कळतच नाही. आईचं ओरडणं, बाबांचा धाक या गोष्टी अगदी नव्याने भेटाव्या अस वाटत. पण वय जसं वाढत जात तसे बाबा आपले मित्र कधी झाले आणि आई एक चांगली मैत्रीण हे कळतही नाही. म्हणजे कालपर्यंत अगदी धाक म्हणून दिलेला दम आणि आज अगदी कित्येक वैचारिक गोष्टींवरती चर्चा कधी झाली कळलही नाही. मग जाणवायला लागत की, अरे !! आई बाबा पण advance आहेतच की !!

Advance आणि up-to-date च्या गोष्टी पाहताना वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आई बाबा आता म्हातारपणात आले. आपल्याला ही आता मुले झाली, सगळं काही advance आहे, पण काहीतरी राहून गेलं आणि आपलेच मुल आपल्याला काय हो बाबा !! किती outdated आहे तुमची कार !!अस म्हणायला लागत, त्यावेळी नवल वाटावे ते काय ??? कारण काही वर्षांपूर्वी आपणच आपल्या बाबांना त्यांच्या सायकलमुळे हेच वाक्य बोललेलो असतो. पण या नव्या पिढीला कस सांगायचं की, अरे !! ही गाडी outdated नाही ,तर त्या गाडी सोबत एक date जोडली आहे ! कोणती बर ?? तुझ्या आईच्या वाढदिवसा दिवशी घेतली आहे !! तेव्हा स्वतः ला advance समजणारी ती पिढी चटकन म्हणून जाते ,  काय हो बाबा !! काय हे अडण्यासारख !!! शेवटी आपणही आउटडेटेड आणि अडाणी होऊ बसलो ना !!हे वाटायला लागत, हेच चालायचं. कारण बदल तर होतच जाणार आणि आपणच केलेले बदल उद्या आपल्यालाच outdated म्हणणार.

काही दिवसापूर्वी ज्यांना आपण अडाणी म्हटलो, ते आई बाबा आता आजी आजोबा कधी झाले हे आपल्याला कळतही नाही. त्या लहान नातवाला कित्येक श्लोक , गोष्टी सांगुही लागले ते, आणि मग त्यांच्याकडे बघून म्हणावंसं वाटत की , आई बाबा तुम्ही अडाणी अजिबात नाही !! आणि आमच्यापेक्षा तुम्ही advance आहात , कारण मी एक पाऊल पुढे टाकले तेव्हा तुम्ही माझ्या पुढच्या दहा पावलांची ताकद झालात, आम्ही जेव्हा नव्याने काही शिकलो तेव्हा तुम्ही त्याची सुरुवात झालात. अगदी प्रत्येक वेळी नव्याने भेटलात , जुन्याची सांगड घालून ..!!

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...