मुख्य सामग्रीवर वगळा

स्मशान कथा भाग ४ || marathi Katha ||


कथा भाग ४

दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला.
"अरे !! एवढं काय काम काढलंय दत्तू !! धापा टाकत आलास !! हे बघ काही दुसरं  काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ !! सरपंचाच काम करतोय !!! नाही केलं तर ओरडलं मला परत !!"
" अरे शिवा !! सरपंच !!!" दत्तू आता शांत होत बोलू लागला.
"काय?? सरपंचांनी बोलावलंय ??" शिवा मोठ्या आवाजात बोलू लागला.
"त्यांना म्हण !! तुमचंच काम करतोय !! झाल की येतो !!!"
"अरे जरा शांत बस की !!" दत्तू चिडून म्हणाला.
"अरे सरपंच गेले !!! "
"काय ??" शिवाला हे ऐकुन काय बोलावं तेच कळेना.
"कधी ?? कस काय ??"
"अरे हो तर !! आता तिथूनच आलोय !! रात्री झोपला ते उठलाच नाहीं सकाळी !!! बायकोन बघितलं तर काहीच हालचाल करत नव्हता!! वैद्यबुवा आले आणि बघितलं !! तर म्हटले इलाज करून काही उपयोग नाही !! सरपंच गेलेत म्हणून!!"
"मायला, वाईट झाल म्हणायचं !!! तू हो पुढं !! मी आलोच मागून !!!" शिवा जागेवरून उठतं म्हणाला.
दत्तू आला तसा निघून गेला. शिवा काम आवरून तिकड निघाला. सुधाला सांगायला तो खोपटात गेला.
"सुधा !! "
"काय हो!! " सुधा झोपेतून उठतं म्हणू लागली.
"सरपंच गेले !! "
"काय ??" सुधाला यावर विश्वास बसत नव्हता.
"हो!! आताच दत्तू सांगून गेला. मी तिकडं जाऊन येतो !! परत इकडं सगळी तयारी करावी लागल मला."
"बर !! " सुधा खालच्या आवाजात म्हणाली.
शिवाला सुधाचा बदललेला आवाज लगेच जाणवला आणि तो म्हणाला.
"काय झाल सुधा ??"
"काही नाही !! जरा अंग कणकण करतंय !!" सुधा अंगावरच पांघरूण काढत म्हणाली.
शिवा तिच्या जवळ जात तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलू लागला.
"ताप पण आलाय तुला!! "
"होईल ठीक !! तुम्ही जाऊन या !!!"सुधा जवळच ठेवलेल्या पेल्यातले पाणी पीत म्हणाली.
"सदा गेला ना शाळेत??"
"हो !!!" सुधा पुन्हा पांघरुण घेत बोलली.
"बरं !! मी जाऊन येतो !! आणि येताना वैद्यबुवाकडून औषध घेऊन येतो !! बर वाटेल तुला!!" शिवा बाहेर जात म्हणाला.
"बर !! " एवढंच तुटक बोलत सुधा पुन्हा झोपी गेली.
   शिवा धावतच गावात गेला. सरपंचाच्या घरी पाहतो तर भली मोठ्ठी गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात उभा राहून तो सगळं पाहू लागला. सरपंच रुबाबदार माणूस पण आज अगदी भेसूर वाटू लागला. बायको एकटी रडत होती. बाप एका कोपऱ्यात आपल्या अपंगत्वाला दोष देत मुलाकडे पाहून आसवे गाळत होता. शिवा सगळं काही पाहत होता. रात्रीच्या जागरणामुळे शिवाचे डोळे लालबुंद झाले होते. तेवढ्यात दत्तू शिवा जवळ येऊन बोलू लागला.
"सरपंचाच काय काम करत होता रे तू !! आणि तेपण मसनवाट्यात??"
दत्तूच्या या प्रश्नानं शिवाला काय बोलावं तेच कळलं नाही.
"काही नाही !! असच नेहमीचच !!" शिवाने वेळ काढून घेतली.
"बरं !!  जा तू पुढ मसनवाट्यात आणि तयारी कर सगळी !! निघतीलच आता तिकडं!!!"
"तसचं करतो !! " शिवा दत्तूलं म्हणत लगेच निघाला.
मसनवाट्यात येताच तो सरळ खोपटात गेला. सुधा तापेन फणफणत होती.
"सुधा !! ताप किती वाढलाय ?? " तिच्या डोक्यावर हात ठेवत शिवा बोलू लागला.
सुधा आता जागेवरून न उठताच शिवाकडे पाहू लागली. कित्येक वेळ दोघे तसेच बसून राहिले. शिवाला सुधाची काळजी वाटू लागली. आणि तेवढ्यात,
"शिवा !! " खोपटाच्या बाहेर दत्तू येऊन हाका मारू लागला होता.
"आलो आलो !!" शिवा बाहेर येत म्हणाला.
बाहेर पाहतो तर दत्तू आणि बाकी सगळे तिथे केव्हाच आले होते. सरपंचाला तसे पाहून शिवा अगदी सुन्न होता. क्षणभर थांबून तो लगेच कामाला लागला. सरपंचानेच सांगितलेली लाकड तो रचू लागला. कोपऱ्यात दोघांनी खांद्यावरून धरलेला सरपंचाचा बाप आसवे गाळत होता. बाकी रडावं अस कोणी राहीलच नव्हतं. सरपंचाचा मुलगा विलयातेत होता त्याला येणं शक्य नव्हतं अस दत्तू म्हणत होता.
सारी तयार झाली आणि शिवा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. सरपणान बघता बघता पेट घेतला. आणि त्या आगीच्या लोटात कित्येक विचार जणू शिवाला जळताना दिसू लागले, जणू त्याला बोलू लागले.
"बापाची चिता पेटवायला आतुर झालेला हा सरपंच आज स्वतःच जळून खाख झाला!! आपल्या बापासाठी ज्याने त्या बापाच्या जिवंतपणी सरपन रचले !! त्याच सरपणात स्वतःच जळून खाक झाला!! कोणासाठी केलं त्याने एवढं सगळं !!त्या मुलासाठी ज्याला बाप गेला तरी यायला वेळ नाही त्याच्यासाठी!!! अखेर कोणीच नाही आज इथे !! तो बघा तो माणूस !! त्या दिवशी सरपंचाच्या हो ला हो करणारा !! निघूनही चालला !! पेटत्या ज्वाला आणि हा निर्जीव देह एकटा सोडून !!! या लोकांची साथ फक्त जगताना !! मेल्यावर तर काय साथ देणार ?? दुसऱ्यासाठी जमा केलेली लाकड स्वतःलाच जाळून गेली !! यापेक्षा ते वाईट काय !! म्हणून तर आयुष्य आहे तोपर्यंत दुसऱ्याच चांगलं करत राहायचं म्हणतात ते यासाठीच!" शिवा जागेवरून उठला.
   एव्हाना आता सगळे निघून गेले होते. उरले होते ते फक्त काही लोक , शिवा आणि त्याचा मित्र दत्तू. त्या जळत्या चीतेकडे बघत.
  काही वेळात दत्तुही निघून गेला. पाहता पाहता सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. शिवा कित्येक वेळ सरपंचाच्या जळत्या चितेस राखण करत बसला होता. सुधा आत आजारी आहे याचं भानही त्याला राहिले नव्हते. तेवढ्यात सदा शाळेतून आला. आत खोपटात गेला आणि धावतच बाहेर आला.
"आबा !! "
शिवा सदाच्या आवाजाने भानावर आला आणि खोपटाकडे पाहत म्हणाला.
"काय रे सदा ???शाळेतून कधी आला तू ???"
सदा घाबरत घाबरत म्हणाला.
"आईला जास्त त्रास होतोय !!!"
शिवाला हे कळताच तो धावतच आला. खोपटात शिरत सुधा जवळ आला.
"माफ कर सुधा !! कामात मी खरंच विसरलो !! माफ कर !!!"
"आहो ठीक आहे !! एवढं काही झाल नाहीये मला!!" सुधा स्वतःला सावरत म्हणाली.
शिवा सुधाचे डोके आपल्या मांडीवर ठेवत म्हणाला.
"नाही कस !! ताप वाढलाय सुधा !! मी आत्ता जातो आणि वैद्यबुवाला घेऊन येतो!" शिवा उठायचा प्रयत्न करू लागला.
सुधा त्याला थांबवत म्हणू लागली.
"थांबा हो जरा वेळ !! काही होत नाही मला!!मी एकदम ठीक आहे !!"
"गप्प बस तू !! तुला काही कळत नाही !सदा आईजवळ थांब!!! मी आलोच जाऊन!!"शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
सदा सुधाजवळ बसला. शिवा धावत धावत वैद्यबुवांकडे गेला.एव्हाना सगळीकडे अंधार झाला होता. शिवा वैद्यबुवाच्या घरासमोर येऊन दरवाजा वाजवू लागला. थोड्या वेळानं दरवाजा उघडला.
"बुवा आहेत का ??" समोर वैद्यबुवांची बायको पाहून शिवा म्हणाला.
"बुवा तर नाहीत घरी !! आताच थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या गावाला गेलेत!! कोणीतरी माणूस आला होता त्यांच्या सोबत गेले !!!"
"कधीपर्यंत येतील ??"शिवा अगदिक होऊन विचारू लागला.
"माहीत नाही!!!" बुवांची बायको शिवाची तगमग पाहून पुढे म्हणाली.
"काय झालंय एवढं शिवा??"
"बायको खूप आजारी आहे !!! तापानं अंग नुसतं गरम झालंय !!!" शिवा.
"तू अस कर !! तू जा घरी !! ते आले की पाठवून देते मी तुझ्याकडं !!! "
"लई उपकार होतील तुमचे !!!" शिवा हात जोडत म्हणाला.
   शिवा धावत धावत पुन्हा मसनवाट्यात आला.सुधाला अश्या अवस्थेत पाहून त्याला काय करावं तेच कळतं नव्हतं. सदा सुधाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. पण तरीही ताप काही कमी होत नव्हता.शिवा हतबल होऊन एकटक समोरच्या धगधगत्या चितेकडे पाहत बसला होता. एकटाच.

क्रमशः

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : स्मशान कथा || शेवट भाग ||

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...