मुख्य सामग्रीवर वगळा

स्मशान कथा || शेवट भाग ||


शेवट भाग

  "आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हाच सरपंच किती रुबाबात बसला होता !!! आज त्याची राख झाली!! ज्या वाड्यासाठी अट्टाहास केला तो तर मिळाला नाहीच !! भेटलं अखेर काय ?? तर ही समाधानाची छोटीशी जागा !! अखेरचं जळण्यासाठी !! पण हे का आणि कशासाठी ?? काल त्या लोहाराच्या कुटुंबाने आनंद दिला !! आणि क्षणात त्या विधात्याने आज सुधाला आजारी पाडून सार सुख हिरावून घेतलं !! माझ्या आयुष्याची सोबतीन सुधा !! माझी अर्धांगिनी सुधा !! माझी मैत्रीण माझं जीवन म्हणजे सुधा !!! सुधा !!! सुधा !!!"शिवा विचाराच्या सागरातून बाहेर आला आणि तडक खोपटात सुधाकडे गेला.
"सुधा !!"
"आत्ताच झोपलीये ती !!" सदा शिवाकडे पाहत म्हणाला.
शिवा सुधाजवळ बसला. त्याला सदाच्या डोळ्यातही काळजी दिसत होती.
"सुधा !! उठ तरी !! मी आहे शिवा !! " सुधाच डोकं मांडीवर घेत शिवा म्हणाला.
डोळे अर्धवट उघडत सुधा शिवाकडे पाहू लागली.
"तुला काही होणार नाही !! थोडा धीर धर !! आता येतील वैद्यबुवा !! मग बघ ठणठणीत बरी होशील तू !! "  शिवाच्या डोळ्यातून ओघळते अश्रू सुधाच्या डोक्यावर पडले.
सदाच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"आई !!! तुला काही होणार नाही !! " सदा जवळ बसत म्हणाला.
सुधा गालातल्या गालात एक पुसट हसली, अगदी हलकेच. तिच्यात आता बोलण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती. शिवाचा हात घट्ट धरून ती उठण्याचा प्रयत्न करू लागली.
"उठू नकोस !! " शिवा तिला नकारार्थी मान हलवून म्हणाला.
"सऽऽदा !! " सुधा पुसट बोलू लागली.
"तू शांत रहा !! तो आहे इथे !! "शिवा सदाला जवळ करत बोलू लागला.
सुधा हातवारे करत शिवाला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती.
"काय हवंय तुला ??" शिवा काही न कळल्यामुळे तिला गप्प करत होता.
"ह !! काय ..??! सदा !! आणि मी ...!!!! बरं काय ??? आहोत आम्ही तुझ्या जवळ !!! " सुधा हातवारे करत होती त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न शिवा करत होता.
सुधा नकारार्थी मान हलवून पुढे काही हातवारे करू लागली. सदाच्या डोक्यावर हात ठेवत.
"सदा !! मी !! त्याची काळजी घेऊ !! " शिवा क्षणात मागे सरकला. आणि जोरात म्हणाला.
"तुला काही होणार नाहीये सुधा !! तुला जगायचं आहे !! माझ्यासाठी !!  या सदासाठी !! आपल्यासाठी !! " शिवा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला.
सुधा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण शिवा खोपटातून बाहेर निघून गेला.
   "एवढ्याच साठी हे सगळं होत !! क्षणात निघून जायचं याचसाठी !!!ही राख जर अंत असेल तर कशाला देवा या जगण्याचा भार आमच्यावर ठेवलाय तू !! त्या भावनांचा भार !! त्या नात्यांचा भार !! कशासाठी ?? क्षणात या सगळ्यांना पोरक करून जाण्यासाठी !!! नाही !! देवा नाही !! मला हे दुःख नको आहे !!! " शिवा कित्येक विचार करत थकून गेला. झोपी गेला.
   सकाळच्या त्या किरणांनी रात्रीचे विचारांचे ओझे जणू हलके केले. शिवा झोपेतून उठला ते थेट सुधाजवळ गेला. सदा रात्रभर तिच्या जवळ बसून होता. सूधाची तब्येत आता खूप ढासळली होती. शिवा आणि सदा अगदिक होऊन बसले होते आणि तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले.
"शिवा !! "
शिवा बाहेर येऊन पाहतो तर वैद्यबुवा आले होते.  त्यांना पाहून शिवाला खूप बरं वाटलं.
"अरे !! आत्ता आलो गावावरून !! आलो तर आमची ही म्हणाली !! तू आला होता म्हणून !! तुझी बाय खूप आजारी आहे म्हटली.!! ते तडक इकडं आलो !!" वैद्यबुवा हातातली झोळी ठेवत म्हणाले.
"खूप बरं झालं बुवा तुम्ही आलात !! या ना !! काल सकाळपासून आशीच पडून आहे बघा !! अंग पण गरम लागतय !!"
वैद्यबुवा सुधाला तपासू लागले. काही मात्रा आपल्या झोळीतून काढत तिला देऊ लागले. शिवा आणि सदा दोघांकडे कुतूहलाने बघू लागले.वैद्यबुवा आपल्या झोळीतून काही औषध बाहेर काढत शिवाला म्हणाले.
"ही मात्रा !! थोड्या थोड्या वेळाने देत रहा !! "
"होय बुवा !! " शिवा.
वैद्यबुवा आणि शिवा खोपटातून बाहेर आले. वैद्यबुवा काही म्हणायच्या आत शिवा त्यांना विचारू लागला.
"बरी होईल ना सुधा !! "
"हे बघ शिवा !! तापेचा जोर चांगलाच वाढलाय !! आणि त्याचा परिणाम खूप वेळ झाल आहे !! मी काही औषध दिली आहेत !! पण सगळं त्या देवाच्या हाती आहे !! होता होईल तेवढी काळजी घे तिची!!" बुवा आपली झोळी हातात घेत म्हणाले.
पाठमोऱ्या वैद्यबुवांकडे जाताना शिवा कित्येक वेळ पाहत राहिला. त्याला वैद्यबुवांचे शब्द आठवू लागले. होता... !! होईल तेवढी काळजी घे !!" शिवाला काय करावं काहीच कळत नव्हतं. तो बाहेर कित्येक वेळ बसून होता. समोर दत्तू आलेला सुद्धा त्याला कळल नाही.
"शिवा !! अरे कुठं आहे लक्ष !!"
शिवा भानावर येत दत्तुला बोलू लागला.
"दत्तू तू कधी आला ?? "
"हे काय आत्ताच आलोय !! आणि कायरे बायको एवढी आजारी ते साधं कळवल पण नाही लेका!आता बुवा रस्त्यात भेकले तेव्हा ते म्हणाले!!"
"अरे कालपासून काय कळणा झालंय बघ दत्तू!!"
"अरे होय पण आशा वेळी नाहीतर कधी मित्राला सांगायचं !!"
दत्तू शिवाला कित्येक वेळ बोलत बसला. सदा वैद्यबुवांनी दिलेली मात्रा सुधाला देत होता. क्षण न क्षण जड होत चालला होता. आणि अचानक जोरात ओरडला...
"आ..... ई ....!!!!"
शिवा आणि दत्तू त्या आवाजाने धावत खोपटात गेले. समोर सुधा सदाच्या हातात तसाच हात ठेवून होती!! डोळ्यात पुन्हा शिवाला शेवटचं पाहण्याची एक ओढ जणू दिसत होती. शिवा हे पाहून मटकन खाली बसला.
"सुधा !! उठ !! उठ !! नाही ना! ना !!! नाही !! तू अशी जाऊ नाही शकत !! ये !! सुधा !! उठणा !! हे बघ सदा तुझ्यासाठी !! तुझ्या तोंडून सदा म्हणून घेण्यासाठी हट्ट करून बसलाय!! सुधा !!! " शिवा सुधाला कवेत घेऊन रडू लागला.
दत्तू शिवाला आवरू लागला.सदा आईच्या पायाजवळ बसून कित्येक अश्रू ढाळू लागला. दत्तू शिवाला बाहेर घेऊन आला. खिन्न मनानं शिवा बसला.
"आबा !! " सदा खोपटातून बाहेर येत शिवाला मिठी मारत रडू लागला.
शिवा काहीच बोलत नव्हता. तो शांत होता. कित्येक क्षण असेच गेले आणि दत्तू म्हणाला.
"उठ !! उठ शिवा !! आता सार काही तुलाच करायचं आहे !!"
"नाही !! माझ्यात ती ताकद नाही दत्तू !! "
"पण करावं लागेल शिवा !! हे चुकणार नाही !! उठ रच ती चीता !! " दत्तू जड मनाने शिवाला उठवत होता.
शिवा थरथरत्या हातांनी लाकडाना हात लावू लागला. शिवा आपल्या मनात कित्येक सूधाच्या आठवणी आठवत होता. ते सरपण रचत होता.
"नाही !! माझ्यात ही ताकद नाही !! आजपर्यंत कित्येक वेळा मी ही चीता रचली !! पण आज माझे हात काम करत नाहीयेत !! त्या सरपणाला!!! काय ते आपले !! अणि परके !! त्यांना फक्त एकच धर्म !! आणि तो म्हणजे राख !! मग तो कोणीही असो !! आजपर्यंत मी कधी डगमगलो नाही !! पण आज माझे हात ढळत आहेत !!"
  शिवा चीता रचून बाजूला झाला. मागे सदा डोळ्यातून अश्रू पुसत उभा होता. दत्तू त्याला सांभाळत होता. आणि पाहता पाहता चीता पेटली. आज त्या चीतेची दाहकता शिवाला आतून जाळत होती. कित्येक वेळ ती चीता जळत होती. शिवा त्याच्या बाजूला बसून सुधाच्या आठवणीत पुरता बुडाला होता. दिवस सरून रात्र झाली तरी शिवा तिथेच बसून होता.
"आबा !! " सदा शिवाजवळ येत म्हणाला.
शिवा काहीच बोलला नाही फक्त सदाकडे पाहू लागला.
"आबा !! आज मला ही जागा स्मशान वाटू लागली ! आज "
सदाकडे पाहून शिवाला रडू कोसळले. दोघेच कित्येक वेळ त्या राख झालेल्या  सुधा जवळ बसून होते. दत्तू खोपटा जवळ आडवा झाला होता. रात्र सरून तेव्हा पूर्वेकडे उजेड आला होता.
"सदा ! चल !! झाल का ??"
"हा आबा !! आलो !!"
दत्तू या आवाजाने उठला. काय चाललंय हे पाहायला तो डोकावून पाहू लागला. शिवा आणि सदा कसली तरी तयारी करत होते.
"दत्तू !! चल येतो मी !!" शिवा डोकावून पाहणाऱ्या दत्तूला म्हणाला.
"काय चाललंय तुझ शिवा !! कुठ जाणार तू ??"
"अरे !! हे जग किती मोठं आहे !! जाईल कुठ पण !!पण आता इथ नको !! "
"नको जाऊ मित्रा!! " दत्तू डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
"नको अडवू मला आता दत्तू !! या स्मशानात खूप काही पाहिलं मी !! प्रेम , स्वार्थ , इर्षा , आनंद आणि एक अधुरी साथ !! सगळं काही या राखेत संपताना पाहिलं मी !!माहितेय मला !! माझाही शेवट इथच आहे !! पण तो येई तोपर्यंत यापासून दूर जायचं मला!! सुधाच्या आठवणी क्षणाक्षणाला इथ मला जाळत राहतील रे !! " शिवा मनातलं बोलू लागला.
"विसरू नको या मित्राला..." दत्तू शिवाला घट्ट मिठी मारत म्हणाला.
"नाही !! " शिवा हातात थोड समान घेऊन निघाला.
सदा आणि शिवा दोघेही निघाले. हातात काही समान आणि मनात सुधाच्या आठवणी घेऊन.
"आबा !! आपण आता कुठ जायचं ??"
शिवा सदाच्या या प्रश्नानं थोडा वेळ शांत राहिला. कित्येक वेळ चालत राहिला.
"या स्मशान पासून दूर !! त्या आठवणींन पासून दूर जायचं !! "
शिवा आणि सदा चालत चालत लांब गेले. दत्तू त्यांना कित्येक वेळ जाताना पाहत राहिला. स्मशानात त्या धगधगत्या राखेस कित्येक वेळ पाहत राहिला.

*समाप्त*

©✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...