मुख्य सामग्रीवर वगळा

स्मशान कथा भाग २ || हृदयस्पर्शी कथा ||


कथा भाग २

"आबा !!" हातातून रक्त येतंय तुमच्या !!! " कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता.
"काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! " शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला.
"पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! "
"म्हटलं होत ना बाळा !! मेलेल्या भुतापेक्षा जिवंत भूत लई बेकार म्हणून !! "
"खरंय आबा !! "
या सगळ्या गोष्टीत रात्र कशी सरली कळलंच नाही. शिवा पहाटे निर्धास्त झोपी गेला. सदा तांबड फुटताच शाळेत जायला निघाला. सुधा त्याला आवरायला मदत करत होती.तेवढ्यात दत्तू तिथे आला.
"शिवा !! "दत्तू बाहेरूनच हाका मारू लागला.
"झोपलेत अजुन !! " सुधा बाहेर येत म्हणाली.
"दिस डोक्यावर आलाय आणि झोपलाय अजुन !!"
"रात्री कोहल्याची टोळीनं झोपू दिलं तर ना !! " सुधा दत्तूला पेल्यात पाणी देत म्हणाली.
"म्हणजे ! रात्री कोल्हे आलते काय !! " दत्तू आश्चर्याने म्हणाला.
"होय तर !! सारखी इथच घुटमळत होती!!" सुधा आत पाहत म्हणाली.
तेवढ्यात शिवा झोपेतून उठला आणि बाहेर येत दत्तुला म्हणाला.
"काय रे दत्तू !! काय काम काढलसं सकाळ सकाळ??"
सरपंचानी बोलावलंय तुला!! "
"का म्हणून ??"
"आता ते मला काय माहीत !!ये पटकन !! मी जातो पुढं !!" दत्तू एवढं म्हणून निघून गेला.
पाठमोऱ्या दत्तुला जाताना शिवा जरावेळ थांबला. लगेच लगबगीने उठला. सकाळची न्याहारी करून सरपंचाकडं जायला निघाला.
सरपंचाच घर म्हणजे आलिशान वाडा. कित्येक नोकर चाकर दिमतीला. शिवा बारक्या दरवज्यातून आत वाड्यात आला. सरपंच समोरच बसलेले पाहून त्यांना नमस्कार करू पुढे आला. शिवाला पाहताच सरपंच म्हणाले.
"काय शिवा !! आजकाल तोंडपण दाखवणं झाला तू तर !! मोठा झाला का लई !!" सरपंच जरा चिडक्या आवाजात बोलू लागले.
"तस नाही सरकार !! सध्या काम लई आहेत म्हणून येणं झाल नाही !!!"
"मसनवाट्यात कसली आली रे काम !! पेटल की झाल!! " सरपंच हसत म्हणाले.
सरपंच हसलेले पाहून शेजारीच बसलेले दोन तीन गावकरी पण हसू लागले.
"चूक झाली सरकार !! " शिवा खाली मान घालून म्हणाला.
"बर ऐक !! या दोन तीन दिवसात आमचा म्हातारा खपायच्या मार्गावर आहे !! तर त्याला चंदनाची लाकड आणून ठिव !! एवढंच सांगायला बोलावलं होत तुला !! "
"जी सरकार !! प्रयत्न करतो !!"
" प्रयत्न काय?? पाहिजेतच मला!! " सरपंच मोठ्या आवाजात बोलू लागले.
शिवा शांत सगळं ऐकत होता. गावातली या सरपंचाची जवळची माणसं त्याला साथ देत होती.
"मायला !! वैताग नुसता !! तुम्हाला सांगतो तात्या !! हे म्हातारं गेली चार वर्ष झाली मरणा झालंय !! जागेवर पडून नुसता !! पण जीव हित या शरीरात !! मायला म्हातारा मेला म्हणजे सगळा हा वाडा आपलाच होईल बघा !! आणि त्या खालच्या बाजूची शेती !! पैसा सगळं आपलं होईल !! " सरपंच डोळ्यात कित्येक तीव्र भाव आणून बोलत होते.
"आणि नाही मेला ना तर मी मारील बघा त्याला !! आईला वैताग नुसता !! " सरपंच अस म्हणत शिवाकडे पाहू लागले.
शिवा जागेवरून उभा राहिला.सरपंच एकदम त्याचावर खेकसले.
"तुझ काय आता !! झाल तुझ काम !! निघ आता !! आणि सांगितलय ते काम झाल पाहिजे बघ !! माझ्या अब्रूचा प्रश्न आहे !! नाहीतर गाववाले म्हणतील !! एवढा मोठा सरपंच आणि बापाला असाचं जाळला म्हणून !! "
"जी सरकार !! " शिवा मागे सरकत म्हणाला.
गावाच्या वेशीवर येऊन शिवा थांबला. जणू त्याच्या मनात कित्येक विचारांचं द्वंद्व सुरू झालं होत.
"मेलेल्या मड्याचे लचके तोडू नये म्हणून काल मी रात्रभर त्या भुकेल्या कोह्ल्यांशी लढलो ! कशासाठी ?? त्या निर्जीव शरीराला वाचवण्यासाठी !! की अजून कशासाठी !!ती भूक त्यांना तिथे घेऊन आली होती !! त्यांची काय चूक होती ?? खरंच काय चूक होती ?? माझेच मला समजतं नाहीये !! त्या जंगलातल्या प्राण्यांची भूक ती केवढी .!! संपून जाईल लगेच !! पण या जिवंत माणसांची भूक ती कोणती ?? याला अंत नाही ?? त्या मसनवाट्यात खरंच या माणसाच्या भुकेचा अंत आहे ???आयुष्यभर काय कमावलं त्यांनी !! सार काही राख होताना मी पाहिलंय ! !" शिवा गावाच्या वेशीबाहेर येत आपल्या खोपट्याकडे जाऊ लागला. मागे न पाहता, त्या माणसाच्या वस्तीकडे न पाहता, पुढे चालत राहिला.
  दुपारच्या रखरखत्या उन्हात शिवा स्मशानात राखेच्या शेजारी जाऊन बसला.अजूनही ती राख धगधगत होती. तेव्हा जणू सरपंचाचे शब्द त्याच्या मनात घोळत होते.तो तिथे कित्येक वेळ बसला. दुपारची वेळ जाऊन सांज होत आली. आणि तेवढ्यात सुधा खोपट्यातून शिवाला पाहून त्याच्याकडे धावत आली.
"काय हो!! अस का बसलाय इथ???" सुधा थोड्या घाबाऱ्या आवाजात म्हणाली.
"काही नाही !! असच बसलो होतो !! " शिवा शांत म्हणाला.
"सरपंच काही म्हणाले का ??"
" ते काय म्हणणार !! " शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
"मग इथ अस !! " सुधा कुतूहलाने विचारू लागली.
"काही नाही चल !! संध्याकाळ होत आली !! सदा येईल आता !! आल की पोरगं भूक भूक करत !! त्याला खायला कर काहीतरी !! " शिवा सुधाच्या पुढे चालत जात म्हणाला. सुधा क्षणभर थांबली आणि शिवाच्या मागे खोपटाकडे गेली. बाहेर तेवढ्यात सदा आलाच होता . हातपाय धुऊन स्वच्छ कपडे घालून निवांत अंगणात बसला होता.
"आई !! कुठ गेला होतात दोघं तुम्ही ??"
"अरे !! इकडचं पलीकडे बसलो होतो!! " सुधा आत जात म्हणाली.
शिवा हातपाय धुऊन धोतरान अंग पुसून सदाच्या जवळ जाऊन बसला. सदा पुस्तक उघडून अभ्यास करू लागला. त्याला पाहून शिवा क्षणभर गालातल्या गालात पुसटसा हसला. मनातला कित्येक गोंधळ क्षणभर विसरला. सदा पुस्तकातून डोकं वर घेत शिवाकडे पाहत होता. त्याला पाहून शिवा म्हणाला.
"काय असतं रे या पुस्तकात ??" शिवा सदाला कुतूहलाने विचारू लागला.
"थोर पुरुष , विज्ञान , चांगलं काय, वाईट काय सगळं असतं या पुस्तकात !!! " सदा म्हणाला.
"अस्स होय !! चांगलंय !!मन लावून कर आभ्यास !! "शिवा जागेवरून उठतं बोलला.
सदा क्षणभर गालातल्या गालात हसला आणि पुस्तकात पाहून वाचू लागला.
सुधा खोपट्यातून बाहेर येत म्हणाली.
"चला जेवायला !! परत उशीर होतो !!"
एव्हाना आता रात्र होतच आली होती. शिवा आणि सुधा जेवायला बसले. सदा पुस्तक ठेवून खोपट्याच्या बाजूला क्षणभर थांबला. दुर असलेल्या गावाच्या त्या मिणमिणत्या दिव्यांकडे कुतूहलाने पाहू लागला. मसनवाट्यात गडद अंधार दिसत होता.अगदी समोरचं माणूसही दिसणार नाही इतका अंधार होता.
   सदा आत जाऊ लागला. तेवढ्यात मसनवाट्याकडे काही कंदील लूकलूकताना त्याला दिसले. गोंधळलेला सदा घाईघाईत आत आला.
"आबा!! " सदा जोरात ओरडला.
"अरे झाल काय?? " शिवा जागेवरून उठतं म्हणाला. हातातला घास तसाच पुन्हा ताटात ठेवला.
"मसनवाट्याच्या बाजून कंदील दिसायेलेत !!" सदा शांत होत म्हणाला.
शिवा बाहेर गेला. हातात कंदील घेत चालू लागला. तसेतसे ते दिवे जवळ जवळ येऊ लागले. सदा शिवा सोबत मागे मागे चालत होता.
"आबा !! एवढ्या अंधाराच कोण आलं असेल !! " सदा घाबऱ्या आवाजात म्हणाला.
"बघुयात तरी !! " शिवा जोरात पुढे चालत चालत म्हणाला.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : स्मशान कथा भाग ३ || सुंदर मराठी कथा ||

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...