मुख्य सामग्रीवर वगळा

नकळत || कथा भाग ३ || मराठीतल्या सुंदर कथा ||


समीर,

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! "
समीरने मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.

"नाही!! मला तुला भेटायचं नाहीये !!  Sorry!!"
मेसेज केल्या नंतर कित्येक वेळा नंतर त्रिशाचा पुन्हा रिप्लाय आला.
"एकदा भेटशील फक्त !! खूप काही बोलायचं आहे रे मला !!"
"नको पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करुस त्रिषा!! तू तुझ्या संसारात खुश रहा !! मला बाकी काही नको !! " पुन्हा समीरने रिप्लाय केला.
"तू नाही भेटलास तर मी कधीच खुश नाही होऊ शकणार !!" समीर या मेसेज नंतर कित्येक वेळ विचार करत राहिला आणि पुन्हा  त्याने मेसेज केला.
"ठीक आहे !! कुठे भेटायचं ??"
"आपण दोघे पूर्वी भेटायचो त्याच कॅन्टीन मध्ये भेटुयात !! कॉलेज शेजारी! सकाळी १० वाजता! "
"Ok !!"

उद्या भेटायचं अस सांगून समीर त्रिशाच्या कित्येक आठवणीत गुंतला. स्वतःला त्या जुन्या कॅन्टीन मध्ये पाहू लागला. डोळ्या समोर कित्येक चित्र फिरू लागले. आणि जणू बोलू लागले.
"मी आणि त्रिशा तासनतास त्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसायचो. गप्पा, मस्करी , वाद-विवाद सगळं काही व्हायचं तिथे. पण मनभेद कधीच झाला नाही. मी त्रिशा, आकाश ,सायली, मन्या , ओंक्या आमचा नुसता गोंधळ असायचा तिथे. काय दिवस होते यार !! " समीर सिगारेट ओढत कित्येक वेळ तसचं बसून राहिला. पाहता पाहता आठवणींच्या शहरातून बाहेर येई पर्यंत सकाळ झाली होती.

समीर घड्याळात पाहतो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. लगबगीने तो उठतो आणि आवरू लागतो. मनात कितीही राग असला तरी ते प्रेम त्याला तिच्याकडे खेचत होत. त्यालाही ते माहीत होत. की आपण कधीच निष्ठुर वागू शकणार नाही. राग असेल पण तो प्रेमाच्या वाटेवर असेल हेही त्याला माहित होत. कितीही प्रयत्न केला तरी त्याला निघायला उशीर झाला. रात्रभर तो जागाच राहिला होता त्यामुळे त्याचा चेहरा सुकून गेला होता. अखेर तो त्या कॅन्टीन जवळ येतो.  तेव्हा त्रिशा त्याच्या आधीच तिथे येऊन बसली होती. कित्येक वेळ झालं त्याची वाट पाहत होती. समीर तिच्या जवळ जातो.

"Sorry !! थोडा late झाला!! " समीर त्रिशाकडे पाहत म्हणतो.
त्रिशा त्याच्याकडे पाहून हसते. अगदी हलकेच पाहते, आणि म्हणते,
"काही हरकत नाहीरे !! मीपण आत्ताचं आले आहे !!" त्रिशा कित्येक वेळ वाट पाहत बसली होती हे ती त्याला सांगतच नाही.
समीर समोरच्य खुर्चीवर बसतो. दोघे कित्येक वेळ काहीच बोलत नाहीत. तेवढ्यात कॅन्टीनचा वेटर मध्येच येतो आणि म्हणतो.
"मॅम !! तीन तास झालं बसलाय तुम्ही इथे !! आता तरी काही ऑर्डर द्या ना !"
त्रिशा क्षणभर गोंधळून जाते आणि म्हणते
"दोन कॉफी !! "
आणि वेटर निघून जातो.
समीर फक्त त्रिशाकडे पाहत राहतो. त्याला जे म्हणायचं होत ते नकळत तिला कळल होत, आणि मग न राहवून त्रिशा बोलायला सुरुवात करते.

"दहा वर्षात किती काही बदलून गेलं ना समीर !!"
समीर काहीच बोलत नाही , फक्त त्रिशाकडे एकदा पाहतो.
"या दहा वर्षात कुठे होतास ,कसा होतास !! मला काही माहीत नव्हतं. अस नाही की मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण मी माझ्यातच एवढी गुंतून गेले की मला तुझ्यापर्यंत पोहचताच आलं नाही. " त्रिशा मनातलं बोलू लागली.
"मग आज पुन्हा भेटण्याचं कारण काय ?" समीर अगदी तुटक बोलला.
"या दहा वर्षात खूप काही साचलं आहे रे या मनात !! तुझ्या कित्येक आठवणी आहेत !! तू आहेस आणि !!!"
"आणि काय ?" समीर प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला.
"आणि मंदार आहे !!" त्रिशा लगेच बोलली.
"मंदार कोण ?"
"My husband!!"
त्रिशा असे म्हणताच समीर क्षणभर अस्थिर झाला. आणि म्हणाला.
"चल मी निघतो !! "
"नाही समीर !! थांब !! खूप वर्षांनी मला माझं मन मोकळं करायचं आहे !! "
"पण माझं मन नाही ऐकू शकणार हे !! तुला माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणासोबत पाहणं मला नाही शक्य होणार !!"
समीर जागेवरून उठतं म्हणाला. त्रिशा त्याचा हात धरून त्याला बसवू लागते.
"मला तुझी ही स्थिती बघवत नाहीरे समीर !! " त्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
समीर तिच्याकडे पाहाताच खाली बसला.

समीर बसताच त्रिशाही पुन्हा समोरच्या खुर्चीवर बसली. आणि बोलू लागली.
"तुला वाटत की तुला न सांगता तुझ्या आयुष्यातून निघून गेले !! पण तस नाहीरे समीर !!"
"नकोस पुन्हा यात गुंतुस त्रिशा !! " समीर फक्त एवढंच म्हणाला.
"पण तुला ऐकावं लागेल समीर !! एकदा ऐकून घे !! "
समीर आता शांत झाला होता. तो त्रिशाच सगळं बोलणं शांत ऐकू लागला.
"कॉलेज मध्ये आपण एवढं गुंग होतो की बाहेर काय चालतं हे आपल्याला माहीतच नसतं !! तू होतास आणि मी !! आपलं तस दुसरं जगच नव्हतं !! पण आपली ही सगळ्यात मोठी चूक होती. आपलं घर हे ही एक वेगळं जग आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत. आणि तसचं काहीस माझं झालं !! तुला माहितेय लास्ट इअर नंतर आपण पिकनिकला गेलो होतो !! "
"हो ! कसा विसरेल मी !! ती आपली शेवटची भेट !!" समीर कॉफी घेत म्हणाला.
"त्यावेळी बाबांचा फोन आला!! मला लगेच ये म्हणाले.!! खूप अर्जंट आहे !! मी तसचं निघाले !! कोणाला काहीही न सांगता !! आणि कारणं, काय झालं आहे हे मलाही माहित नव्हतं !! " त्रिशा अगदी अगदिक होऊन म्हणाली.
"तू न सांगताच गेली होतीस !!"
" पण ती वेळच तशी होती रे !! बाबांचा शब्द मोडायचा नको म्हणून मी काहीच तुला बोलले नाही !मला म्हणाले कोणाला काही बोलत बसू नकोस !! लगेच ये! तडक नाशिकला निघून गेले !तेव्हा तिथे पहाते तर बाबा गेले होते !जायच्या आधी त्यांनी मला कॉल केला होता! मी येई पर्यंत खूप काळजी करेन म्हणून त्यांनी फोनवर मला काहीच सांगितलं नव्हतं !! " त्रिशा डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती. तीचं बोलणं ऐकून समीरही आता तिला सावरत होता.
"पण पुन्हा तू कधीच मला काही नाही भेटलीस ?? मला खरंच हे आज कळतंय तुझ्याकडून, तुझ्या बाबांन बद्दल !!"
"कारण बाबांनी माझं भविष्य आधीच ठरवलं होत !! मंदारशी लग्न ठरवलं होत.!! आणि बाबांची शेवटची इच्छा म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं !! " त्रिशा आता सावरली होती.
समीर आता तिला मनमोकळ बोलू लागला. कित्येक रागाचे बंध आता तुटून पडले होते.
"खरंच ..!! मला माफ कर त्रिशा !!! मी तुला समजून न घेता !! तुला दोषी ठरवल !!पण तू अशी निघून गेलीस की मला तुझा राग आला !! पण यानंतर तरी तू पुन्हा कधीच भेटायचा प्रयत्न केला नाहीस!!!"
"तुझ्या समोर यायचं धाडस होत नव्हतं रे !!"
"राग होता तुझ्याबद्दल!!पण प्रेम आजही कमी नाही !! " समीर एक गोड स्मित करत म्हणाला.
दोघेही क्षणभर शांत झाले. आणि अचानक समिरचा फोन वाजतो. समीर फोन उचलतो आणि बोलतो.

"हॅलो !!हा बोल आकाश !! "
"अरे सम्या कुठे आहेस तू !! तुझ्या घरी आलो मी !! "
"आलोच मी थोड्या वेळात !! थांब तू ! "
"हो ये !! मी थांबतो तोपर्यंत !! "
"ओके "

त्रिशा फोनवर बोलत असलेल्या समीरकडे बघत असते . समीर फोन ठेवतो आणि त्रिशा बोलते.
"कुठे जायचं आहे का तुला ? "
"Actually !! आकाश आलाय घरी !! !" समीर थोड खुर्चीवर स्वतःला सावरून बसतं म्हणतो.
"ठीक आहे मग आपण पुन्हा भेटुयात !! किंवा अस कर ना !! उद्या माझ्या घरीच का येत नाहीस !! मंदारला ही भेटणं होईल तुला !! "
समीर हे ऐकून थोडा वेळ शांत बसतो. पण तेवढ्यात त्रिशाच बोलते.
"ये ना रे !! प्लीज !! "
त्रिशा कित्येक वेळ त्याला मनवते. आणि अखेर समीर बोलतो.
"ठीक आहे येतो नक्की !! नक्की येतो !!"
त्रिशा हे ऐकुन खुश होते .
"ठीक आहे !! Address मी तुला मेसेज करते!! मग उद्या भेटुयात !! संध्याकाळी !! ओके !!"
"ओके"

समीर आणि त्रिशा दोघेही जायला निघतात. त्रिशाला आपल्या मनावरच ओझ कमी झाल्यासारख वाटत होत. समीर ही आता त्रिशा बद्दल राग विसरून नव्याने विचार करू लागला होता.

पुन्हा उद्या भेटण्याचं वचन देऊन दोघेही गेले. समीर घरी आला. तिथे आकाश त्याची वाटच पाहत होता.

क्रमशः

✍️ योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : नकळत || कथा भाग ४ || प्रेमाच्या कथा ||

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...