मुख्य सामग्रीवर वगळा

विरोध || कथा भाग २ ||मराठी रंजक कथा ||

 


कथा भाग २

आपण एका गोड स्वप्नात असावं आणि अचानक आपल्याला जाग यावी असच काहीसं अनिकेतला वाटत होत. रात्रभर त्याला या गोष्टीने झोपच लागली नाही. प्रिती त्याच्यासाठी आता फक्त एक भुतकाळ होता. पण तो भुतकाळ पुन्हा वर्तमान होऊन आला तर काय करावं हेच त्याला कळल नव्हतं. तिच्या त्या अचानक समोर येण्याने त्याला क्षणभर का होईना भूतकाळाच्या त्या जुन्या आठवणीत नेलं होतं.

 विचारात रात्र अशीच सरून गेली. उगवतीच्या सूर्याने नवी स्वप्ने देऊ केली. सकाळी लवकर उठून अनिकेत ऑफिसला जायला निघाला. सगळी आवरा आवर करत असताना. मोबाईलची मेसेज टोन वाजते. अनिकेत मेसेज पाहून क्षणभर विचारात पडतो आणि मेसेज वाचू लागतो.

" अनिकेत !! तुझ ते काल मला अचानक भेटन खरंच खूप छान होत. तुझ्या आयुष्यातून मी गेल्यानंतर, पुन्हा मी तुला खूप शोधलं, पण तू मला पुन्हा कधीच भेटला नाहीस!! पण आता देवाने आपली भेट पुन्हा घडवून आणली आहे !! मला तुला पुन्हा भेटायचं आहे!! भेटशील ??"

अनिकेत मेसेज वाचून क्षणभर विचारात पडतो. काहीच प्रतिक्रिया न देता मोबाईल बंद करून आवरू लागतो.पुन्हा मेसेज टोन वाजते.अनिकेत पुन्हा मेसेज वाचू लागतो.

"तुझा राग मी समजू शकते. पण त्याच कारण तरी काय हे ऐकुन घेशील का??मला पुन्हा भेटशील का ??" 

अनिकेत पुन्हा मोबाईल बाजूला ठेवून देतो. तेवढ्यात श्वेता त्याच्या जवळ येते. हातातील नाश्ता त्याला देत म्हणते.

"काय झालं ?? आज एवढा उशीर का होतोय तुला ??बरा आहेस ना ??" 
"मी बरा आहे !! मला काय होणार आहे !! " अनिकेत हसत बोलतो. तेवढ्यात शेजारी ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजतो.
"काय रे !! कोणाचा मेसेज येतोय !! बघत का नाहीयेस !!" 
"कंपनीचा आहे !! जाऊदे चल मी निघतो !!"

  श्वेताला खोट बोलून अनिकेत ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये सुद्धा त्याला काय करावं काहीच कळत नाही. कित्येक मेसेज येऊन गेल्यानंतर प्रिती त्याला फोन करते. कित्येक वेळा फोन वाजून गेल्यानंतर अखेर अनिकेत फोन उचलतो.

"हॅलो!!"
"प्रिती बोलते !!"
अनिकेत काहीच बोलत नाही.
"अनिकेत मला तुला भेटायचं आहे !!तू अस का करतोयस ??"
"पण मला तुला भेटायचं नाहीये आता !!" अनिकेत रागात येऊन बोलतो.
"आणि प्लीज !! हे मेसेजेस करणं !! बंद कर!!"
"एवढा राग आहे माझ्याबद्दल ??" 
"राग नाहीये !! पण आता तू ती प्रिती नाहीयेस आणि मी तो अनिकेत पण राहिलो नाहीये !!"
"हे बघ अनिकेत एवढा माझा द्वेष करू नकोस !! Please एकदा भेट !! तिथेच !आज संध्याकाळी ! "
"ठीक आहे !! अगदी शेवटचं !!"

अनिकेत भेटण्याचं ठरवून मेसेजेस आणि कॉल्स मधून सुटका करून घेतोय अस त्याला वाटलं. आयुष्याची कित्येक वर्षे सरून गेल्या नंतर काय बोलायचं आहे, पण ती पुन्हा का आयुष्यात आली या विचाराने त्याला पुरत हैराण करून सोडलं होत.बघता बघता संध्याकाळ झाली, अनिकेत प्रितीला भेटायला जातो. तेव्हा ती तिथे त्याच्या आधीच येऊन बसलेली असते. दोघेही समोरासमोर कित्येक क्षण गप्प बसतात आणि अखेर प्रितीच बोलायल सुरुवात करते.

"भेटायला आलास याचा खूप आनंद झाला !!"
अनिकेत अगदी थोड हसू चेहऱ्यावर आणून बोलतो.
"मलाही झाला असता तर बर झालं असत !!"
प्रिती काहीच बोलत नाही. क्षणभर शांत राहते आणि बोलते.
"दहा वर्ष लोटली या सगळ्या गोष्टींना !! राग आजही आहे ??"
अनिकेत फक्त तिच्याकडे पाहत राहतो.
"आजही तितकच प्रेम करतोस माझ्यावर ??" प्रिती अगदिक होऊन विचारते .
"नाही !! " अनिकेत क्षणात बोलतो.
"श्वेता!! तुझी बोयको तुम्ही मजेत आहात!! पाहून छान वाटलं !!"
अनिकेत फक्त ऐकत राहतो.
"या दहा वर्षात कित्येक वेळा तुझी आठवण मला आली !! पण मी खूप शोधूनही मला तू सापडला नाहीस !!"
"सूरज प्रेम करत नाही तुझ्यावर ??" अनिकेत तिला विचारतो.
"करतो रे !! खूप करतो !! पण तुझी आठवण काही गेली नाही !!"
"एवढंच प्रेम होत तर जायचंच नव्हतं ना मला सोडून मग !! "
"ती माझी चूक होती !!" प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.
"नाही प्रिती !! चूक नाही !! तो तू विचार करून केलेला निर्णय होता!! " अनिकेत आता मोकळेपणाने बोलू लागला.
"म्हणजे??" प्रिती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली.
"म्हणजे !! मी भिकारी आणि तो सूरज श्रीमंत !! मी देऊन देऊन काय दिलं असतं !! पण सुरजचा पैसा , संपत्ती याची भुरळ पडली तुला!!" 
"काय बोलतोयस तू अनिकेत !! अस काही नाहीये !! "
"मग कोणताही विरोध नसताना !! सर्वांची आपल्या नात्याला संमती असतानाही अचानक तू त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय का केलास ?? आणि जाऊ देना !! मला या विषयात आता पडायचं नाहीच !! मी निघतो !!" अनिकेत उठून निघतो.
"थांब अनिकेत !! आता मी तुला माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाहीये !!"प्रिती त्याला अडवत म्हणते.
"आता खूप उशीर झालाय प्रिती !!!bye!!" अनिकेत निघून जातो.

 अनिकेत गेल्यानंतर कित्येक वेळ प्रिती तिथेच बसून राहते. तिला तिचेच विचार छळु लागतात. 

"अनिकेत बोलला त्यात काय चूक आहे प्रिती ! तू नात्याचा व्यवहार केलास!! तू पाहिलंस नात श्रीमंत आहे की गरीब !!तू मन कधी ओळखुच शकली नाहीस !! हो प्रिती तू चुकली आहेस !! तुझ्या आयुष्यात पैसा खूप आला !! पण प्रेम ?? नाहीना !! बघ !! अनिकेतने पुन्हा प्रेम केलं !! त्याच्या आयुष्यात श्वेता आली !! त्याच्यावर ती खूप प्रेम करते !! तुझ काय ?? फक्त पैश्यात नाती मोजणारा नवरा ?? की एक उजाड आयुष्य ?? प्रेम कुठे आहे तुझ प्रिती !! ते बघ तुझ खर प्रेम तर तुझ्यापासून दूर जातंय!! " अचानक प्रिती भानावर येते आणि स्वतःला बोलते.

"नाही !! त्याला मी जाऊ देणार नाही !! तो माझा आहे !! तो माझा आहे !!"

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...