मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग १ || सुंदर मराठी कथा ||




टीप :"दृष्टी " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

"त्या डोंगराच्या पलीकडे सूर्य आता हळूहळू मावळतो आहे आणि त्या तिथे पलीकडे छोट्या टेकडीवर इवले इवले दिवे दिसत आहेत. बहुतेक तिथे छोटी वाडी असावी. आणि हे काय !! आकाशात तर पक्ष्याचे थवेच्या थवे जात आहेत!! बहुतेक घराकडे जाण्याची ओढ लागली असावी. ही सांज असतेच तितकी सुंदर!! आपल्या लोकांच्या सहवासात असावं !! अशी ओढचं लावते ती !! त्या दूर पायवाटेवर खाली कोणी शेतकरी आपले गाय वासरू घराकडे घेऊन जात आहेत !! आणि गंमत म्हणजे तो निवांत पुढे चालतोय आणि ते गाय वासरू मनाने त्याच्या मागे येतायत !! मुक्या जनावरांना सुद्धा माया, प्रेम कळतं !! " क्षितिज बोलता बोलता थांबला. 

त्याला ऐकणारी दृष्टी क्षणभर शांत बसली आणि म्हणाली.

"थांबलास का सांग ना मला !! अजुन कशी आहे ही संध्याकाळ ?? त्या बुडणाऱ्या सूर्याचा रंग कसा आहे?? सांग ना ?? त्या पक्ष्यांना क्षणभर थांबायला सांग ना !! मला ना मनमोकळ बोलायचं आहे त्यांना !! क्षितिज !! बोल ना रे !!" दृष्टी उत्सुकतेने बोलू लागली होती.

क्षितिज तिचा हात हातात घेत तिला बोलू लागला.
" ही संध्याकाळ तुझ्या इतकीच सुंदर आहे दृष्टी !! " 
दृष्टी गालातल्या गालात हसते आणि म्हणते.
"पण ही संध्याकाळ रंगांची उधळण करते क्षितिज !! मला तर रंग काय तोही माहीत नाही !! या नजरेला ती संध्याकाळ दिसतच नाही !!" दृष्टी उदास होत म्हणते.
"माझ्या नजरेतून तूही पहाते आहेस ना ?" क्षितिज तिच्या जवळ जात म्हणत होता.
"पण??" दृष्टी मध्येच म्हणाली.
"आता पण नाही आणि काही नाही !! क्षितिज जागेवरून उठत म्हणाला. 

संध्याकाळ सरून आता रात्र झाली होती. दृष्टीला घेऊन क्षितिज आता परतीच्या वाटेवर निघाला होता. जाता जाता तिला तिच्या आश्रमात सोडायचे होते, या विचाराने त्याच्या मनात नुसता गोंधळ घातला होता. न राहवून तो म्हणाला.
"तुला मी किती वेळा सांगितलय दृष्टी की तू त्या आश्रमात राहू नकोस म्हणून !! माझा एक फ्लॅट बंदच आहे!! तिकडे राहा म्हणून !! "
"मी तरी तुला किती वेळा सांगितलं क्षितिज की मी नाही राहू शकत रे!!  मला जस कळायला लागलं तेव्हापासून मी तिथे, त्या आश्रमात राहते आहे !! तिथं माझी जिवाभावाची माणसं आहेत !! माझी एक बहिणही तिथेच आहे !तीही माझ्यासारखी अनाथ आहे!!  तिला सोडून कस येऊ मी तिकडे ??"
"पण मला तू तिथे राहणं आवडत नाही !! "
"कधी आलास तर कळेल तुला !! की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेम करणारी माणसं असतात तरी कशी !! "
"येऊ तरी कसा !! तुमची ती केअर टेकर मला नुसतं खाऊ की गिळू अस पाहत असते !! " क्षितिज अगदी रागात येत म्हणतो.
दृष्टी क्षितिजच्या बोलण्यावर हसते. आणि बोलते.
"कोण मालती ताई !! अरे मनाने खूप चांगल्या आहेत त्या !! "
"अस तुला वाटत !! "
"अरे नाही खरंच !! एकदा भेट तू त्यांना म्हणजे कळेल !! "
"भेटायला कश्याला हवं समोरच आहेत त्या !!"
"म्हणजे ?? " दृष्टी प्रश्नार्थक चेहरा करत विचारते.
"म्हणजे आपण पोहचलो ! आला आश्रम !!"

क्षितिज दृष्टीला कार मधून उतरायला मदत करू लागला. समोर दृष्टीची अनाथ बहीण भावना तिला पाहताच लगेच तिला घ्यायला जवळ आली. क्षितिजकडे पाहून ती हसली. दोघीही आत आश्रमात जाऊ लागल्या. क्षितिज दृष्टी आत जाई पर्यंत तिला पाहत राहिला. 

दृष्टी आत येताच मालती ताई समोरच होत्या. तिला पाहून त्या बोलू लागल्या.
"दृष्टी!! "
आवाजाने दृष्टी चपापली. 
"कोण ?? मालती ताई ??"
"हो मीच !! "
"बोला ना ताई !!"
"कुठे गेली होतीस दृष्टी ??"
"सूर्यास्त पहायला !!" दृष्टी म्हणाली.
"तू पाहिलास ??" मालती ताई तिला जवळच्या खुर्चीवर बसवत म्हणाल्या.
"हो !! पाहिला मी सूर्यास्त !! क्षितिजच्या नजरेतून !! " 
"छान !! हे सगळं ठीक आहे दृष्टी !! पण तू हे विसरू नकोस की तू एक अंध अनाथ मुलगी आहेस ! आणि क्षितिज एक सुंदर देखणा श्रीमंत घरातला मुलगा आहे !!" 
"पण क्षितिज माझ्यावर प्रेम करतो !!"
"हे वय असतच अस पोरी !! तुम्ही दोघंही तरुण आहात !! तूही सुंदर आहेस !! उद्या काही अनुचित घडू नये म्हणून तुझी काळजी वाटते!!" मालती ताई दृष्टीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या.
"माझा क्षितिज असा नाही !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !!"
"मलाही असंच हवं आहे मुली !! तुझ्या या अश्या असण्यामुळे आधीच तू खूप काही भोगलं आहेस !! तुझं भविष्य सुंदर व्हावं एवढंच वाटत मला ! "

दृष्टी नकळत मालती ताईला मिठी मारते. मालती ताई भावनाला तिच्या खोलीत घेऊन जायला सांगते. जवळ उभी भावना तिला उठवत म्हणते
"चल दृष्टी ताई !!"
 हातातली काठी बाजूला ठेवून दृष्टी खोलीत जायला निघते. तेव्हा शेजारीच उभ्या काही मुली उगाच तिच्याकडे पाहून हसतात. भावना त्यांच्याकडे रागाने पाहत खोलीत जाते. दृष्टीला पलंगावर बसवून ती बाहेर निघून जाते. पलंगावर बसलेल्या दृष्टीच्या कानात मालती ताईचे ते शब्द घुमू लागतात.

"तू एक गरीब अनाथ अंध मुलगी आहेस !! आणि तो श्रीमंत घरातला मुलगा!!"

"माझा क्षितिज असा नाहीये !! हो मला माहितीये !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !! मी अनाथ अंध मुलगी असूनही त्यानं माझ्यावर नितांत प्रेम केलं !! हे पुरेस नाही का ?? माझा क्षितिज , या आंधळ्या मुलीला जग दाखवणारा !! तिची क्षणोक्षणी दृष्टी होणारा !! मला क्षणात सोडून जाणार नाही !! नाही !! नाही !!" अचानक दृष्टी बैचेन झाली आणि तितक्यात तिच्या पर्स मधून मोबाईल फोनची रिंग वाजली. ती भानावर येतं चाचपडत चाचपडत फोन शोधते. क्षणभर शोधल्यावर फोन सापडतो.

फोन उचलत ती बोलू लागते.

"हॅलो!! कोण बोलतंय ??"

"क्षितिज बोलतोय !!!" पलीकडून आवाज ऐकू येतो.

क्रमशः ...

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...