मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग २ || मराठी रंजक कथा ||



कथा भाग २

 घरी पोहचताच क्षितिजने दृष्टीला फोन लावलेला असतो.
"बोल ना क्षितिज !! पोहचला तू घरी ??" 
"हो !! आत्ताच आलो !! " क्षितिज आपल्या खोलीत येत म्हणतो.
"बर जेवण केलंस की नाही अजुन ??" दृष्टी विचारते .
"नाही !! आता करणार आहे !!"

क्षितिज असे म्हणत असतानाच खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडत होतं. क्षितिज कुतूहलाने पाहतो. 
"कोण आहे ??"
खोलीत कोणी आत येताना पाहून म्हणतो. आणि क्षणात बोलतो.
"आई तू !! ये ना !! "
आईकडे पहात पुन्हा फोनवर बोलतो.
"मी तुला नंतर फोन करतो !!! आणि हो ऐक उद्या सकाळी येतोय मी तुझ्याकडे !! तेव्हा तयार रहा !!!" एवढं बोलून क्षितिज फोन बंद करतो. समोर उभी आई म्हणते.
"पुन्हा दृष्टी ?? मी किती वेळा सांगितलय तुला क्षितिज !! या मुलीच्या मागे तू तुझं आयुष्य नको वाया घालू !!! "
"आई प्लीज !!! आता पुन्हा नकोस बर सुरू करू !!!" क्षितिज आईला मध्येच बोलतो.
"माझं बोलणं तुला एवढ लागत?? अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना !! कोण कुठली अनाथ मुलगी !!! आणि त्यातही आंधळी !! काय पाहिलंस देव जाणे !!"
"नितांत प्रेम काय असत !! ते पाहिलं मी !! "
"प्रेम !! या पैश्या पुढे !! संपत्ती पुढे !! प्रेम कुठच टिकत नाही !!"
"खरंय आई !! या पैश्या पुढे प्रेम कुठेच टिकत नाही !! म्हणूनच तू बाबांना फक्त ते गरीब आहेत म्हणून सोडलं !! का तर हा पाहणारा समाज तुला नावं ठेवेन म्हणून !! "
"क्षितिज !!! काय बोलतोयस कळत का तुला !! " आई थोडी रागात येत म्हणाली.
"नाही कळत मला आई !! पण मला एवढं कळत की हा समाज बघतो !! म्हणून खोटी आभूषण मिरवण !! खोटी नाती जपणं !! याला काय म्हणायचं ?? त्यापेक्षा मला माझी दृष्टी खूप वेगळी वाटली !! तिने माझ्याकडे काहीच मागितलं नाही आई !! ना तिला माझ्यात काही दिसलं !! तिने फक्त माझ्यावर प्रेम केलं !! अगदी हृदयातून !! "
"तुझ्याशी ना बोलण्यात अर्थच नाही!! ! वेड लागलंय तुला !!" 
एवढंच बोलून आई खोलीतून बाहेर निघून जाते. क्षितिज तिला आडवतही नाही.

क्षणभर क्षितिज शांत बसून राहतो. मनात कित्येक विचारांचा गोंधळ घालत राहतो.
"दृष्टी !! जिच्या आयुष्यात दृष्टीच नाही !! ती माझी दृष्टी !! या देवाने तिची दृष्टी हिरावून घेतली ,पण आयुष्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे सांगायचं विसरला नाही तो तिला !! आणि त्याच ऐकून !! त्याला कधीच दोष न देता !! जगणारी ही दृष्टी मनाच्या कोपऱ्यात अगदी कायमच घर करून बसली आहे!! कसं सांगू मी आई तुला !! जेव्हा माझी आणि तिची पहिली भेट झाली होती, तेव्हा ती दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत होती. समोरच्या मैदानात खेळणाऱ्या आपल्या सर्व अनाथ बांधवांना प्रोत्साहन देत होती. अस दुसऱ्यासाठी जगायला खरंच ताकद लागते. अशी ही माझी दृष्टी !! पैसा ,संपत्ती याही पेक्षा मला जगण्याची प्रेरणा देते. नात्याला नुसती दृष्टी असून भागत नाही !! तर प्रेमही असावं लागतं !! " 

क्षितिज अचानक भानावर आला.त्याला काहीतरी आपल्याकडून चुकल्या सारखे वाटू लागले. तो खोलीतून बाहेर येत आईला शोधू लागला. आई समोरच होती. डोळ्यातून येणारे अश्रू क्षितिजाला कळू नये म्हणून त्याला पाहताच लगेच पुसून घेत होती.
"आई !!"
आई काहीच बोलत नाही. त्याला पाठमोरी उभा राहून आपल्या कामात व्यस्त राहते.
"आई माझं चुकलं !! मला माफ कर !!"
आई काहीच न बोलता निघून जाऊ लागते. तिला थांबवत क्षितिज पुन्हा बोलतो.
"आई !! खरंच माझं चुकलं!! मगाशी मी तुला अस बोलायला नव्हतं पाहिजे !! "
"बोलून झालं की सगळे असेच म्हणतात!! " आई डोळ्यात आलेला अश्रू पुसत बोलते.
"आई खरंच माझं चुकलं !! " 
"तुझं नाही माझंच चुकलं क्षितिज !! मी बाबांपासून का वेगळं झाले !! हे कधी मी तुला सांगितलंच नाही !! तू तुझ्या मनाला वाटेल ते तर्क लावत राहिलास !!"
क्षितिज फक्त ऐकत राहिला.
"लग्नाआधी तुझ्या बाबांनी मला खूप स्वप्न दाखवली !! कित्येक वचनही दिली !! पण लग्नानंतर मात्र तुझ्या बाबांना कोणतीच जबाबदारी नकोशी वाटू लागली !! तुझा जन्म झाला!! खिशात पैसा नाही !! बाबांना म्हटलं तर त्यांनी हात झटकून दिले !! "
"मग पुढे !!" क्षितिज कुतूहलाने विचारू लागला.
"पुढे मग मी तुझ्या बाबांना सोडायचा निर्णय घेतला !! कारण असा नाकर्ता नवरा आयुष्यात असाण्यापेक्षा आपण आपला वेगळा मार्ग निवडावा !! हे मी ठरवलं !! मग पुढे छोटा उद्योग सुरू केला !! आणि वाढत वाढत आज हे सगळं राज्य निर्माण केलं !! तुझे बाबा त्या तिथंच कायमचे राहिले!! "
"मला तू हे कधीच सांगितलं नाहीस !!"
"कारण तशी वेळच कधी आली नाही !! पण एक भीती वाटते म्हणून मी तुला बोलते !! दृष्टी डोळ्याने अधू आहे !! तिची साथ कधीच सोडू नकोस!! कारण आयुष्यात जबाबदारी बदलत जाते !! लग्नाआधी वाटणार प्रेम !! हे लग्नानंतर जबाबदारी होते.जर आयुष्यभर तिची साथ देण्याची तयारी असेल तरच तिच्यावर प्रेम कर !!"
"आई मी तुला खरंच ओळखू शकलो नाही !! मला माफ कर !! आणि मी तुला वचन देतो की मी तिची साथ कधीच सोडणार नाही !!!" क्षितिज आईचा हात हातात घेत बोलतो.

आयुष्यात आपल्यावर विश्वास ठेवून येणारी व्यक्ती ही आपली जबाबदारी असते हे क्षितिजाला कळल होत.खरतर प्रेम करणं खूप सोपं असतं पण ते निभावणं खूप कठीण असतं हेच आईला सांगायचं होत. दृष्टीला पाहता येत नाही. तिची हीच बाजू उद्या आयुष्यभर त्याला सांभाळायचं होती. क्षितिज आपल्या खोलीत गेला. आईने त्याला सांगितलेलं सगळं काही आठवून त्यावर विचार करत राहिला.

"आईच म्हणणं खरंच बरोबर आहे !! माझं हे प्रेम दृष्टी साठी आयुष्यभर असंच राहणार !! आई तुला मी वचन देतो !!" 
क्षितिज डोळे मिटून कित्येक वेळ विचार करत राहतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजते.

क्षितिज डोळे उघडत फोन कोणाचा आहे हे पाहतो.
"हॅलो !! कोण !!"
"दादा मी आश्रमातून भावना बोलते आहे !!"
"बोलणं भावना !! कसा काय फोन केलास!!"
"दादा !! दृष्टी दीदी खोलीत पडली !!"
क्षितिज जागेवर उभा राहतो , गोंधळून जातो आणि भवनाला कित्येक प्रश्न विचारतो.
"कधी ?? कुठे ?? बरी. आहे ना ती ???मी येतो लगेच थांब !!"
एवढं बोलून क्षितिज जायला निघतो.

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

वाचा पुढील भाग : दृष्टी || कथा भाग ३ || Marathi love Stories ||

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...