मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग ४ || हृदयस्पर्शी कथा ||



कथा भाग ४

"दृष्टीला उद्या घरी आणायचं या विचारात रात्र निघून गेली. नव्या दिवसाने नवी दिशा या आयुष्याला दिली. क्षितिज आज नेहमी पेक्षा जरा लवकरच उठला होता. सकाळी लवकर आवरून, सर्व कामे पूर्ण करून, दृष्टीला आणायला जायचं या विचारात तो होता. आईच्याही हे लक्षात आलं होत. त्याला आवरताना पाहून ती मध्येच बोलते.

"नाष्टा तरी करणार आहेस की नाही ??"आई मिश्किल हसते.
"हो आई !! करणार आहे !! " तिच्याकडे हसत पाहत तो म्हणाला.
"ये मग !! तुझ्या आवडीचे मस्त दडपे पोहे केलेत!!"
"मस्तच !!" क्षितिज खुर्चीवर बसत म्हणाला.
"घे ! कधी जाणार आहेस दृष्टीला घरी घेऊन यायला !!!!"
"एक काम आटोपलं की लगेच जाणार आहे !!"
"तिला फोन करून सांगितलंस की नाही ??"
"नाही !! Surprise .!!" क्षितिज गालात हसत म्हणाला.
"छान !!" आई त्याला अजून पोहे वाढत म्हणते.
"वाह काय !! मला टेन्शन आलंय मालती ताईंच!!! त्या परवानगी देतील की नाही माहीत नाही !!"
"देतील रे !! आणि काही तसे म्हणाल्या तर फोन कर मला !! मी सांगेन हवं तर !!"
"हो चालेल!!" क्षितिज हसत म्हणाला. 

डिश मधले पोहे संपवून क्षितिज आता बाहेर निघाला होता. त्यालाही दृष्टीला भेटायची ओढ लागली होती.पण कित्येक वेळ तो कामातच गुंतून राहिला. केव्हा काम संपवून दृष्टीला आणायला जातो आहे असं त्याला वाटायला लागलं होतं. अखेर कित्येक वेळ काम केल्यानंतर तो आश्रमात जायला निघाला. मोबाईल पाहतो तर आश्रमातून कित्येक फोन त्याला आले होते. त्याच्या मनात अनेक विचार आले. आश्रमातून इतके कॉल्स कसे काय त्याला काहीच कळत नव्हतं. अखेर तो घाईघाईत आश्रमात पोहचला. समोर मालती ताई उभ्याच होत्या. त्यांच्या जवळ जात क्षितिज बोलू लागला.

"मालती ताई !! आश्रमातून इतके कॉल्स !! सगळं ठीक आहे ना ??" क्षितिज मनात आलेल्या कित्येक विचारांना शांत करत बोलू लागला.
"कुठे होतास तू ?? तुला किती कॉल्स केले !! एकही रिसिव्ह केला नाहीस तू !! अरे दृष्टी !!" 
"काय झालं दृष्टीला??" क्षितिज मध्येच बोलला.
"अरे दृष्टी हा आश्रम सोडून गेली रे !! " मालती ताई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या.
"आश्रम सोडून ?? कुठे !! आणि तुम्ही कोणीच अडवल कस नाही तिला !! पण का सोडून गेली ती ???"

मालती ताई भानावर येत बोलू लागल्या. क्षितिजला झाली हकीकत सांगू लागल्या.
"काल तू गेल्यावर दृष्टीचे आई बाबा कित्येक वर्षांनी तिचा शोध घेत आले होते!! त्यांनी दृष्टी त्यांची मुलगी आहे अस आश्रमातल्या सगळ्या व्यवस्थापकांना पटवून दिलं !! आणि तिचा विरोध असतानाही तिला ते सोबत घेऊन गेले !!"
"सोबत घेऊन गेले ?? असे कसे घेऊन गेले?? इतक्या वर्षांनी कसे काय आले ?? आणि तुम्ही मला आता हे सांगताय !! कालच फोन का केला नाही ??" क्षितिजच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठत होते.
"काल सगळं हे इतकं अनपेक्षित घडत होतं की दृष्टीला सांभाळाताना तुला फोनच करता आला नाही !!!" मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"नाही !! खोटंय हे सगळं !! कोण कुठले लोग !! त्याच्या सोबत असच पाठवून दिलं !! मी दृष्टीला फोन लावतो !! तिला जाब विचारतो !! मला न सांगता तू गेलीस तरी कशी ते !! " क्षितिज खिशातून मोबाईल बाहेर काढू लागला.
"त्याचा काही उपयोग नाहीये !! बंद लागतोय तिचा फोन !! "मालती ताई मध्येच म्हणाल्या.
"कुठे घेऊन गेलेत तिला !! सांगितलं असेल ना त्यांनी ??" 
"नाही !! अस काहीच बोलले नाहीत ते !! " 
"मालती ताई हे काय झालं !! आज तिला मी घरी घेऊन जायला आलो होतो!! आणि ती मला न सांगता निघून गेली!! अस कस करू शकते ती !!" क्षितिज आता डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकत नव्हता.
"मला तिच्याबद्दल काहीही कळाल!! ती कुठे आहे !! तर मी तुला फोन करून सांगेन !! तू पण तिला सारख कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर !! ती जोपर्यंत सुखरूप आहे, हे कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये !! " मालती ताई क्षितिजला सावरत म्हणाल्या.
"पण तरीही!! मला अजूनही विश्वास बसत नाहीये की ती मला अस सोडून गेली ते !!" क्षितिज मालती ताईंना मनातलं बोलू लागला.
"तिने केला प्रयत्न !! पण ते सगळं एवढं अनपेक्षित होत की तिला ते सावरून घेता नाही आल. शेवटी जाताना ती एकच म्हणाली, क्षितिजला सांगा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही !! मला तुझ्यासोबत घेऊन चल !! अगदी कायमच !!" मालती ताई क्षितिजला सगळं काही सांगत होत्या.

क्षितिज हताश होऊन परत चालला होता.त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजलं होतं. दृष्टीचा तो सुंदर चेहरा त्याच्या नजरे समोरून हटतच नव्हता.गाडीच्या त्या वेगात त्याच्या विचारांच्या वेगालाही मर्यादा राहिली नव्हती. दिशाहीन वादळा सारखी त्याची अवस्था जणू झाली होती. 

"एखादी व्यक्ती मनात घर करून बसली, की तिच्यासाठी काहीही करावं असं हे मनच त्याला सांगत!! ती व्यक्ती विसरून गेली असेल तर आठवणींच्या विश्वात पुन्हा त्याला जिवंत करावं असं हे मन त्याला सांगत !! त्याच चित्र काढावं अस की त्याचे रंग आपण बनावे अस हे मनच सांगत !! मग हे मन या आठवणीतल्या त्या व्यक्तीला चारही दिशा शोधावं असंही सांगत !! पण तरीही ती व्यक्ती शोधूनही सापडत नसेल तर काय करावं !! हे मन मात्र ते सांगत नाही !! त्या आठवणी कश्या पुसाव्या तेही सांगत नाही !! माझी दृष्टी माझ्यापासून दूर गेली !! कुठे गेली ?? कुठे असेल ?? काही माहीत नाही !! चारही दिशा मी तिला शोधलं पण मला ती काही सापडत नाही !! अगदी कालपर्यंत जीच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे !! तो हतबल होऊन बसला आहे !!" क्षितिज आपल्याच विचारांच्या तंद्रीत बसून राहतो. आश्रमासमोर ,गाडीतच.

अखेर कित्येक वेळ तसाच बसून राहिल्या नंतर क्षितिज घरी जायला निघतो. त्याचे मन मात्र त्या आश्रमातून निघेना. दृष्टीला अजूनही ते मन तिथेच शोधत होते. जड पावलांनी तो जायला निघाला, घरी जायला उशीर झाला. घराचे दार उघडताच आई समोरच उभी होती. दृष्टी येणार म्हणून तिने सगळी तयारी केलेली होती. क्षितिजला एकट्याला पाहून आई विचारते,

"एकटाच आलास !! दृष्टी नाही आली ??" आई प्रश्नार्थक नजरेने पाहते.
"नाही !" क्षितिज थोड तुटकच बोलतो.
" का रे ?? मालती ताईंनी परवानगी दिली नाही का ?? तुला म्हटलं होत मी तसं काही असेल तर मला फोन कर म्हणून !! मी सांगितलं असत त्यांना !!" आई क्षितिजकडे बघत म्हणते. काहीतरी झालं आहे याची जाणीव तिला होते.
"नाही !! तसं काही नाही!!" 
"काय झालं क्षितिज ?? काही सांगशील का ??" 
"आई दृष्टी आश्रम सोडून निघून गेली !! "
"आश्रम सोडून निघून गेली ?? कुठे ?? आणि का ??"
"काल कित्येक वर्षांनंतर तिचे आई बाबा तिला शोधत आले होते म्हणे !! त्याच्या सोबत ती निघून गेली!! " क्षितिज समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
"असे कसे आले आई बाबा ?? आणि कोण कुठली माणसं !! आश्रमातल्या लोकांनी विश्वास ठेवलाच कसा??" 
"त्यांनी त्याच्याकडे काही कागदपत्र दाखवली !! तिची एक जन्मखून सांगितली !! त्यानंतर त्याची खात्री पटली आणि त्यांनी तिला जाऊ दिल !!" क्षितिज बसल्या आवाजात सार काही सांगू लागला.
"जाताना तिला तुझी एकदाही आठवण आली नाही ??"
"तिचा विरोधच होता म्हणे !! मालती ताई सांगत होत्या !! पण अखेर नाईलाज झाला !! आणि ती गेली त्यांच्यासोबत !!कुठे गेली !! आता सुखरूप आहे की नाही !! काहीही माहीत नाही !! " 
"तिचे आई वडील मिळाले याचा आनंद करावा की दुःख काहीच कळत नाहीये !! पण ती तुला अशी सोडून नाही जाणार !! तू नकोस असा हताश होऊस !!" आई क्षितिजला धीर देत म्हणाली.
" मला तर हे सगळं खोटं आहे अस वाटतंय !!" क्षितिज स्वतःला सावरत म्हणाला.

क्षितिज आई सोबत कित्येक वेळ आपल्या मनातलं बोलून अखेर आपल्या खोलीत आला. कित्येक वेळ आज झालेल्या गोष्टी आठवून विचार करत बसला. दृष्टी आज अचानक कुठे निघून गेली हे त्याला काहीच केल्या कळतं नव्हतं. त्याने कित्येक वेळा तिचा फोन लावून पाहिला पण अजूनही बंदच लागत होता. आश्रमात विचारून पाहिलं तिथेही ती कुठे गेली काहीच कळतं नव्हतं. 

रात्र अशीच गेली, रात्रभर क्षितिज झोपलाच नाही. दृष्टीच्या आठवणींनी त्याला पुरत वेडून घेतलं होत. "तिला दृष्टी नाही, तरी ती माझ्या नजरेतून ही दुनिया पाहत होती. पण आता न सांगता निघून गेली , मग आता ही दुनिया ती कशी पाहत असेल ??दृष्टी !! कुठे आहेस तू ?? तुझ्या आठवणी खूप छळतात मला !! तुलाही माझी आठवण येत असेलच ना?  कुठे आहेस ?? कशी आहेस ?? " तुझ्या आठवांचा हा पाऊस सतत मला भिजवत आहे." 

"हरवून गेल्या दिशांना 
व्यर्थ उगाच शोधणे!!
डोळ्यातल्या अश्रूंना
तुझीच ओढ लागणे!!

व्यर्थ सारी स्वप्ने ही
एकांत मनी तो दिसणे!!
तुझ्या आठवांच्या जगात
उगाच फिरुनी येणे!!

हात तुझा हाती असावा
क्षणाचे हे बोलणे !!
आयुष्यभराची आठवण तू
हेच खरे जगणे !! "

क्षितिज कित्येक वेळ त्या अंधारात त्या खोलीत बसून राहिला.

क्रमशः 

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...