मुख्य सामग्रीवर वगळा

दृष्टी || कथा भाग ५|| शेवट भाग ||



कथा भाग ५ 

"क्षण न क्षण आता दृष्टीच्या विचारात जात होता. क्षितिज हताश होऊन आपल्या खोलीत बसला होता. रात्र सरून दिवस उजाडला होता पण त्याच भान त्याला राहील नव्हतं. त्याची ही अवस्था पाहून आईला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती त्याच्या खोलीत जाते तेव्हा तो आपल्याच विचारात गुंग होता. त्याला अश्या अवस्थेत पाहून आई म्हणते,
"क्षितिज असा हताश होऊ नकोस रे !!! ती येईल पुन्हा !! ती करेन तुला कॉन्टॅक्ट !! तिलाही आता राहवत नसेल रे तुझ्या शिवाय !!" 
क्षितिज फक्त आईकडे पाहतो. तिच्या डोळ्यात त्यालाही दृष्टी बद्दलची काळजी दिसून येते.
"चल ! दुपार झाली !! जेवायला चल !!! "आई त्याला उठवत म्हणते.
"नाही नकोय मला आई !! " क्षितिज आईकडे पाहत म्हणतो.
"का ??" 
"भूक नाहीये !!" 
"काल सकाळी जेवला आहेस तू !! अजुन भूक नाही !! चल बर !! अस उपाशी बसू नये !! "

आई आणि क्षितिज दोघेही जेवायला बसतात. जेवत जेवत आई क्षितिजला कित्येक मनातल्या गोष्टी बोलू लागते.
"तुला माहितेय क्षितिज !!! तुझे बाबा जेव्हा असेच मला न सांगता गेले होते तर मलाही असंच सार काही नकोस वाटायला लागलं होत!!! "
"मग !! तू काय केलंस ??" क्षितिज कुतूहलाने तिला विचारतो.
"मी काहीच केलं नाही!! शोधलं फक्त !! पण तिथे शोधायचं विसरून गेले जिथे ते होते !! "
"म्हणजे ??" क्षितिज आईकडे लक्ष देवून ऐकू लागला.
"म्हणजे या मनात !! आपली आवडती व्यक्ती कुठे जरी गेली तरी ती मनात नेहमीच आपल्या सोबत असते !! आणि मग थोडा विचार केला तेव्हा लक्षात आलं की तुझे बाबा जाऊन जाऊन जातील तरी कुठे जरी रस्ता चुकले तरी !! तिथे मला ते नक्की मिळतील !! आणि ते मला भेटले !!"
"म्हणजे तुझा विश्वास तुला त्यांना पुन्हा भेटणार हे सांगत होते तर !!"
आई काहीच बोलत नाही. ती क्षितिजकडे पाहून फक्त हसते.

क्षितिज जेवण करून आपल्या खोलीत येतो. त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं. अखेर तो थोड्या वेळाने त्याच टेकडी वर जातो. जिथे दृष्टी आणि तो निवांत कित्येक वेळ गप्पा मारत बसायचे. क्षितिजच्या नजरेतून दृष्टी संध्याकाळ अनुभवायची.तिथे शेजारी कित्येक जोडपी निवांत सूर्यास्त पाहत बसली होती. त्याच शेजारी क्षितिज बसून राहतो, एकटाच पाहत त्या सूर्याकडे.

"या संध्याकाळी सर्व काही आहे फक्त माझी दृष्टी सोडून !! आज ती सोबत नाही तर हे सगळं मला अगदी बेरंग वाटायला लागलं आहे. काय करावं ??कुठे शोधावा तो रंग !! काहीच कळत नाही !! दृष्टी माझ्या आयुष्यात अचानक यावी आणि अशी सहज निघून जावी अस मला कधी वाटलं ही नव्हतं. याच त्या बाकड्यावर ती मला कित्येक वेळ आपल्या मनातलं सारं काही सांगत बसायची !! मलाही ती सोबत असली की पूर्णत्व मिळाल्याची जाणीव व्हायची!! आज अगदी सार काही शांत झालं असच वाटायला लागलं आहे !! " 

कित्येक विचार मनात येऊन गेले. संध्याकाळ आता आपल्या सावल्या पसरू लागली. जणू पुन्हा क्षणांची आठवण झाली. क्षितिज आता जायला निघाला. समोर पाहून क्षणभर थांबला. ती दृष्टी होती. काहीतरी शोधत, चाचपटत होती. आजूबाजूला मदतीचा हात मागत होती. तिला पाहताच क्षितिज भानावर आला. पळत तिच्या बाजूने जाऊ लागला. तिच्या समोर उभा राहून तिला बोलू लागला...

"दृष्टी !! दृष्टी !!!" त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
"कोण ?? कोण ???" क्षणभर दृष्टी जागेवरच थांबली. 
"कुठे होतीस तू ?? कुठे निघून गेली होतीस तू ???"
आता तिने क्षितिजचा आवाज ओळखला. हातातली काठी नकळत खाली पडली. दृष्टीने क्षितिजला जोरात मिठी मारली.
"क्षितिज !!! " दृष्टीला पुढे काय बोलावं काहीच सुधरेना. कित्येक वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत तसेच राहिले.

क्षितिज आता स्वतःला सावरत होता. दृष्टीही  क्षितिजला भेटून आनंदी झाली होती. दृष्टिकडे पाहत क्षितिज विचारू लागला.
"कुठे ?? गेली होतीस ?? आणि कोण तुझे आई बाबा ?? " कुठे आहेत ??"
"मला खरंच काही कळलं नाही रे क्षितिज हे !! हे सारं अनपेक्षित होतं मला !! कोण कुठले लोग मला माझे आई बाबा आहेत अस सांगत होते!! काही क्षण मलाही विश्वास बसला. पण रेल्वे स्टेशन वर जेव्हा मी त्याच बोलणं नकळत ऐकलं तेव्हा मला कळलं की !! ते वेश्या व्यवसाय करणारे लोग होते !! त्याचा मला बाहेर परदेशात जाऊन विकण्याचा विचार होता !! कसंबसं मी तेथून पळ काढला.!! ते माझ्या मागावरच होते !! पण नंतर कुठे गेले काहीच माहीत नाही !!!". दृष्टी मनातल्या कित्येक गोष्टी बोलून दाखवत होती.
"मग तू इथे कशी आलीस??" क्षितिज कुतूहलाने विचारतो.
" तू संध्याकाळच केलेलं वर्णन मला आठवत होत !! ती टेकडी !! तो सूर्यास्त!! सार काही आठवत होत !! लोकांना विचारतं होते !! अशी टेकडी कुठे आहे म्हणून !! मग कोणी एका मुलीने मला इथे सोडलं !! "
क्षितिज क्षणभर शांत बसतो आणि पुढच्या क्षणी दृष्टीला जोरात मिठी मारतो.

कित्येक वेळ क्षितिज आणि दृष्टी  एकमेकांना बोलत बसतात. अचानक तेव्हा क्षितिजचा फोन वाजतो. क्षितिज पाहतो तर आश्रमातून फोन होता. 
"हॅलो!!!"
"क्षितिज!! मालती ताई बोलते !!"
"बोलाना मालती ताई!!" क्षितिज स्वतःला सावरत म्हणतो.
"अरे !! दृष्टीला घेऊन जाणारे तिचे आई बाबा हे खोटे निघाले!! ते तिचे आई बाबा नाहीयेत !! त्यांना आत्ताच पोलिसांनी ताब्यात घेतलंय !!"मालती ताई झाली हकीकत सांगू लागल्या.
"कधी ??" क्षितिज अचानक म्हणाला.
"आत्ताच!! अरे तू गेल्यावर मला राहवलंच नाही !! मी तडक पोलिसांकडे आले !!! पोलिसांच्या मदतीने त्या चोरांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली!! तेव्हा ते खोटे निघाले !!"
"तरी मला शंका होतीच !! असे कसे आई बाबा मध्येच आले !!!"क्षितिज.
"होणं !! पण यात काही आश्रमातल्या मुलींचाही सहभाग होता!! हेही कळलं!! " मालती ताई अगदी कष्टी आवाजात बोलल्या.
"काय ?? खरंच !!! " 
"हो !! पण एक आहे रे !! या सगळ्यात अजुन दृष्टी कुठे आहे तेच कळल नाही !! हे चोर म्हणतायत की ती त्यांना चुकवून पळून गेली !!!" 
"मालती. ताई!! दृष्टी माझ्या सोबत आहे !!!" क्षितिज दृष्टीला पाहत म्हणतो.
"काय !! दृष्टी सापडली !!" मालती ताई आनंदाने बोलू लागल्या. त्यांच्या शेजारी उभी भावना ही आनंदाने नाचू लागली.
"हो !! आम्ही येतोय थोड्या वेळात !!" 
"ठीक आहे !!" मालती ताई फोन ठेवतात. शेजारी उभ्या भावनाकडे पहात तिला मिठी मारतात. त्याच्या डोळ्यातून आनंदाने कित्येक अश्रू वाहू लागतात.

दृष्टी आणि क्षितिज काहीच बोलत नाहीत. ती शांतता त्यांना आपल्या मनातलं बोलत होती. अखेर क्षितिज दृष्टीला बोलतो.
"दृष्टी !!"
"बोल ना !! " दृष्टी क्षितिजच्या जवळ येत म्हणते.
"मला यापुढे कधीच सोडून जाणार नाहीस ना तू ??"
"कधीच नाही !!!" दृष्टीला गहिवरून येतं.
"लग्न करशील माझ्याशी ???" क्षितिज तिचा हात हाती घेत म्हणतो.
"आयुष्यभर अशीच माझी दृष्टी बनून राहशील ??"
"हो !! अगदी कायमच !!!" 
एवढं बोलतच दृष्टी क्षितिजला मिठी मारते.
"हो !! करेन मी लग्न तुझ्याशी !!!"

दोघे कित्येक वेळ बसून राहतात. थोड्या वेळाने ते आश्रमात जातात. तिथे सगळे दृष्टीची वाटच पाहत बसलेले असतात. अखेर क्षितिज मालती ताईंना विचारतो.
"मालती ताई !! आज मी दृष्टीला घरी घेऊन जाऊ ??"
मालती ताई फक्त होकारार्थी मान हलवतात आणि क्षितिजकडे कौतुकाने पाहतात.

अखेर क्षितिज आणि दृष्टी घरी येतात. दरवाजा समोर येतात. क्षितिज बेल वाजवतो. थोड्या वेळात समोर आई दार उघडते.क्षितिज आणि दृष्टीला पाहून क्षणभर गोंधळून जाते आणि बोलते ..
"क्षितिज !! बाळा कुठे होतास !!! आणि !!!"
"आई ही दृष्टी !!" क्षितिज आईला मध्येच थांबवत बोलतो.
"मी आल्या आल्या ओळखलं होत!! " आई दृष्टीकडे पाहत म्हणते.
"बाळ दृष्टी !!!" 
"हा आई !!! "दृष्टी गोंधळून जाते आणि लगेच बोलते.
"सॉरी काकू!!"
"नाही आईच म्हण मला !! ये ना बस !!". आई दृष्टीला घरात घेत बोलते.
"क्षितिजने वर्णन केलं त्याहीपेक्षा खूप सुंदर आहेस तू !!" आई दृष्टीला मनातलं बोलत होती.
दृष्टी फक्त गालातल्या गालात हसते. आई पुढे क्षितिजला विचारते.
"कुठे भेट झाली तुमची ???"
 क्षितिज झाली हकीकत सांगतो. आईला सगळं ऐकून नवलच वाटले. अशीही माणसं या जगात आहेत याचा तिला विश्वासचं बसत नव्हता.

अखेर आई आणि दृष्टी कित्येक वेळ बोलत बसतात. क्षितिज फक्त दोघींकडे पाहत राहतो. आईच्या हातात दृष्टीचा हात त्याला खूप काही सांगून जातो, तो फक्त पाहत राहतो .. ..!! 

"विखुरल्या क्षणात, मी तुला शोधणे
अश्रुसवे तेव्हा, नकळत तू भेटणे !!
हात तुझा हाती, सारेच ते सांगणे 
तू आणि मी, बाकी एवढेच उरणे!!

हळूवार ती लाट, मनास स्पर्श करणे !!
भावण्या त्या मनातल्या, उगाच बोलणे!!
न राहवून तुला , पाहत राहणे !!
सांग कसे मी आता , स्वतःस सावरणे!!

तू इथे मी तिथे , नकोच हे बहाणे !!
मिठीत यावे जेव्हा , हरवून ते जाणे !!
सांग देशील का साथ ,एवढेच विचारणे !!
नकोच तो दुरावा , एवढेच मागणे !!"

क्षितिज समोर पाहून अगदी मनातून खूप आनंदी झाला. आयुष्याच्या नव्या वाटेवरती उभा राहिला.

* समाप्त *

✍️©योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...