मुख्य सामग्रीवर वगळा

द्वंद्व || कथा भाग १ || मराठी प्रेम कथा ||




टीप :" द्वंद्व  " ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 

कथा भाग १

प्रिय पायल,

 प्रत्येक क्षणात जेव्हा आपण आपल्या माणसाला शोधायला लागतो ना तेव्हा त्याचं नसण मनाला खूप वेदना देत. आज पुरती दोन वर्ष झाली तुला माझ्यापासून दूर जाऊन पण तरीही तू परत येत नाहीस. तुला कित्येक वेळा पत्र लिहिली मी, पण एकाही पत्राच तू साधं उत्तरही दिलं नाहीस. पण तरीही मी हा पत्र प्रपंच करत राहीन. अगदी शेवट पर्यंत!!  माझ्या विना एक क्षणही न राहू शकणारी तू आज दोन वर्ष माझ्या शिवाय राहते आहेस.तुला माझी एकदाही आठवण आली नाही?? सांग ना ?? एकदा ही नाही !! पण माझे प्रत्येक क्षण तुझी आठवण काढल्या शिवाय राहत नाहीत. कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि तुझ्याकडे यावं, एक दोन वेळा प्रयत्न केलाही मी, पण आईच्या वचनात मी गुंतून गेलो. कारण तू पुन्हा नक्की येणार याचा तिलाही तेवढाच विश्वास आहे. पण आता माझ्या आठवांचा बांध फुटेन की काय असे वाटू लागले आहे.यावेळी नक्की तू पत्राच उत्तर देशील याची मला खात्री आहे. तुझ्या पत्राची वाट पाहतोय. तुझ्या येण्याची वाट पाहतोय. माझ्या चित्रात पुन्हा तुझे रंग भरण्याची वाट पाहातोय.

तुझाच विशाल.

कित्येक वेळ मनातलं कागदावर लिहीत बसलेला विशाल अखेर थांबला. कागदावरती लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचू लागला. वाचता वाचता त्याने मोठ्याने हाक मारली.
"सदा !! ये सदा ! " 
लांबून लगबगीने सदा चालत आला. केस पिकलेले, डाव्या खाद्यावर गमजा,पांढर धोतर घातलेला तो सदा, आपल्या हातातले काम बाजूला ठेवून स्वतःला सावरत आला, बोलू लागला.
"बोला विशाल दादा !! काय काम आहे !!"
" हे पत्र तेवढं पोस्टात टाकं बर !! आणि आजची आज टाकं !!"
क्षणभर सदा स्तब्ध उभा राहिला. काहीच बोलला नाही अखेर त्याच्याकडे पाहून विशाल पुन्हा बोलला,
"काय म्हणतोय मी सदा !! एकातोयस ना ??"
सदा भानावर येत म्हणाला,
"आ !! हो !! हो !! आजची आज पोस्टात टाकतो !! 
"नक्की टाकं !!"

होकारार्थी मान हलवत सदा बाहेर जाऊ लागला. समोर विशालची आई आपल्या कामात गुंग होती. सदा आईच्या जवळ गेला आणि म्हणाला.

"बाईसाहेब !! " 
आई वर न पाहताच बोलली.
"काय झाल सदा ??"
सदाने पत्र पुढे केले.
पत्र पाहताच आईने हातातले काम तसेच ठेवले, पत्राकडे पाहून बोलू लागली.
"आज पुन्हा पत्र लिहिलं विशालने!!"
सदा फक्त पाहत राहिला. आई पुढे बोलू म्हणाली,

"सदा तुला आठवत, विशाल आणि पायल यांचं थाटामाटात लग्न लावून देण्याचा किती हट्ट केला होता मी !!आणि तितक्या थाटात मी ते केलही ! पण तो थाट जास्त दिवस उरलाच नाही रे !! नजर लागावी तशी या गोड नात्याला नजर लागली. जीव तुटतो रे सदा विशालसाठी !! काय करावं काही कळत नाही !!"
"बाईसाहेब तूम्ही नका एवढं वाईट वाटून घेऊन !! हळू हळू विसरून जातील दादा सगळं !! थोडा धीर ठेवा !!" सदा आईला सावरायला सांगू लागला.
"याच तर एका आशेवर जगते आहे रे मी !! आणि त्याच्याशिवाय कोण !!आधार तरी कोण आहे माझा !!"आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणू लागली.
मागून विशाल केव्हा आला कळलच नाही, अचानक सदाला पाहून तो म्हणाला,

"तू गेला नाहीस अजून सदा ?? जा बर पत्र टाकून ये !! उशीर व्हायला नको !!"
"हो दादा !! जातोय मी !! "
सदा निघून गेला. आईच्या पदरा खाली ते पत्र तसेच राहिले.

"विशाल आज काय विशेष पत्राचं ??"
"काही नाही ग आई !! आज पायलला पत्र लिहिलं!! आज तिला माहेरी जाऊन पुरती दोन वर्ष झाली, पण तिचा पुन्हा इकडे यायचा काही निर्णय होत नाहीये !! आणि तिला आणायला जावं म्हटलं तर तू जाऊ देत नाहीयेस !! "
"अरे !! येईल ती मनाने म्हणून मी तुला जाऊ देत नाहीये !! "
"आई अस म्हणता म्हणता दोन वर्ष झाली !!"
"माहितेय रे मला !! पण मला वाटतं तू उगाच हट्ट करू नये तिला !! ती येईल तेव्हा येईन !!"
"तुझ्या शब्दांच्या बाहेर आहे का मी ?? तू म्हणशील तस !!" विशाल आईकडे हसत पाहत म्हणाला.

आईशी बोलून विशाल पुन्हा आपल्या खोलीत गेला. आई विशालकडे पाहून कित्येक विचारात गुंग झाली.

"माणूस इतका प्रेमात का गुंतून जातो की त्याला अस्तित्वाची जाणीव कधीच का होत नाही? जग ते फक्त तेवढंच राहत जेवढं ते स्वतः पाहत राहत. या जगात एकतर तो तरी असतो नाहीतर कोणीच नसतं. विशालच काहीस असच झालं आहे. त्याला अस्तित्वाची जाणीवच का होत नाहीये मला हेच कळत नाहीये. मलाच त्याला या दुनियेत पुन्हा आणावे लागेल का ?? माहित नाही !! पण हे भूतकाळाचे वर्तमान काळाशी असलेले द्वंद्व नक्की कोणाला जिंकू देईल हे तो क्षणच सांगेन !!"

"आई!!" अचानक कोणीतरी हाक मारली.
"कोण ??
"मी !! सायली !!"
"ये ना सायली !! बस !! " आई स्वतःला सावरत म्हणाली.
"विशाल सर ??" सायली प्रश्नार्थक विचारू लागली.
"आहेत मी बोलावते त्यांना !! तू बस ना !"
"हो !! " सायली समोरच्या बाकावर बसत म्हणाली.

आई लगबगीने आत गेली. विशालला सायली आल्याचं सांगितले. विशाल बाहेर येत म्हणाला.

"सायली आज तर आपला वर्ग आहे हे ठरलं नव्हतं ना ?? "
"ठरलं नव्हतं !! पण म्हटलं तुमच्याकडे जाऊन तुम्ही नवीन कोणती चित्र काढत आहात ते पाहत बसाव म्हणजे तेवढीच उजळणी पण होईन !!"
विशाल क्षणभर शांत राहिला. आणि म्हणाला, 
"आज पुरते ठीक आहे पण रोज हे चालणार नाही !! मी दिलेल्या वेळेतच यावं लागेल !! 

ती थोडी स्वतःला सावरणारी. थोडी लाजरी सायली काहीच बोलली नाही.

विशाल तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. सगळीकडे कित्येक त्याने काढलेली चित्रे ठेवली होती. त्यांना पाहतच रहावं अस वाटत होत.

विशाल चित्र काढण्यात गुंग झाला. त्याला चित्र काढताना कित्येक वेळ सायली पाहू लागली आणि मध्येच बोलू लागली.

"सर !! मला काही विचारायचं आहे !! विचारू ??"
विशाल तिच्याकडे पाहत फक्त 'हो विचार!!' एवढंच म्हणाला.
"तुमच्या कित्येक चित्रात स्त्रिचा चेहरा हा एक सारखाच असतो !!! अस का ?? तेच बोलके डोळे, तीच ओढ!!"
विशाल फक्त सायलीकडे पाहत राहिला. काहीच बोलला नाही.

कित्येक वेळ कोणीच बोललं नाही. सायली कंटाळून म्हणाली.

"नुसती चित्र काढण्यात तुम्हाला कंटाळा येत नाही सर??"
"ज्या गोष्टीत आनंद मिळतो !! त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही !!"
सायली काहीच बोलली नाही. कंटाळून अखेर ती म्हणाली.
"सर मी येते !!"

विशाल काहीच म्हणाला नाही. एकदा फक्त त्याने सायलीकडे पाहिले आणि चित्र काढू लागला, सायलीही फक्त त्याच्याकडे क्षणभर पाहत राहिली स्वतःत हरवून गेली.

"न राहवे माझ्यात मी
शोध घ्यावा कुठे तो आता !!
चित्र ते काढावे त्याचे
रंग कोणता भरावा आता !!

आज बोलते माझेच मला
तुझ्यात पहावे कसे मी आता!!
ओठांवरील प्रेमास आता
शब्द कोणते द्यावे मी आता ??

सायली खोलीतून बाहेर केव्हा निघून गेली विशालला कळल ही नाही.

क्रमशः 

✍️योगेश 


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...