मुख्य सामग्रीवर वगळा

शर्यत || कथा भाग २ ||Marathi katha ||




कथा भाग २

आप्पा लगबगीने साहेबांच्या घरी पोहचले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना. साहेबांचं घर म्हणजे जणू एक महालच होता. आप्पा मुख्य दरवाज्यातून आत गेले. समोर साहेब नुकतेच जेवण करून हात धुवायला गेले होते. आप्पांना समोर पाहून ते हातातील ताब्या बाजूला ठेवत म्हणाले.

"काय आप्पा !! कधी नाही ते आज उशीर झाला यायला!!"
आप्पा क्षणभर काहीच बोलले नाही. हातातील हिशोबच वही समोर करत म्हणाले.
"आज थोडा वेळच झाला दुकान बंद करायला !! "
"बरं बरं !!" साहेब आप्पांच्या हातातील हिशोबाची वही घेत म्हणाले. 

दोघांमध्ये कित्येक वेळ दुकानाच्या हिशोबा विषयी चर्चा झाली आणि मध्येच साहेबांनी आप्पांना विचारलं.

"आप्पा !! दुपारी डबा कोणाच्या हातून पाठवला होता ??"
"तुम्हाला डबा मिळाला ??"
"हो तर !! अगदी वेळेत दिला आणून !!"
"नवीनच होता माणूस !! सखा नाव आहे त्याच !!" 
"सखा !! बरं बरं !! पुन्हा बोलावून घ्या त्याला !!"
" हो जी !! उद्या येतो म्हणाला !! अजून पाच रुपये द्यायचे राहिलेत त्याचे !!"
"द्यायचे राहिलेत ?? का बरं ??" 
" साहेब दहा मिनीटात तो तुम्हाला डबा द्यायला पोहचला !! आणि तेवढ्याच वेळात पुन्हा आला !! मला विश्वासाचं बसत नव्हता !! मला वाटलं त्यानं डबा मध्येच खाऊन टाकला !! म्हणून त्याला पाच रुपये कमी दिले !!"
"नाही आप्पा !! माणूस कामाचा आहे !! गावची जत्रा जवळ आली माहितेय ना ??"
"जी साहेब !! पण आपण तर दरवेळी शिरपाला !!"
"हो माहितेय !! पण यावेळी माणूस बदलायचा !! यावर्षी काहीही झालं तरी शर्यत जिंकायची ! "
"हो !! " आप्पा साहेबांकडे पहात म्हणाले. 
"त्याला आता फक्त कामावर ठेवून घ्या !! बाकी सगळं मी सांगेन त्याला भेटल्यावर !!"
"जी साहेब !!"

आप्पा एवढं बोलून आपल्या घरी निघून गेले. त्याच्या डोक्यात तेच होत. दोन दिवस पोटात अन्नाचा एक कणही नसताना हा सखा एवढा धावला कसा ?  कोणती ताकद होती ती, की जी त्याला हे सगळं करायला भाग पाडत होती. खरंच माझं चुकलंच ते , त्याच्यावर असा अविश्वास दाखवायला नव्हता पाहिजे मी !! माझं खरंच चुकलं !! उद्या तो येईल तेव्हा त्याची पहिलं माफी मागेन मी !! हातात एवढा जेवणाचा डबा असतानाही, ते अन्न घेऊन तो इमानाने धावला, फक्त मला दिलेल्या शब्दासाठी !! आणि मी क्षणात त्याच्यावर अविश्वास ठेवून त्याला घालवून दिलं. पण माझं दुसरं मन मला म्हणाल होत सखा तसा नाहीरे आप्पा ! पण काय करू या व्यवहारी जगात राहून मला त्याचं कधी ऐकूच आल नाही. "

 आप्पा विचारांच्या तंद्रीत घरी येऊन कधी झोपी गेले त्यांनाही कळलं नाही. सकाळच्या त्या सूर्यकिरणांनी डोळ्यांना त्रास दिला तेव्हा त्यांना जाग आली. लगबग सुरु झाली. सर्व आवरून पुन्हा दुकानात ते निघाले. कालच्या त्या विचारात त्यांना आपल्यातला दुसरा चेहरा दिसला याच नवल वाटत होत. दुकानात काम करता करता वेळ धावु लागला. दुपारची वेळ झाली. त्याची नजर सखा कधी येतोय त्याकडेच लागली होती.

"राम राम आप्पा !!"
आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता. 
"सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!"
"म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!"
"हो रे !! बसला विश्वास !!"
"मग द्या माझे उरलेले पाच रुपये !!" 
" अरे !! पाच रुपयाचं काय घेऊन बसलास !! मी तुला कामावरच ठेवून घेतो की !! "
" मला ??" सखा अगदी आनंदात म्हणाला.
"हो तुला !! महिना पाचशे रुपये पगार पण देतो !! "
"काय मस्करी करता काय गरीबाची !!" सखा आप्पाला हसत म्हणाला.
"मस्करी नाही आणि काही नाही !! बोल आहे मंजूर ??"
"पण काम ??"
"काही नाही काल जे केलस तेच रोज करायचं !! थोडफार दुसरही काम पडलं तर करायचं !!!"
"रोज साहेबांना डबा द्यायचा ??" 
"हो!"
"ठीक आहे आप्पा !! मला चाललं !! " 
"मग घे हा डबा आणि लाग कामाला !!" 

सखा आनंदाने धावत सुटला, त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजल होत. 
"कधी एकदा इथून घरी जातोय अस झालंय मला !! लवकरात  लवकर डबा पोहोचवतो आणि घरी जातो !! शांताला ही बातमी ऐकून भारी आनंद होईल !! तिच्या डोळ्यात मला तो आनंद पाहायचा आहे. धाव सखा !! अजून जोरात धाव !! पाचशे रुपये देणार आहेत तुला ते !! कामात ढिलाई करून कसं चाललं !! अरे पाच रुपयांसाठी केली नाही !! हे तर पाचशे आहेत !! धाव ! अरे पण भूक ??" सखा कित्येक मनातील प्रश्नात गुंतला त्याच्या धावण्याचा वेग अजून वाढला. 
"या पैश्याच्या समोर कसली भूक !! "

सखा धावत धावत दुकाना समोर आला. समोर कालचाच तो नोकर उभा होता. त्याला पाहून सखा हसला आणि म्हणाला.
"डबा पाठवलाय आप्पांनी !!"
"तू सखा ना ??"
"होय सखा !!"
"जा मग आत !! साहेब तुझी वाट पाहत बसलेत !!
"साहेब अन् माझी वाट ??? का बरं ?? माझं काय चुकलं का ??"
"ते मला काही माहीत नाही !! पण त्यांनी मला सांगितलं तू आलास की आत पाठवून दे म्हणून !!"
"बरं बरं !! 

सखा डबा घेऊन दुकानाच्या आत गेला. समोर साहेब बसलेले पाहून त्यांना नमस्कार करत म्हणाला, 
"मी सखा !!"
"बरं बरं !! मी नारायण मामा !! या दुकानाचा मालक !!"
"साहेब !! " सखा थोड झुकत म्हणाला.
"असू दे !! असू दे !! मला काल आप्पांनी सांगितलं की तू सुतारावाडीवरून इकडं सावंतवाडीला फक्त दहा मिनीटात आला म्हणून !"
"होय साहेब !!"
"आणि आप्पांनी एवढं सांगितल्यावर मला वाटलं कोणी तरणा बांड मुलगा असेल म्हणून !! पण तू तर केस पिकलेला म्हातार निघालास !! "
"काय करू साहेब !! पोटात भुकेन कावळे ओरडत होते!! हाताला काहीच काम नव्हतं !! म्हणून आप्पांना म्हटलं करतो हे काम !!"
"व्हा !! छान !! पण मग एकटाच आहेस की ??"
"बायको आहे माझ्यासोबत !! तीन पोर पण आहेत पण त्यांना आता आम्ही जड झालो म्हणून सगळे गेली निघून शहराकड !!"
"अरेरे !! म्हातारपणी आधार गेला !! पण अंगातली ताकद तुला साथ देते आहे हेच नशीब !!"
"होय साहेब !!"
"बाकी आप्पांनी तुला सांगितलं असेलच सगळं !! रोज या वेळेत डबा द्यायला यायचं !! ठीक आहे ??" 
सखा फक्त मान हलवून हो म्हणाला.
"बाकी काही लागलं तर सांग नक्की !! ये आता !!" साहेब दिलेला डबा उघडत म्हणाले.

सखा साहेबांना हात जोडून नमस्कार करत तेथून निघाला. पुन्हा धावत ! अगदी जोरात धावत निघाला !!

क्रमशः 

✍️योगेश खजानदार


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...