मुख्य सामग्रीवर वगळा

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||




 कथा भाग ३

सखा धावत धावत पुन्हा सुतारवाडीला आला. दुकानात आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याला जोरजोरात कोणीतरी बोलण्याचा आवाज आला. आप्पांना कोणीतरी भांडत होत हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तो दरवाजातून आत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात कोणीतरी रागात बाहेर येताना त्याला दिसलं. मागे आप्पाही येत होते.आप्पा दरवाजासमोर येत म्हणाले.

"शिरपा एवढा माज चांगला नाही !!"
"तर तर !! एका मिनीटात मला कामावरून काढलं !! आन आता माज माझाच दिसायला होय !!" शिरपा जोरात म्हणाला.

एव्हाना सख्याच्या लक्षात आल होत काय प्रकार आहे तो. तेवढ्यात आप्पांच लक्ष सखाकडे जात. त्याला बघून ते म्हणाले.
"आलास का डबा देऊन ??"
"होय !!" सखा हळू आवाजात म्हणाला.
"जा !! आत दुसऱ्या कामात मदत करू लाग !! " आप्पा दरवाज्याकडे हात करत म्हणाले.
तेवढ्यात शिरपा मोठ्याने म्हणाला.
"हे म्हातारं आहे काय साहेबांना डबा द्यायला जाणार !!"
"शिरपा !! तोंड सांभाळून बोल !! आन तुला कामावरून काढल कोण म्हणतंय !! फक्तं हे काम नाही !! दुसरं करायचं !!" 
"पण गेली कित्येक वर्ष मीच हे काम करत आलोय !! त्याच काही नाही का ??"
"आहे बाबा !! म्हणून तर साहेबांनी तुला काढून नाही टाकलं !! सावंतवाडीच्या दुकानावर काम दिलंय !!"
"तर तर !! उपकारच केलेत माझ्यावर !!" एवढं बोलून शिरपा तरातरा चालत निघून गेला.

आप्पा आणि सखा एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणभर काहीच बोलले नाही. दरवाजातून आत जात आप्पा म्हणाले.
"या शिरपाच काही मनावर घेऊ नको सखा !!जरा गरम डोक्याचा आहे !! साहेबांनी सांगितलं की गप्प बसेल !!"
"पण एवढं रागवायच काय त्यात !! तस असलं तर देऊ द्या त्याला डबा, माझं काय मी म्हणलं ते दुसरं काम करतो !!"
"नाही सखा !! साहेबांनी सांगितलं म्हणजे सांगितलं !! यात बदल व्हायचा नाही आता !!"
सखा काहीच बोलला नाही. दिवसभर कामात राहिला. पण त्याला शिरपाच रागावणं अजूनही मनाला खटकत होत. 

दिवसभर काम करून सखा थकून गेला. सुर्य मावळतीला आला आणि अखेर घराकड निघाला. आप्पांनी जाताना हातात थोडी मिठाई दिली होती. ती पिशवीत ठेवून तो भराभर चालू लागला. पण अचानक मागून कोणीतरी डोक्यात काहीतरी मारलं हे सखला कळायचा आत त्याच्या डोळ्याला अंधारी आली. पुसट अस कोणीतरी ओळखीचं आहे हे त्याला कळाल. थोड शुद्धीत येताच समोर शिरपा आहे हे त्याला कळलं.

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!"
सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो.
"साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!"
सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. 
"पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! "
"आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!"
"पण साहेब ?? आप्पा !!"
"त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो !! पण तू पुन्हा तिथं नाही दिसला पाहिजे !!"

सखा काहीच बोलत नाही.डोक्यातून ओघळणाऱ्या रक्ताला हातातल्या कापडान झाकत तो घरी निघाला. पायात ताकद राहिली नव्हती. कसाबसा तो घरी पोहचला. समोर शांता त्याची वाट पाहतच बसलेली होती. त्याला अशा अवस्थेत पाहून ती धावतच त्याच्याकडे आली.
"काय झालं !! हे रक्त ?? काय झालं काय !! आहो सांगा की !!" शांता अगदीक होत म्हणाली.
"सांगतो सांगतो !! "
सख्याने तिला घडलेलं सगळं सांगितलं. पुढं काय करावं हेही विचारलं.

"पण त्याला काय एवढं झालंय !! हे नाहीतर ते काम दिलंच ना साहेबांनी ??"
"दिल पण त्याला हेच काम पाहिजे !! काय एवढं आहे यात मलाच कळणा झालंय !!" सखा माठातील पाणी घेत म्हणाला.
"मग तुम्ही काय ठरवलंय आता ??" शांता हळद घेऊन येत म्हणाली.
सखा जमिनीवर बसला. जखम हलकेच शांताकडे करत म्हणाला.
"मलातर काही सुचत नाहीये बघ !! एक मन म्हणतंय जावं !! तर दुसरं म्हणतंय कशाला त्या भानगडी !!"
"एवढ्या कष्टानं मिळालेलं काम असच सोडून देणार तुम्ही ??" जखमेवर हळद लावत शांता म्हणाली.
क्षणभर सखा शांत राहिला झालेली जखम खूप वेदना देत होती. पण स्वतःला सावरत तो म्हणाला.
"उद्या बघू काय करायचं ते !! " सखा शांता जवळुन उठत म्हणाला.

झालेल्या जखमेत सखा रात्र भर व्हिव्हळत राहिला. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. 

"कशासाठी एवढा अट्टाहास आहे शिरपाचा काहीच कळत नाहीये ! साहेब पैसे तर त्याला तेवढंच देणार आहेत मग ह्याच कामात काय आहे एवढं !! धाव धाव धावून माझे या वयात पाय फाटले सगळे. मलातरी हौस आहे का याची , पण करावं लागत पोटासाठी. पण शिरपाची ही तळमळ पोटासाठी नाही हे कळायला मी मूर्ख नाही !! काय आहे त्या साहेबांना डबा देण्यात एवढं ?? "

सखा रात्रभर विचारात राहिला. डोक्यावरच्या जखमने व्हिव्हळत होता.

क्रमशः

✍️योगेश खजानदार


टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...