मुख्य सामग्रीवर वगळा

शर्यत || कथा भाग ६ || Sharyat Katha Bhag 6 ||




कथा भाग ६

 रात्रभर शांता मध्ये मध्ये झोपेतून उठत होती. तिला मध्येच खोकला येत होता . सखाला तिच्या आजाराबद्दल काळजी वाटू लागली होती. पण तरीही तो तिला धीर देत होता. रात्र सखाच्या काळजी करण्यातच गेली.
सकाळी आवरून सखा कामावर जायला निघाला. त्याला कामावर जावं की नको अस वाटू लागलं. शांताकडे पाहून तो म्हणाला.
"शांता !! वैद्यबुवा म्हणाले होते !! तुझी तब्येत काळजी नाही घेतली तर अजून बिघडेलं म्हणून !! मी आज नाही जात कामावर !! " 
शांता सखाकडे पाहत म्हणाली.
"मला माहितेय तुमचा जीव माझ्यात अडकलाय !! पण तुम्हाला कामावरही जायचंय !! तुम्ही नका काळजी करू माझी !! मी बरी आहे !!!" शांता आलेली उबळ दाबत म्हणाली.
"माझं मन मला तुझ्याकडे खेचत आहे शांता !! कसा जाऊ मी कामावर !! " 
"जावं तर लागणार !! नाहीतर हे असच चालू राहणार !!" शांता सखाला समजावत सांगत होती.

सखा जड पावलांनी कामावर जायला निघाला. त्याच एक मन शर्यतीबद्दल विचार करत होत आणि एक मन शांताबद्दल विचार करत होत. या विचारांच्या द्वंद्वात त्याला काहीच सुचत नव्हतं. तसाच तो रखडत रखडत आप्पासमोर जाऊन उभा राहिला. सखाला पाहून आप्पा खुश झाले आणि म्हणाले
"व्हा !! व्हा !!सखा आलास तू !! बरं झाल रे !! सकाळपासून तुझी वाट पाहत होतो मी !! 
सखा काहीच बोलला नाही . पुन्हा कामावर आल्याबद्दल त्याला आनंद झाला होता. पण शांताकडे पाहून त्याचा धीर खचला होता. 
"सखा !! आज साहेबांनी तुला तिकडं बोलावलंय बरं !! सावंतवाडीला !! म्हणाले, सखा आला की ताबडतोब त्याला माझ्याकडं पाठवून दे !! "
"बरं आप्पा !! मग जाऊ का मी तिकडं !! " 
"हो जा !! " 
सखा जायला निघाला . पण तेवढ्यात आप्पांनी त्याला हाक मारून बोलावून घेतल.
"काय झालं आप्पा ?? " 
हातातला डबा देत आप्पा म्हणाले. 
"डबा कोण घेऊन जाणार ??"
"विसरलोच जरा !! द्या !! "

सखा डबा घेऊन निघाला. सख्याच काहीतरी बिनसलंय हे आप्पांच्या लक्षात आल. पण ते काहीच म्हणाले नाही. सखा धावत धावत सावंतवाडीला निघाला. मनात एकच विचार शांता बरी झाली पाहिजे !! 
"जिच्यासाठी मी एवढा अट्टाहास करतोय तीच आज अंथरुणाला खिळून बसलीय !! याच मला राहून राहून वाईट वाटतंय !! कित्येक दिवस आम्ही दोघांनी भिकारी म्हणून दिवस काढले.. आता कुठे चांगले दिवस येतायत, तर मागे शांताच आजारपण लागावं. पुन्हा त्या वैद्याकडे जावं तर पैसा लागणार. तो आणावा कुठून हेच मला कळत नाही. शांता बरी व्हावी एवढच मला वाटत . बाकी काही नको !! " सखा धावत धावत सावंतवाडीला पोहचला. समोर दुकान येतच आतमध्ये गेला. साहेब आपल्या कामात गुंग होते. त्यांनी एकदा सखाकडे पाहून त्याला थांबायचा इशारा केला. सखा दरवाजातच थांबला. साहेब कित्येक वेळ काम करत राहिले आणि नंतर समोरची वही बंद करत उठले.

"काय सखा !! आता बरा आहेस ना रे ?? कसं वाटत आता कामावर येऊन ??"
"जी चागलं वाटतंय !!" सखा तुटक बोलला.
"छान छान !! घे डबा इकडे !!" साहेब हात पुढे करत म्हणाले.
सखा साहेबांना डबा देतो डबा उघडताच त्यातून खमंग भाज्यांचा वास सर्वत्र दरवळतो. सखाकडे पाहत साहेब म्हणाले.

"काय सखा !! आज यायला उशीर तो केलास !! आणि डबा ही थोडा सांडलेला वाटतोय ??" 
"चुकी झाली साहेब !! येताना चुकून झालं असलं!! "
"बरं बरं !!" साहेब सखाच्या चेहर्याकडे पाहत म्हणाले आणि लगेच पुढे बोलू लागले,
"काही झालंय का सखा ?? का पुन्हा शिरपान त्रास दिला ??"
"नाही नाही साहेब !! शिरपा नाही !! माझी बायको शांता !! ती आजारी आहे कालपासून !! काल तुमच्या इथून गेलो, तर घरात बेशुद्ध होऊन पडली होती!! रात्री थोडी बरी झाली, तर सकाळी पुन्हा तब्येत खराब झाली."
"अरे मग पहिले नाहीका सांगायचं !! बरं जाताना आप्पाकडून पन्नास रुपये घेऊन जा !! चांगल्या वैद्याला दाखव तिला !! "
"उपकार झाले साहेब !! " सखा हात जोडत म्हणाला. 
"सखा ते तर तुला एक मदत म्हणून रे !! पण लक्षात ठेव सखा !! शर्यत आता फक्त तीन दिवसांवर आली आहे ! जत्रेला उद्यापासून सुरुवात होईल !! शर्यत परवा असेल !! तुला त्यात जिंकायचं आहे !! आपल्या गावाचा मान वाढवायचा आहे तुला लक्षात ठेव!! " साहेब जोरात बोलले.
सखा फक्त बघत राहिला.
"तुझ्या बायकोची तब्येत लवकर बरी होईल काळजी करू नकोस !! जा आता !!"

सखा पुन्हा धावत पळत सूतारवाडीला आला. साहेबांनी त्याला पन्नास रुपये देऊ केले याच त्याला राहून राहून नवल वाटत होत. त्याच्या मनात साहेबांविषयी आदर वाढला होता. सुतारवाडीला येताच त्याने आप्पांना सगळं काही सांगितलं.

"सखा सकाळी आलास तेव्हा एका शब्दान मला काही बोलला नाहीस !! सांगायचं तरी ना मला !!
"आप्पा काय करावं काही कळतं नव्हतं !! पण साहेबांनी खूप विचारलं तेव्हा सांगावं लागलं. " सखा शांत बोलत होता.
"बरं आता एक काम कर !! इथून पलिकडच्या गावात एक वैद्य आहेत त्यांना तू दाखव ते काय म्हणतात ते बघ !! खूप प्रसिध्द आहेत !! "
"बरं !!"

 आप्पांनी सखाला पन्नास रुपये दिले. तसा सखा धावतच घरी निघाला. त्याला कधी एकदा घराकडे जाईल असे झालं होत. धावत धावत तो घरी आला. शांता शांत झोपली होती. सखाच्या येण्याच्या आवाजाने ती जागी झाली. तिच्याजवळ जात सखा म्हणाला.
"आता बरं वाटता??" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
"मी बरी आहे हो !! " शांता दबक्या आवाजात म्हणाली.
सखा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.
"ताप आहे शांता तुला!!  आजार पण वाढतोय !! चल पटकन आपण वैद्यांकडे जाऊयात !! " 
"आहों पण पैसे ??"
"साहेबांनी पन्नास रुपये दिलेत !! " 
"आहों पण कशाला !! मी होईन बरी !! "
"हट्ट करू नकोस !! चल !!"

सखा शांताला घेऊन निघाला. जवळच्या ओळखीच्या एकाची बैलगाडी घेऊन शांताला घेऊन तो निघाला. रात्रभर बैलगाडी त्या गावाकडे जात होती. हळूहळू रस्ता मागे टाकत होती. पहाटे पहाटे सखा त्या गावी पोहचला. समोर त्या वैद्याचे घर दिसताच. त्याने बैलगाडीतून उतरून त्यांना हाक दिली. अर्धवट झोपेतून उठून वैद्यबुवा आले. त्यांनी लगेच परिस्थिती ओळखली. शांताला आत घेऊन या अशी खून त्यांनी केली.
बैलगाडी सोबत आलेला त्याने आणि सखाने शांताला हळूच उचलून घरात आणलं. क्षणभर सगळे शांत होते. तापेन शांतेच अंग फणफणत होत. तिचा श्वास दीर्घ झाला होता.

"हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! "
"काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." 
"बरं बरं !!" वैद्यबुवा सगळं ऐकून एक मात्रा शांताच्या ओठांवर ठेवत म्हणाले.
"हे बघा !! वयामूळ शरीर साथ देत नाहीये !! पण एक औषध देतो !! ते दर एक तासाला दुधात टाकून त्यांना देत राहा !!" बुवा औषधाची डबी सखाकडे देत म्हणाले.
"बरी होईल ना ती ??" सखा अगदिक होत म्हणाला.
"हे बघा !! प्रयत्न करणं आपलं काम आहे !! बाकी त्या देवाच्या मनात काय असेल ते !! पण ही मात्रा चुकवू नका !! या आता !!"

सखा शांताला घेऊन पुन्हा सूतारवाडीला आला. त्याला शांताची ही अवस्था आता बघवत नव्हती. दुपारपर्यंत ते घरी आले. शांता झोपेतून कशीबशी जागी झाली. तिला दर एक तासाला औषध सखा देऊ लागला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा नव्हता. पण पुन्हा कामावर जायची वेळ आली होती. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. त्याची ही घालमेल शांताने ओळखली आणि ती म्हणाली
" तुम्ही जरावेळ झोप घ्या!! आणि मग जा कामावर. मला आता ठणठणीत बरं वाटतंय !! " शांता अंथरुणावरून थोड वर उठत म्हणाली.
"माझा पाय निघत नाहीये !! " सखा तिच्याकडे पाहून म्हणाला.
"जावं तर लागेल ना ! साहेबांचा किती विश्वास आहे पाहिलं ना !! एका क्षणात त्यांनी पन्नासची नोट काढून दिली !! ती दिली नसती तर आज माझा इलाज करता आला असता का ?? "
"होना !! त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत !! थोडा वेळ पडतो !! आणि जातो !! डबा देतो आणि त्यांना सांगून घरी येतो लगेच !! "
शांता काहीच बोलत नाही. होकारार्थी मान हलवते. 

सखा जरा वेळ झोप घेतो. उन्ह डोक्यावर आल्यावर तो पुन्हा कामाला लागतो. दुकानावर त्याला पाहताच आप्पा विचारतात
"काय सखा जाऊन आलास का वैद्यानकडे ??"
"हो आप्पा !! जाऊन आलो !! औषधं दिलंय त्यांनी !! आता बरं वाटतंय तिला !!"
"पण सखा आता तुला काळजी घ्यायला हवी तिची आणि शर्यतीची सुद्धा !! सखा शर्यत दोन दिवसांवर आली आहे !! तुला त्याबद्दल सांगायचं आहे !! साहेब म्हणाले आता सखाला दुसरं कोणतं काम नाही !! फक्त शर्यत !!"
"साहेब म्हणतील तस आप्पा !! बोला मला काय करावं लागेल!!" 
"आधी शर्यत काय आहे ते ऐक !! आपल्या महादेवाच्या मंदिरापासून ते सावंतवाडीच्या महादेवाच्या मंदिरापर्यंत ही शर्यत असेल!! या शर्यतीचा नियम फक्त एकच !! जो जिंकला त्याची सत्ता !! त्यामुळं कोणी शर्यतीत तुझ्यावर वार करेल !! तुझा जीव घेण्याचाही प्रयत्न होईल !! पण त्याला प्रतिकार करत तुला तिथं पोहोचाव लागेल. जर कोणी जास्तच अंगावर आला तर जीव घ्यायलाही मागेपुढे बघू नकोस !!"
"जीव घ्यायचा !??" सखा डोळे विस्फारून बघू लागला.
"होय सखा !! जीव घ्यायलाही !!"
"आणि लोक अस करतात ??"
"होय !! कित्येक लोकांचा जीव गेलाय यात !! पण तरीही ही शर्यत जिंकली पाहिजे म्हणून नवीन लोक उतरतं राहतात पटांगणात !! शेवटी राजाच्या दरबारात मान कोणाला नको वाटेल!! "
"मला जमलं ??"
"का नाही जमणार ?? तुला फक्त पळायचं आहे !! तू नकोस कोणाच्या अंगावर जाऊ !!" आप्पा सखाच्या जवळ जात म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला. त्याला काय बोलावं तेच कळेना. 
"आजपासून तुला एवढच काम आहे सखा !! उद्या ठीक सकाळी दहा वाजता महादेवाच्या मंदिरात भेट शर्यतीची पूर्वतयारी करायची आहे आपल्याला !!"

सखा सगळं ऐकू. घरी जायला निघाला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. शर्यत ती जीवघेणी असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. मग नको म्हणावं का शर्यतीला असाही त्याचा मनात विचार आला. पण मग आपण साहेबांशी नमक हरामी केल्यासारखं होईल. त्यांनी एका क्षणात पन्नास रुपये दिले त्याची तरी जान ठेवावी लागेल. आणि नाही म्हणालो तर ते परत करावे तरी कसे मग !! अशाशा कित्येक विचारांनी सखा वेडावून गेला. 

सांजवेळी सखा पुन्हा घरी आला.

क्रमशः 

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...