मुख्य सामग्रीवर वगळा

शर्यत || कथा भाग ७ || गावाकडच्या गोष्टी || Sharyat Katha ||



कथा भाग ७

सखा दरवाजात येताच त्याला शांताच्या खोकण्याचा आवाज आला. तो लगेच आता पळत गेला. शांता सारखं खोकत होती, तो पटकन तिला पाण्याचा तांब्या देत म्हणाला,
"कशाला काम करत बसतेस !! अधिच तुला बरं वाटतं नाहीये !! त्यातून ही झाडलोट कशाला !! "
"आहों मग कोण करणार ही काम !! "
"मी करणार !! "
"तुम्ही ??" शांता थोड हसत म्हणाली.
"हो मी !!" तिच्या हातातील झाडू घेत सखा म्हणाला.
झाडू एका कोपऱ्यात ठेवून ,सखा आवरू लागला. मध्येच तो शांताला बोलू लागला.
"शांता आता शर्यत जवळ आली !! उद्या आप्पांनी मला महादेवाच्या मंदिराजवळ बोलावलं आहे !! शर्यत काय आहे ते समजावून सांगणार आहे मला !! "
"होका !! आणि साहेब काय म्हणाले ??"
"काही नाही !! शर्यतीवर लक्ष दे म्हणाले !!"
"एकदाका शर्यत जिंकली की मोठ्या गावाला जाऊन तुझा इलाज करू आपण !! "
"मला काही एवढं झालेलं नाही !! तुम्ही काळजी नका करू !! मी होईल बरी !!" शांता सखाला धीर देत म्हणाली. 
"ताप आहे अजून !!" सखा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.
शांता काहीच बोलत नाही.

रात्रभर सखाला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात शांता आणि शर्यत यांच्या विचारांची जणू चढाओढ लागली होती. एक मन त्याला सांगत होत सखा सगळं ठीक होईल आणि दुसरं मन त्याला सांगत होत सखा तू म्हणतोस तस झालं नाही तर ?? काय करायचं!! त्या विचारांनी त्याला पुरत वेढून घेतल होत. मध्ये मध्ये शांता खोकत होती त्या आवाजाने पुन्हा तो भानावर येत होता. अशात सारी रात्र निघून गेली. 

सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले.
"व्हा सखा ! बरं झालं लवकर आलास !! आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये !! " आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले ,
"तयार आहात ना रे सगळे !! " 
सगळे एका सुरात म्हणाले.
"हो !!" 
सखा फक्त पाहत राहिला.
"तर सखा तुझ्या हातात गावाच्या वेशीवर असलेला एक झेंडा असेल !! शर्यतीच्या दिवशी इथ पन्नास गावांच स्पर्धक येतील !!तेव्हा आजच तुला सांगणं गरजेच आहे !! " आप्पा सखाकडे पाहत बोलत होते.
"तर या मंदिराच्या खालच्या मैदानावरून शर्यतीला सुरुवात होईल! अगदी सुरुवातीलाच आपल्याला पाडण्याचा , जखमी करण्याचा प्रयत्न होईल !! त्यासाठी घोळक्यातून जेवढं लांबून पळता येईल तेवढं पळायचं !! मध्येच कोणी शिव्या देईल !! एखादा प्रतिस्पर्धी तुला भुलवण्याचा प्रयत्न करेल !! पण आपण फक्त समोर बघत पळत राहायचं !!"
"आप्पा हे सगळं टाळता नाही येत !! मारणं, पाडणं?? त्या देवाच्या जत्रेत हे असं ??"
"सखा !! अरे खुद्द देवाने सुद्धा अशा क्रूर प्रवृत्तींचा सामना केला आहे !! मग आपण तर माणूस आहोत ! आणि तू प्रतिकार केला नाहीस तर सुरू होण्याआधीच संपून जाशील !!! खरतर हे शर्यतीत नाहीच !! पण प्रतिष्ठा पणाला लागली की डावपेच हे होणारच !! पण आपण तरीही चांगल्या मार्गाने जिंकण्याचा प्रयत्न करायचा !!" आप्पा पुढे चालत जाऊ लागले.
आप्पा खालच्या मैदानावर आले. समोर उभा राहून म्हणाले.
"सखा इथून सावंतवाडीच्या मंदिरात जायला तुला कमीत कमी वेळ कसा लागेल याचा प्रयत्न कर !! चल !!"

सखा पुढे चालत आला. त्या मैदानावर आप्पांनी आपल्या पायांनी एक रेष ओढली होती. सखा त्यांच्या इशार्याची वाट पाहू लागला. आप्पांनी धावण्याचा ईशारा देताच सखा जोरात धावू लागला. चार पावले पुढे जातो न जातो तोच त्याच्या पायावर जोरात फटका बसला. सखा जमिनीवर जोरात पडला. आप्पा धावत त्याच्या जवळ आले.
"उठवारे !! " बाजूच्या लोकांना आप्पा म्हणाले.
सखा हळू हळू उठला. शेजारच्या एका माणसाने त्याच्या पायावर जोरात चाबूक मारला होता. पायावर लाल जखम दिसू लागली होती.
"सखा मी काय म्हणालो होतो!! या अशा लोकांपासून , अशा डावपेचात तुला पुढं जायचयं ! तू प्रतिकार करायचं नाही असं नाही !! "

सखा पुन्हा त्या रेषेजवळ आला. पुन्हा धावू लागला.चाबूक फिरवणारा पाहताच त्याला हुलकावणी देऊन सखा पुढे धावत सुटला. अगदी जोरात , वाऱ्याच्या वेगाने , त्याला समोर फक्त आता सावंतवाडी मंदिर दिसत होत. सखा धावत होता अगदी जोरात , अचानक मध्येच कोणीतरी अडथळा बनून येत होत. सखा त्याला चुकवून मध्येच ते अंगावर घेऊन धावत होता. पाहता पाहता त्याने सावंवाडीतील महादेवाचं मंदिर गाठलं. पुन्हा तिथे क्षणभर थांबून तो सुतारवाडीच्या मंदिरात आला. आप्पा तिथे त्याची वाट पाहत होते. त्याच्या सोबत धावत गेलेल्या एका पोराला त्यांनी विचारलं
"किती वेळ लागला रे ??"
"मागच्या शर्यतीत धोंडा पाटीलला लागला होता त्यापेक्षा जरा जास्तच लागला !!" 
"म्हणजे माझ्यापेक्षाही कोणीतरी जोरात धावत ??" सखा आश्चर्यचकित होत म्हणाला.
"सखा शर्यत एवढी सोपी नाही बरं !! तुझ्यापेक्षा जोरात आणि तरणे स्पर्धक असतील स्पर्धेला !! त्यांना हरवण सोप्पी गोष्ट नाही !!" आप्पा सखाकडे पाहत म्हणाले.

दिवसभर आज त्यांची शर्यतीचीच पूर्वतयारी चालू होती. शेवटी सुर्य मावळतीला आला आणि आप्पा म्हणाले.
"सखा आता घरी जा !! मी तुला काय सांगितलं ते सगळं काही लक्षात ठेव!! लक्षात ठेव एक चूक खूप महागात पडू शकते आणि आता आपण शर्यतीच्याच दिवशी भेटू, तोपर्यंत आराम कर , आणि शर्यतीच्या दिवशी तयार राहा !! " आप्पा सखाला एवढं बोलून निघाले.
सखा काहीच बोलला नाही. तो फक्त पाहत राहिला.

सगळं काही लक्षात ठेवून तो घरी आला. झालं ते त्याने शांताला सांगितलं, पण पायावर झालेली जखम त्याने सांगितली नाही. शांताने ती पाहिली आणि तिने लगेच विचारल,
"पायाला काय लागलंय एवढं ??"
सखा अडखळत बोलू लागला, त्याला शांताला शर्यत किती जीवघेणी आहे हे सांगायचं नव्हतं. तिला त्या अवस्थेत अजून त्रास द्यायाचा नव्हता.
"काही नाही !! धावता धावता पडलो बाकी काही नाही !! "
शांता पुढे काहीच बोलली नाही.
"आता फक्त थोडा वेळ राहिलाय शांता !! एकदाका ही शर्यत मी जिंकली !! की आपण दोघे मस्त मजेत राहुत !! "
शांता सखाकडे पाहून म्हणाली.
"हो !! तुम्ही शर्यत जिंकणार याची मला खात्री आहेच ! या वयात घेतलेली ही कष्ट तो परमेश्वरी ही वाया जाऊ देणार नाही !! त्या महादेवाला माहितेय सगळं !! तो नक्की तुम्हाला यशस्वी करेन !"
डोळ्यात आलेला एक टिपूस पुसत शांता सखाकडे पाहत राहिली.

सखाला आता शर्यतीच्या दिवसाची ओढ लागली होती. थोड्याच क्षणात त्याला सर्वांची मन जिंकायची संधी मिळणार होती. तो आता शर्यतीत स्वतःला हरवून गेला होता.

क्रमशः

✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...