मुख्य सामग्रीवर वगळा

lockdown आणि खुप सारा वेळ || MARATHI ARTICLE || BLOG ||

 सध्या जगामध्ये आलेल्या महामारीमुळे सर्वानाच घरी बसण्याची वेळ आलेली आहे. आणि तो नाईलाज झाला आहे. पण या परिस्थितीमुळे एक मात्र गोष्ट मागच्या वर्ष दीड वर्षात खूप मिळाली आणि ती म्हणजे मुबलक वेळ. मला ते पुस्तक वाचायला खूप आवडतं पण काय करू वेळच मिळत नाही. असे खूपदा आपण जवळ जवळ सगळ्यांच्याच तोंडून ऐकतो. ऐकलही असेल. पण गेल्या वर्षभरापासून ही सबब आता देऊन चालणार नाही हे मात्र खर. या lockdown मूळे आपल्या सगळ्यांना me Time खूप मिळाला. त्याचा कित्येकांनी योग्य वापर केला, तर काहींनी फक्त घड्याळाकडे पाहत दिवस घातले. आपल्या आवडीनिवडी काळाच्या ओघात , किंवा जबाबदाऱ्या सांभाळत कुठे राहून गेल्या कळालच नाही. अशाच आपल्या आवडी निवडी , राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा सुरू करायला काय हरकत आहे. नाही का ?? उगाच सकाळ संध्याकाळ टीव्ही समोर बसून इतके रुग्ण वाढले , अस झाल तस झालं ऐकत बसण्यात काय अर्थ आहे ?? त्यामुळे आपला फोकस थोडा स्वतःकडे आता वळवू आणि lockdown चे पालन करत स्वतःमध्ये बदल घडवू, थोड शिकू, थोड वेगळं जगू , आपल्यातल्या सकारात्मकतेला आपल्या चांगल्या गोष्टी शिकण्यास सुरुवात करायल लावू,  तर मग पाहुयात तरी आपण आपल्या या इतक्या मिळालेल्या वेळेचा उपयोग तरी कसा करायचा ..



१. वाचन 


रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपली ही सुंदर आवड बहुदा विसरूनच गेलो होतो. रोज ठरवत होतो की उद्यापासून सुरुवात करू , आज कमीत कमी दहा तरी पाने वाचू . पण नेमक आपल्या व्यस्त कामात आपल्याला ते कधी जमलंच नाही. धूळखात पडून राहिलेलं ते पुस्तक हातात घ्यायची हीच खरी वेळ आहे नाही का ? गेल्या दीड वर्षात किती निवांत वेळ मिळाला असेल ?? पुस्तक वाचत वाचत आपल्यातल्या चांगल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करायचं. घरात lockdown मध्ये बसून सार जग या पुस्तकाच्या दुनियेत फिरून यायचं. एखाद्या पुस्तकातील , कादंबरी मधील पात्राशी रोज बोलायचं. भेटायचं आणि त्यात रमून जायचं. मग ते पुस्तक संपलं की पुन्हा नवीन पुस्तक , नवीन पात्र नवे जग . मग बघा तुमचा हा वेळ किती सुंदर जाईल. तुम्ही कादंबरी वाचू शकता, ज्ञानवर्धक पुस्तक वाचू शकता. मग बघा जेव्हा तुम्ही या कोरोना नंतरच्या जगात याल तेव्हा हे जग नक्कीच तुम्हाला वेगळं दिसेल. 

२. कला.


सर्वात सुंदर विषय म्हणजे कला. विविध कला, चित्रकला , पाककला, गायनकला, आणि भरपूर काही. राहून गेलं होत ना हे शिकायचं? मग वेळ कशाला उगाच वाया जाऊ द्यायचा. जी कला आपली शिकायची राहू गेली होती तिला अवगत करायला करा सुरुवात. तुम्हाला चविष्ट पदार्थ बनवायची इच्छा आहे तर शिका पाककला, हल्ली यूट्यूब , फेसबुक अश्या कित्येक साईट्स आहेत ज्यावर तुम्हाला जगभरातील कित्येक वेगवेगळे पदार्थ करण्याची रेसिपी दाखवली जाते. त्या रेसिपी शिकण्याचा प्रयत्न करा. चित्रकलेची आवड आहे तर घ्या ब्रश हातात आणि सुरुवात करा, गायन शिकायचं आहे तर रियाज करायला सुरुवात करा, सध्या ऑनलाईन गायन क्लासेस सुद्धा सुरू झाले आहेत ते जॉईन करा. धूळ खात पडलेली गिटार पुन्हा वाजवायला सुरुवात करा. आपली आवड जपा , बघा मन प्रसन्न होईल.

३. स्वतःमध्ये बदल घडवा,


आयुष्यात कित्येक लोकांना स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा शरीर थकून गेलेलं असतं. विविध आजारांनी घर केलेलं असतं. पण ते होत कशामुळे तर आपण कधीच आपल्याला न दिलेल्या वेळामुळे. पोट खूप सुटलय, तर ठरवा की या lockdown मध्ये मी ते कमी करणारच, एखाद व्यसन जडलय तर त्यापासून मी माझी मुक्तता करणारच, असा निर्धार करा, खरतर lockdown मध्ये दारूच्या दुकानासमोर झालेली गर्दी ही दुर्दैवी होती. कारण हीच ती वेळ होती शरीराला या रोगापासून अजून मजबूत बनवायची. पण आपण धावलो ते व्यसनाकडे. असो पण अशा वाईट गोष्टी बदलण्याची, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची हीच ती वेळ आहे. कारण ऑक्सिजन आज महाग झाला आहे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडावा, खूप दिवसांपासून व्यायाम करण्याची इच्छा होती तर त्याची सुरुवात करा. बघा नक्कीच आपल्यात बदल घडेल आणि तो आपल्याच फायद्याचा असेल.

४. लिखाण


खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे , पण क्लासेस, exam's, ऑफिस यापैकी कोणत्याही कारणामुळे वही आणि पेन हातात घाय्याला वेळ कुठे होता ?? नाही का ? पण आता खूप वेळ मिळाला आहे आणि म्हणावी इतकी शांतता सुद्धा आहे, ना रस्ते वाहतायत ना कोणी बाहेर आहे, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार एवढंच आहे सोबत, मग घ्या हातात वही आणि पेन आणि करा सुरुवात लिहायला. एखादी कविता लिहा , मनातले विचार लिहा , ऑनलाइन ब्लॉग्ज लिहा , लोकांशी संवाद साधा , पण व्यक्त व्हा जी कित्येक दिवसांची इच्छा अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करा. अगदी मनसोक्त लिहा. 

५. बागकाम


घराच्या अंगणात एक सुंदर बाग असायला पाहिजे होती अशी तुमची इच्छा होतेच ना ?? पण सकाळी लवकर जायचं आणि रात्री उशिरा यायचं यामुळे ते कधी जमलंच नाही. नकळत त्या जास्वंदीच्या झाडाला आलेलं फुल सुद्धा आपण पाहिलं नाही. मग आता ही वेळ एखादी सुंदर बाग तयार करायला घालवण्यात काय वाईट आहे !!  बागकाम करण्या इतकं सुंदर दुसरं कुठलच काम नाही असं मला वाटतं, कारण तिथे हळूच गुलाबाच फुल उमलताना पाहण्यात वेगळीच मजा असते. आणि जेव्हा तुम्ही आज बाग सजवाल आणि पुन्हा एकदा हे जग पळू लागल्यावर आणि त्यात तुम्हीही धावू लागल्यावर जेव्हा केव्हा थकून घरी याल , तेव्हा त्या बागेतील सुंदर उमलेली फुले त्याच्या सुगंधाने तुम्हाला नक्कीच आनंद देतील. मग करा सुरुवात एक सुंदर बाग तयार करायला. 

६. नामजप , अध्यात्मिक विकास,


घाईगडबडीत देवाला पाय पडून जाताना फक्त माझ्या सोबत रहा एवढंच म्हणणं असतं आपलं. कधी वाटतं ना की नामजप करत आपण तल्लीन होऊन जावं, हा अध्यात्मिक ग्रंथ त्याच पठण करावं, मग वेळ ती कशाची पहायची अध्यात्माच्या सावलीत माणूस नक्कीच सकारात्मक होतो. त्याच्यातील राग, लोभ, द्वेष निघून जातो. माणूस संयमी आणि शांत होतो. त्याच्यातील त्याला शोधण्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे अध्यात्म. तुम्हाला खूप दिवस झाले इच्छा होती दासबोध वाचण्याची ,मग करा सुरुवात, ज्ञानेश्वरी पठण करण्याची हीच ती योग्य वेळ आहे . कारण आजूबाजूला इतक्या निगेटिव्ह गोष्टी चालत असताना अध्यात्माच्या सानिध्यात जाणं म्हणजे स्वतःला गुरू चरणी नतमस्तक केल्या सारखं आहे. तुम्हाला अध्यात्माची आवड असेल तर ती आवड नक्की जोपासा देवाच्या सानिध्यात तुम्ही कधीच एकटे पडणारा नाहीत. 

७. जुन्या आठवणीतले खेळ,


घरात सगळे एकत्र असताना कशाला हवा मोबाईल ?? द्या तो ठेवून बाजूला, करा टीव्ही बंद आणि आपल्या घरच्या लोकांसोबत मजा करा मिळालेला हा वेळ. कित्येक दिवस वडलांशी मनसोक्त बोलणंच झालं नव्हतं मग बोला त्यांना , मुलांना वेळच देता येत नव्हता , मग द्या त्यांना वेळ, आपण नेहमी म्हणतो की आमचा काळ खूप मस्त होता , मग तोच काळ पुन्हा आणा आपल्या घरात, तासनतास गप्पा मारा , गाण्याच्या भेंड्या खेळा, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे कित्येक खेळ आहेत जे आपण आपल्या घरच्या सोबत खेळू शकतो, सांगा आपल्या मुलांना की आम्ही या मोबाईल शिवाय आनंदी होतो. कारण आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो.

अश्या कित्येक गोष्टी आहेत ज्या आपण या lockdown मध्ये करू शकतो, कारण आपण घरी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, सरकार , प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतं आहेत, आणि त्यात आपला सहभाग १००% असायला हवा. पण नुसतं घरात बसूनही चालणार नाही हेही तितकंच खरं आहे. कारण नक्कीच यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच अगदी मला कोंडून ठेवलं आहे ही भावना आपल्या मनात येता कामा नये. म्हणूनच आपण आपला वेळ हा या सगळ्या गोष्टी करण्यात घालवू शकतो.

उद्या सगळं नीट झाल्यावर मागे वळून पाहताना आपण आपल्या मनाला म्हणायला नको की हे वर्ष माझे वाया गेले. तर अस वाटायला हवं की मी यामध्ये खूप काही शिकलो आणि या वेळेनेही आम्हा सर्वांना त्याची किंमत सांगितली.

तर मित्रांनो तुम्हीही या वेळेचा उपयोग कशाप्रकारे केला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा!! धन्यवाद.

✍️© योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...