मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ जुलै || Dinvishesh 18 July ||




जन्म

१. प्रताप सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज (१८४८)
२. प्रियांका चोप्रा ,भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
३. जयेंद्र सरस्वती, भारतीय धर्मगुरू, ६९वे शंकराचार्य (१९३५)
४. रॉबर्ट हूक, इंग्लिश वैज्ञानिक (१६३५)
५. बी. व्ही. रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९३१)
६. जयाचामा राजेंद्र वाडियार, म्हैसूरचे महाराज(१९१९)
७. भूमी पेडणेकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८९)
८. हेंड्रिक लॉरेन्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५३)
९. विडकुन क्विस्लिंग, नॉर्वेचे पंतप्रधान (१८८७)
१०. सुखविंदर सिंग, भारतीय गायक (१९७१)
११. स्म्रिती मांधना, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९६)
१२. मोहम्मद दाऊद खान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९०९)
१३. जो कॉल्स, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१९१४)
१४. ईशान किशन , भारतीय क्रिकेटपटू (१९९८)
१५. बिष्णु दे, भारतीय बंगाली कवी लेखक (१९०९)
१६. मेहंदी हसन, पाकिस्तानी गायक (१९२७)
१७. कादंबिनी गांगुली, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१८६१)
१८. नेल्सन मंडेला, नोबेल पारितोषक विजेते साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष(१९१८)
१९. संजय जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९७०)
२०. राजेश कोटेचा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६३)
२१. अडोल्फ ओगी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
२२. हर्टमुट मिशेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४८)
२३. मार्टिन एस्पिनो, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९६३)
२४. विन डिझेल, हॉलिवुड चित्रपट अभिनेते (१९६७)


मृत्यू

१. राजेश खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेते ,पहिले सुपरस्टार (२०१२)
२. वाली, भारतीय चित्रपट अभिनेते, गीतकार, कवी (२०१३)
३. जेन ऑस्टेन, इंग्लिश लेखिका (१८१७)
४. कॉर्णेईल्ल हेमंस, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६८)
५. तुकाराम भाऊराव साठे तथा अण्णाभाऊ साठे, भारतीय समाजसुधारक ,लेखक (१९६९)
६. पद्मिनीराजे माधवराव, सांगलीच्या राजमाता (२००१)
७. डॉ. मुनिस रझा, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू (१९९४)
८. यून बॉसैन, साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)
९. जतिन कणाकिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
१०. एस. व्ही. रंगा राव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)

घटना

१. मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५७)
२. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले. (१९१४)
३. गुप्त मतदान पद्धत वापरण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात करण्यात आली. (१८५२)
४. उरुग्वेने आपले संविधान स्वीकारले. (१९५१)
५. रोहिणी १ हे भारतीय अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. (१९८०)
६. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९३)
७. सीरिया मध्ये झालेल्या दंगलीत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. तूर्किने आपल्या देशातील दोन वर्ष लागू केलेली आणीबाणी मागे घेतली. (२०१८)

महत्व

१. World Listening Day
२. Nelson Mandela International Day

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...