मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ नोव्हेंबर || Dinvishesh 1 November ||




जन्म

१. पद्मिनी कोल्हापुरे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६५)
२. बलराम दास टंडन, छत्तीसगडचे राज्यपाल (१९२७)
३. टिस्का चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
४. स्पेंसर पर्सेवल, ब्रिटिश पंतप्रधान (१७६२)
५. अरुण कोलटकर, भारतीय कवी ,लेखक (१९३२)
६. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (१९४५)
७. पुरुषोत्तम श्रीपत काळे, भारतीय चित्रकार , नेपथ्यकार (१८८८)
८. कार्लोस सावेंद्रा लामास, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१८७८)
९. पॉल टेलेकी वोन झेक, हंगेरीचे पंतप्रधान (१८७९)
१०. नीता अंबानी, भारतीय उद्योजिका (१९६३)
११. शरद गणेश तळवलकर, भारतीय अभिनेते (१९१८)
१२. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेटपटू (१९७४)
१३. फिलीप नोएल बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८८९)
१४. सुलेमान डेमिरेल, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
१५. इंदुभूषण बॅनर्जी, भारतीय बंगाली इतिहासकार (१८९३)
१६. ऐश्वर्या राय- बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
१७. किशोर प्रधान , भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९३६)
१८. ईशान खट्टर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९५)
१९. वेदप्रकाश मलिक ,भारतीय सैन्य अधिकारी (१९३९)
२०. इलीआना डीक्रुझ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)


मृत्यू

१. अरुण पौडवाल, भारतीय संगीतकार (१९९१)
२. योगिनी जोगळेकर, भारतीय लेखिका (२००५)
३. दीनबंधू मित्र, भारतीय बंगाली नाटककार(१८७३)
४. थिओडॉर् मॉम्मसेन, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक (१९०३)
५. पियट्रो बदोग्ली, इटलीचे पंतप्रधान (१९५६)
६. जॉर्गिओस पापांद्रेऊ, ग्रीसचे पंतप्रधान (१९६८)
७. बिभुतीभूषण बंदोपाध्याय, भारतीय लेखक (१९५०)
८. कॉम्रेड दत्ता देशमुख, भारतीय कामगार नेते (१९९४)
९. गोविंदस्वामी आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार (१९८८)
१०. सेवेरो ओकोआ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
११. जे. आर. जयवर्धने, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)


घटना

१. भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. (१९५६)
२. केरळ राज्याची स्थापना झाली. (१९५६)
३. ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४५)
४. युरोपियन युनियनची स्थापना झाली. (१९९३)
५. मैसूर राज्याचे नाव बदलण्यात आले, कर्नाटक असे नवे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
६. सर्बियाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (२०००)
७. कन्याकुमारी जिल्हा केरळ मधून तामिळनाडू मध्ये हस्तांतरित करण्यात आला. (१९५६)
८. पंजाब राज्याची पंजाब आणि हरियाणा अशी विभागणी करण्यात आली. (१९६६)
९. लिस्बन येथे झालेल्या भूकंपात ५०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१७५५)
१०. जॉन अॅडम्स हे व्हाईट हाऊसमध्ये राहणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. (१८००)
११. फुलगेन्सिओ बातिस्टा हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५४)
१२. कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. (१९५६)
१३. योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००५)
१४. मिनिकॉय , अग्निदीव, लखदीप बेटांचे लक्षद्वीप असे नाव ठेवण्यात आले. (१९७३)
१५. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली, कुर्णुल त्याची राजधानी झाली. (१९५६)
१६. अमेरिकेत पहिल्यांदाच हवामान खात्याने हवामान अंदाज सांगितला. (१८७०)


महत्व

१. World Vegan Day
२. World Scented Candle Day

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...