मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग २ || Marathi Katha ||




भाग २

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली.
"काय हे वागणं समीर ??"
समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला.  तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. 
"दारू पिऊन आलायस समीर ??"
"हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. 
"बस एवढंच राहील होत आता !! "
"मग काय करू मी आता ?? तू सांग मी काय करू ??" समीर मोठ्या आवाजात बोलला.
समीर चा आवाज ऐकून आई बाबा आपल्या खोलीतून बाहेर आले. बाबांना काय घडतंय हे कळायला वेळ लागला नाही. ते लगेच समीरकडे जात म्हणाले,
"समीर दारू पिऊन आलायस !! लाज कशी वाटत नाही तुला !!  "
"कसली लाज बाबा ?? लाज तर या तुमच्या सुनेला वाटायला हवी ना ?? "
"काय बोलतोयस समीर ?? शुद्धीवर आहेस का तू ?" मध्येच आई समीरला म्हणाली. 
"कशाला राहू शुद्धीवर मी ?? सांग ना ?? मी बाप होणार आहे हे कळूनही मला त्याचा आनंद न होता दुःख होत असेल तर काय करू मी ??"
"काय ?? म्हणजे शीतल ?"
"हो आई मला दिवस गेलेत !!"
" पण मला मुल नकोय !! मला अबोर्शन करायचं आहे !! हे पण सांग !!" 
"समीर !!" शीतल समीरकडे पाहत म्हणाली. 
"सूनबाई काय ऐकतोय मी !! " मध्येच बाबा बोलले. 
"हो बाबा !! मला मुल नकोय !! "
"पण का ??"
"कारण मला यात पडायचं नाहीये !! चूल आणि मूल एवढच करायचं नाहीये मला!! मला मोठं व्हायचं !! काहीतरी करून दाखवायचं आहे !!"
"हो पण तुझं आईपण  यामध्ये येथच कुठे ??" बाबा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले. 
"पण मी यामध्ये गुरफटून जाईल !!"
"आम्ही आहोतच ना शीतल !! तुझ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ !! आमच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्याला आम्ही सांभाळू !! मग तर झालं सगळं !!"
शीतल शांत झाली. समीर बाजूला खुर्चीवर बसून होता त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. 
"मी विचार करेन आई बाबा !!" शीतल एवढं बोलून आपल्या खोलीत समीरला सावरत घेवून गेली. 

रात्रभर तिच्या डोक्यात फक्त तोच विषय होता. मुलाला जन्म देणं एवढंच तर मला करायचं आहे. नंतर त्याची काळजी घ्यायला आई बाबा , समीर आहेतच .पण मला मात्र ते जवळही नको. मी आणि माझं करिअर यामध्ये त्याची लुडबुड मी काही खपवून घेणार नाही. उद्या काही वाटलच तर समीरकडे सोपवून मी मोकळी होईल. मग समीर जाणो आणि ते आई बाबा. आणि जास्तच बोलले मला तर सरळ म्हणेन मी मुलाचा हट्ट तुमचा होता त्यामुळे त्याला सांभाळायची जबाबदारी तुमची. ठरलं तर मग , आणि असंही आता abortion हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागेल कारण उद्या सकाळी माझ्या आईला माझ्या pregnancy बद्दल सासूबाई सांगतीलच. आणि असलं काही बोलले तर आई आणि बाबा एक गोष्ट माझी ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे आता या सर्वांचं ऐकेन मी आणि ऐकदा का मुल झालं की मग यांना माझं ऐकावं लागेल. 

पाहता पाहता सकाळ झाली. समीर आणि शीतलच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात वाजवत होत. त्या आवाजाने शीतल जागी झाली. दरवाजा उघडताच समोर सासूबाईंना पाहून चकित झाली. 
"आई !! तुम्ही ??"
"घे !! तुझ्यासाठी नाष्टा घेऊन आली आहे मी !! आता तू एकटी नाहियेस !! त्या बाळाची काळजी सुद्धा घ्यावी लागेल ना आता !! आता फक्त तू नाहीस !! तुम्ही आहात !! कळलं का ??"
शीतल काहीच न बोलता नाष्टा करू लागली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली.
" एवढ्या सकाळी कोण आल आता ??" शीतल सासुबाईंकडे पाहत म्हणाली. 
"थांब बघते मी !!"
दरवाजा उघडताच शीतलला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचे आई बाबा समोर दिसताच ती पटकन जागेवरून उठली. 
"आई !! " शीतलने आईला पाहून मिठीच मारली. 
"तुम्ही दोघे एवढ्या सकाळी इथे ??"
"अग तुझ्या सासूबाईंनी सकाळीच फोन करून आम्हाला आनंदाची बातमी सांगितली. मग म्हटलं कशाला फोन करा , तासाभराचा रस्ता आहे भेटायला यावं !! "
शीतल सासूबाईकडे पाहू लागली.
"मीच बोलावलं आहे त्यांना !!" 
शीतल त्या तिघांकडे पाहत राहिली. लांबुनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत मनातच विचार करत होती.
"काय एवढं आनंदून जायचं काय कळतं नाहीये मला !! या समीरने सगळा घोळ घालून ठेवलाय नाहीतर आज abortion करून मोकळी झाली असते मी!!! पण आता हा विचार जरी केला तर हे सगळे मला काय रागावतील !! विचारच करवत नाही !!! शीतल बाई व्हा तयार पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी !! "

"शीतल !!  शीतल !! "
शीतल भानावर येत समोर पाहू लागली. समोर सासूबाई तिला हाक मारत होती.
"हो आई !! जा समीरला बाहेर ये म्हणावं !! "
शीतल खोलीत गेली. समीर अजूनही झोपलेला असतो. त्याला जोरजोरात आवाज देत ती उठवू लागली. 

"समीर !! ये समीर !! उठ !! उठ ना!! उठ बघ तुझ्या प्रताप बाहेर जाऊन !! "
समीर हळू हळू जागा झाला. डोळे चोळत तो विचारू लागला.
"काय झालं आता ??"
"काय झालं !!! सांगते ना !! तू जो काल दारू पिऊन गोंधळ घातलाय ना !! त्याचे परिणाम मला आता पुढचे किती दिवस सहन करावे लागतील माहितेय तुला??"
"काय म्हणतेय तू !! कसला गोंधळ ??"
"काल दारू पिऊन का आलास ते सांग मला पहिले ??"
"का म्हणजे माझी मर्जी !!"
"हो ना !! मग माझ्या मर्जी विरूध्द आई बाबांना माझ्या pregnancy बद्दल कशाला बोललास तू ??"
"मला काही आठवत नाही !! "
"जा बाहेर !! बघ बाहेर पार्टी करतायत माझ्या pregnancy ची !! त्यात माझे आई बाबा सुद्धा सामील झाले!! जा !!"
"क्या बात है !! आता तर मला त्या पार्टीत सहभागी झालच पाहिजे !! क्या बात है !!"
समीर मिश्किल हास्य हरकत शीतलकडे पाहत खोलीच्या बाहेर आला. पाहतो तर त्याचे आई बाबा सासू सासरे सगळे मजेत होते. शीतलला मुल होणार हे ऐकून शीतल सोडून बाकी सारे खुश होते. पाहता पाहता तोही त्यांच्यात सामील झाला.

शीतल लांबून हे सारं फक्त पाहत होती.

क्रमशः 

वाचा पुढील भाग : आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...