मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||




भाग ३

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही. 
" थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!"
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
"बोला ना बाबा !!
"डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं."
"बाबा ते ! मी .. मी!! "
"काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !!  अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक  माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! "
"पण बाबा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही !! माझ्या आयुष्यात हा असा अचानक कोणता खड्डा येईल असं मला कधी वाटलं ही नव्हतं !! "
"खड्डा ?? आयुष्यातल्या एवढ्या सुंदर गोष्टीला तू खड्डा म्हणतेय!!! त्यांना विचार शीतल दुःख म्हणजे काय असतं जे वर्षानुवर्षे आपल्याला मुल व्हावं !! तिन आई व्हावं, त्याने बाबा व्हावं म्हणून वाट पाहतात !! खूप सुंदर गोष्ट आहे ही बाळा !! "
"बाबा !! पण माझ्या करिअरच काय ?? "
" कित्येक स्त्रिया आज आपला संसार सांभाळून करतातच ना करिअर !!"
शीतल गप्प राहिली तिला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. बाबा मात्र तिला बोलत राहिले.
"डॉ पाठक माझे चांगले मित्र आहेत म्हणून मला हे कळलं !! "
"चुकले बाबा !!"
"तू माझी माफी मागावी यासाठी मी बोलत नाहीये हे !! तू आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बोलतोय मी !! तू एकुलती एक मुलगी आमची , तुझं चांगलं व्हावं एवढच मला वाटत !! बरं चल आता सगळ्यांना बोल तिथे जाऊन !!"

शीतल आणि तिचे बाबा पुन्हा सर्वात येऊन बसले. शीतल हळुच समीर जवळ येऊन बसली. तिच्यातील बदल समीरला लगेच कळाला. ते छोटे कुटुंब कित्येक वेळ गप्पा मारत बसले. शीतल आता आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ लागली. समीर ,सासूबाई ,सासरे सारे तिला पाहिजे ते हवं ते देऊ लागले. त्या सुखी संसारात कोणीतरी नवीन येणार या आनंदाने ते सारे खूष होऊ लागले. आज्जी आजोबा आपल्या नातवासाठी नाव शोधू लागले. समीर आता पहिल्यापेक्षा शीतलची जास्त काळजी घेऊ लागला. समीरला आता दुसरे जग जणू दिसेनासे झाले. 

सहा महिन्या नंतर,

पाहता पाहता दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पोटातले बाळ आता हळूहळू आकार घेऊ लागले.आणि अखेर या जगात येण्यासाठी जणू तेही आतुर झाले. शीतल बाळंतपणासाठी डॉक्टर पाठक यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाली. 

"समीर ,पाहता पाहता दिवस कसे गेले कळल नाही !!"
"होना !!" समीर शीतलच्या जवळ बसून बोलत होता. 
"डॉक्टर पाठकानी तारीख उद्याची दिली आहे !! उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये अजून कोणीतरी असेल !! आपलं " समीर बोलत राहिला.
" सगळं कसं भरून जाईल हे घर !! होना !! आणि मग आपण दोघं मिळून त्याला मोठ करू , त्याच्यावर संस्कार करू , त्याला बोलायला शिकवू !!"
"आपण ??"शीतल मध्येच बोलली.
"हो मग !! अजून कोण ??"
"तू !! मी फक्त जन्म देणार बाळाला !! बाकी सांभाळायचं वैगेरे तुझ्याकडे !!"
" बरं बरं !! करिअर ना !! " 
"हो !!" 

शीतल आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. शीतल नकळत येणाऱ्या बाळासाठी आपल्या मनाची समजूत काढत होती. एका बाजूने तिला मुक्त फिरायच होत, जिथे तिला आपल्या शिवाय दुसरं कोणी नको होत पण आता दुसर मन तिच्यातील आईपण जागे करत होत. पण नकळत ती त्याला गप्प करत होती. त्या आईपणाला नाकारत होती. 

"समीर !!" मध्यरात्री शीतल जोरात ओरडली. तिला असह्य होणाऱ्या कळा सुरू झाल्या होत्या. 
शीतलच्या आवाजाने समीर जागा झाला. त्याला शीतलला काय होतंय हे कळायला वेळ लागला नाही. तो पटकन जागेवरून उठला बाहेर आई बाबा , शीतलचे आई बाबा यांना शीतलला त्रास सुरू झाल्याचे सांगत तो थेट नर्सकडे गेला. हॉस्पिटल स्टाफ लगेच धावत शीतलला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. सारे बाहेर बसून शीतल आणि मुलाच्या सुखरूप असण्याची प्रार्थना करू लागली. 

कित्येक वेळ शीतल त्या असह्य वेदना सहन करत होती. आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार आहे यासाठी सार काही सहन करत होती. त्या असह्य वेदना आणि बाजूला तिला धीर देण्यासाठी थांबलेला समीर तिला क्षणभर खूप काही सांगत होते. शीतल तू एकटी नाहीयेस , ते येणारं बाळही तुला नकळत बोलत असेल ना !!, शीतलला जणू सगळं जग आपल्या जवळ थांबलं आहे असेच वाटू लागले होते. 


आणि अचानक त्या लहान बाळाचे रडू ऐकू आले. शीतलने त्या बाळाकडे पाहीले आणि शांत झाली. त्या बाळाला पाहताच ती जणू त्या वेदना विसरून गेली. समीर तिच्याकडे हसून पाहू लागला. शीतलही समीरकडे पाहून हसली. त्या साऱ्या वेदना विसरू ती हसली. समीरने बाळाकडे पाहिले. तो धावत बाहेर आला आणि सर्वांना सांगू लागला. आई बाबा मुलगी झाली !! मी बाबा झाली.!! समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई बाबा एकमेकांना आनंदाने सांगू लागले. शीतलचे आई बाबा समीरच्या या आनंदाला पाहून अजून आनंदून जाऊ लागले. 

"समीर !! " डॉक्टर पाठकानी समीरला बोलावले. 
"बोला डॉक्टर !!" 
"थोड्याच वेळात शीतलला तिच्या रूममध्ये घेऊन येतील तुम्ही तिथेच वाट पाहिली तरी चालेल !!"
"ओके डॉक्टर !!"

समीर , आई बाबा , शीतलच आई बाबा शीतल आणि बाळ दोघांचीही आतुरतेने वाट पाहू लागले. 

क्रमशः 

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...