मुख्य सामग्रीवर वगळा

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||


भाग ११

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,
"कोण ??"
"नमस्कार काका , मी सदाशिव , समीर दादा आहेत का ?? मी गाडी घेऊन आलोय!!"
"हो आहेत या !! पुण्याला जाण्यासाठीच एवढी तयारी चालू आहे !! बसा ईथे !! एक तासाभरात निघुयात आपण !! "
"ठीक आहे काक !! " सदाशिव शेजारीच ठेवलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला.

घरातली सगळी आवरा आवर झाल्यानंतर समीर काही राहील तर नाहीना पाहायला खोलीत आला, शीतल तिथे आधीच आवरत होती. समीरला पाहून ती थोडी गोंधळली, अचानक आपल्या जागेवर बसून राहिली. ती काहीतरी लपवते आहे हे कळायला समीरला वेळ लागला नाही.
"शीतल !! झालं ना तुझं आवरून??"
"हो !! झालंच आहे !! " शीतल स्वतःला सावरत म्हणाली.
"काय ग ?? बरी आहेस ना ??"
समीर असे म्हणताच शीतलने समीरला मिठी मारली. 
"ये शीतल !! काय झालंय सांग तरी ??"
"मला तुझ्याशिवाय नाही मन लागणार तिथे !! मी दाखवत नाही पण मी नाही राहू शकत समीर तुझ्याशिवाय !! "
"होका !! मग नको जाऊस !!"
"हो नाही जात मी !! सांगून टाकते बाबांना नको मला काही !! मला फक्त तू हवा आहेस !! तुझ्या सोबत माझं सगळं कुटुंब मला हवं आहे !!" 
शीतल खोलीतून बाहेर जाण्यासाठी निघते समीर तिला आपल्या जवळ करत बोलू लागतो.
" शीतल !! अस भावनिक नको बोलुस !! हे बघ आयुष्यात प्रत्येक रंग हे खूप महत्त्वाचे असतात, कधी प्रेम , कधी दुरावा, कधी एकांत तर कधी गर्दी.सगळं काही हवं असतं आपल्याला. म्हणूनच तर आयुष्य जगण्याची वेगळीच मजा येते. आज भलेही आपण एकमेकांपासून दूर असू , पण यामुळेच आपल्याला आपल्या बद्दलच प्रेम कळलं, नाही का ?? उद्या पुन्हा आपण एकत्र येऊ. आणि असही मी आणि तू शरीराने दूर असू पणं आपलं मन ,ते आहेच की अगदी एकमेकांत गुंतलेलं, आहे ना ??" समीर थोड हसत म्हणाला.
शीतल गालातल्या गालात हसत समीरकडे पाहत राहिली. थोड्या वेळाने बाबांनी बाहेरून समीरला हाक मारली. समीर पटकन बाहेर गेला. समोर सदाशिवला पाहून म्हणाला,

"सदा !! अरे कधी आलास तू ?? "
"आत्ताचं आलो दादा !! "
"बरं !! चला सगळं सामान ठेवूयात गाडीत आणि निघुयात!!"

सगळं सामान गाडीत ठेवल्यानंतर समीर ,शीतल ,आई बाबा आणि त्रिशा पुण्याला निघाले. गाडी सुसाट वेगाने पुण्याकडे निघाली. गाडीत बसलेली शीतल खिडकीतून पाहता पाहता नकळत आपल्या विचारात गुंग झाली,

" सगळं कसं क्षणात नीट झालं ना ?? बाबांच्या एका निर्णयाने माझ्यातला आणि समीर मधला दुरावा , कडवटपणा क्षणात नाहीसा झाला. यापूर्वीच मी हा विषय बाबांना बोलले असते तर आजपर्यंत हे सगळं घडलच नसतं. पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते तसच काहीस झालंय माझं. पहिल्यांदा उगाच आई न होण्याचा निर्णय , पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि मी आई झाले. पुन्हा त्रिशाला एकटं सोडून यायचा निर्णय.  सगळं नकळत घडतं गेल. पण असो, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं म्हणायचं . नाहीतर मला कस कळलं असतं की हे सगळे माझ्यावर किती प्रेम करतात ते. पण आता यापुढे अजिबात अस करणार नाही मी !! आई बाबा , समीर यांना विश्वासात घेऊनच आता कोणताही निर्णय घेणार आहे. " 
शीतल त्रिशाच्या आवाजाने भाणावर आली. समोर पाहते तर बाबा आणि त्रिशा खेळण्यात दंग झाले होते, बाबा जणू लहान मुलासारखे तिच्यासोबत खेळत होते. 

संध्याकाळी गाडी पुण्याला पोहचली. सगळे सामान फ्लॅटवर ठेवून आवरा आवर करुन सगळे दमले. बाबा आणि समीर उद्या गावी परत जायचं ठरलं. शीतल ऑफिसला निघाली की ते निघणार होते. रात्री सगळे केव्हा झोपी गेले कळलही नाही.

सकाळची सुरुवात त्या एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये त्रिशाच्या दंगामस्तीने झाली. आई सगळ्या फ्लॅट मध्ये फिरून पाहणी करत होती.  शेजारी कोण आहेत त्यांच्याशी बोलत होती.  शीतलला आज त्या फ्लॅट मध्ये राहावंसं वाटतं होत. शीतल त्या गडबडीतही ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. बाबा समीरही परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी तयार होत होते. आई सर्वांसाठी नाष्टा तयार करत होती. तिला या सगळ्या नवीन गोष्टींना क्षणात जुळवून घ्यायचं होत. 

"समीर !! " शीतल सगळं आवरून बाहेर येत हाक मारू लागली.
"हा शीतल ?? बोल !!"
"अरे काही नाही !! मी निघते आता !! तुम्ही रहा ना आजुन दोन तीन दिवस , आईनाही तेवढीच सोबत होईल !! अगदीच अचानक सगळा बदल मग त्यांना करमणार नाही इथे !!"
"शीतल !! तू नको काळजी करुस !! माझी नात आहेना सोबत माझ्या !! मग मला काही वाटणार नाही !!" आई मध्येच हसत म्हणाली.
"आणि शीतल माझी आजचीच रजा आहे !! मलाही उद्या ऑफिस जॉईन करायचं आहे !!" समीर त्रिशाला कडेवर घेत म्हणाला.
"आता मला रहा नको बर म्हणुस !! नाहीतर माझा पाय नाही निघणार इथून !!" बाबा शीतलला हसत म्हणाले.
"मग नकाना जाऊ बाबा !!"
"समीर सोबत जाव लागेल शीतल !! " बाबा आपले अश्रू लपवत म्हणाले.
"ठीक आहे बाबा !! मी येऊ आता !! तुम्ही निवांत निघा गावी !!"
"हो शीतल !!" 

शीतल ऑफीसला जायला निघाली. दारात क्षणभर अडखळली. मागून नकळत तिला एक आवाज आला,
"आई !!"
समीर ,आई , बाबा सगळे आश्चर्याने पाहू लागले.
"आऽ ... ई !!! " त्रिशा अडखळत , बोबड बोलत शीतलकडे पाहून बोलत होती. जणू तिला बोलवत होती. 
"आऽ.... ई !!!" त्रिशा पुन्हा पुन्हा अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती.
 
शीतल क्षणभर जागेवर तशीच उभा राहिली. तिला काय बोलावं काहीच कळलं नाही. क्षणात ती धावत त्रिशाकडे आली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जणू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिने तिला आपल्या जवळ घेतलं. तिचे कित्येक मुके घेतले. समीर , बाबा ,आई सगळ्यांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. सगळे आनंदाने त्या दोघींना पाहू लागले.
"म्हण !! पुन्हा म्हण त्रिशा !! माझे कान या शब्दासाठी आसुसले आहेत !! "
त्रिशा पुन्हा पुन्हा शीतलकडे पाहून आई म्हणत होती. जणू ती तिला सोडायलाच तयार नव्हती. 
"समीर तू ऐकलस ना !! आपली त्रिशा मला आई म्हणाली !! आई तुम्ही पणं ऐकलंय ना !! "
"हो शीतल !! हो !!"  आईनी शीतलला जोरात मिठी मारली. 

सगळे या प्रसंगाने आनंदून गेले. शीतल आनंदाने आपल्या ऑफिसला निघाली. बाबा आणि समीर आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा परत एकत्र येण्यासाठी. 

* समाप्त *

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...