मुख्य सामग्रीवर वगळा

वर्तुळ || कथा भाग १ || मराठी कथा ||




टीप : वर्तुळ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून, याचा कोणत्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेत उल्लेख केलेले नाव, स्थळ, जात, धर्म, पंथ, विचार , घटना हे सर्व लेखकांच्या विचारांतून लिहिलेले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.


भाग १

मोबाईल 

" दहावीत उत्तम मार्क मिळालेल्या सर्व विद्यार्थांचे मी मनापासून अभिनंदन करते. तुमच्या पुढे आता आयुष्याचे कित्येक मार्ग खुले झाले आहेत, तुमच्यातील कोणी पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेईल ,कोणी कला ,तर कोणी कॉमर्स या शाखेत जाईल पण विद्यार्थ्यांनो तुमचं मूळ मात्र एकच राहील आणि ती म्हणजे आपली शाळा. आणि या शाळेचं नाव मोठं करण्याचं काम आता तुम्हा सर्वांवर आहे , सुंदर पुस्तक वाचा , अभ्यास करा , शिका आणि मोठे व्हा. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. " सर्वत्र टाळ्यांचा आवाज झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या पाहुण्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या.

"खूप खूप धन्यवाद सुनेत्रा मॅम , आपण दिलेल्या या विचारांचा नक्कीच भविष्यात विद्यार्थ्यांना सदुपयोग होईल !! " निवेदिका क्षणभर थांबून पुन्हा म्हणाल्या, "आणि आता दहावीच्या परीक्षेत आपल्या शाळेतून पहिला , दुसरा आणि तिसरा आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते." आणि त्यांनी विद्यार्थ्यांची नावे घेण्यास सुरुवात केली.

"आपल्या प्रशालेतून दहावीच्या परीक्षेत तिसरी आलेली आहे, सीमा करंजकर !!" निवेदिका अगदी चढ्या आवाजात बोलल्या.
विद्यार्थ्याच्या रांगेतून एक चुणचुणीत मुलगी मंचावर आली. प्रमुख पाहुण्यांनी तिचा सत्कार केला. ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. दुसऱ्या विद्यार्थाचे नाव घेताच त्यानेही मंचावर जाऊन सत्कार स्वीकारला.

"यावर्षी आपल्या प्रशालेत दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, आकाश देशपांडे !!" सर्वत्र टाळ्यांचा आवाज घुमला. 
समोरच्या रांगेत बसलेला एक मुलगा धावत मंचावर गेला. शिक्षकांनी त्याच तोंडभरून कौतुक केल. तो आपल्या जागेवर जाऊन बसला. सर्वांच्या नजरा कित्येकवेळ त्याच्यावरच होत्या. मागे उभ्या आई बाबांना त्याचे कौतुक वाटतं होते. 

थोड्या वेळाने सत्कार समारंभ संपला. त्या गर्दीत आकाश आपल्या हातातील पुष्पगुष्छ संभाळत शाळेतून बाहेर आला. सगळे विद्यार्थी त्याला आवर्जून बोलत होते, त्याच अभिनंदन करत होते. तेवढ्यात समोर आईला पाहून आकाश धावत तिच्याकडे गेला. आईला त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली होती. आपल्या मुलाचं एवढं यश पाहून ती भारावून गेली होती. बाबा एका कोपऱ्यात उभा राहून सगळं आनंदाने पाहत होते. 

"चल आकाश, घरी जायचं ना आता !! " आई त्याला मिठी मारत म्हणाली. 
"हो आई एक पाच मिनिट !! मित्रांना सांगतो नी निघू आपण !!" 
"बरं ठीक आहे !!" 
आई आणि बाबा कारमध्ये जाऊन बसले. ते लांबूनच आकाशकडे पाहत होते. 
"साधना आज त्याला ते गिफ्ट द्यायचं ना ??"
"तुम्हाला नाही वाटतं आपण त्या गोष्टीची जरा घाई करतोय ते !!"
" नाही ग !! उलट उशीर झालाय !! आजच्या या काळात त्याला या सगळ्यांसोबत चालायचं असेल तर त्याची गरज आहेच !!"
"ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा !! "
आई बाबा दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.

"आपण भेटू रे लवकर !! असही अकरावी म्हणजे नुसता आराम आहे !! पुन्हा आहेच बारावी !!" आकाशचा मित्र दीपक आकाशला म्हणतो. 
"पण लक्षात ठेव एकच कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचं आहे हे विसरू नकोस !!"
"एकाच कॉलेज मध्ये ?? अरे तू ९८ टक्क्यावाला आम्ही सत्तरचे !! कसा मेळ बसायचा !! "
"ते बघू आपण ! आता! येतो मी आई बाबा वाट पाहतायत !! आणि सुश्या, पश्या, विक्या आणि धोल्याला सांग परवा सगळे भेटू म्हणून !! "
"हो नक्की "

आकाश गाडीत येवून बसला. गाडी घराकडे निघाली. 
"आकाश आज तुझ्यासाठी गिफ्ट आहे बरं का ??"
"गिफ्ट माझ्यासाठी ??"
"हो!!" आई आकाशकडे पाहून बोलते. 
"काय आहे सांगा ना गिफ्ट !!"
"घरी गेल्यावर कळेलच ना तुला !!"
"तरीपण सांगा ना !!" आकाश बाबांना विनवणी करतो.
"ना बेटा !! मग गिफ्टची मजा ती काय!!"
"असही घर यायला पाचच मिनिट राहिले आहेत !!"

आकाश कारच्या मागच्या बाजूस शांत बसतो. त्याला राहून राहून मनात आपण पुन्हा त्या शाळेत जाणार नाहीत याचं वाईट वाटतं होत. तो वर्ग , ते वर्गमित्र ,ते शिक्षक आणि तो शाळेचा परिसर त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे जणू बोलवत होता. पण आता ती एक फक्त आठवण राहणार होती. त्याच्या मनात कुठेतरी. 

आकाश आपल्या शाळेच्या आठवणींत रमला होता , तो राहुन राहुन आपल्या हातातील पुष्पगुच्छ पाहत होता. 

"चला !! आलो घरी एकदाचे !! " बाबा हातातील कारची चावी टेबलावर ठेवत म्हणाले. 
तेवढ्यात आकाश भानावर आला. त्याला बाबांच्या गीफ्टची आठवण झाली. तो धावत त्यांच्याकडे गेला.
"बाबा गिफ्ट ??"
"आत्ता लगेच ??"
"हो मग !! " 
"आकाश !!" मागून आई त्याला हाक मारते. 
आकाश मागे वळून पाहतो. आईच्या हातात गिफ्टचा बॉक्स होता. आकाशने तो पाहताच खुश झाला. आईने हळूच तो त्याच्याकडे दिला. त्यावेळी त्या बॉक्समध्ये काय आहे हे पाहण्यासाठी आकाशची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याने पटकन तो बॉक्स उघडला आणि आश्चर्याने तो आईकडे बघत म्हणाला,
"मोबाईल ??"
"हो !! " आई आनंदाने म्हणाली. 
"बाबा मोबाईल " 
"हो तुझ्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !! हल्ली अस म्हणतात सगळं जग या एका मोबाईल मध्ये सामावल आहे !!"
"थॅन्क्स बाबा !!"
आई बाबा आकाशकडे फक्त पाहत होते. आकाश मोबाईल बघण्यात गुंग झाला. 

"पण !! पण !! आकाश !!" बाबा आकाशच्या हातातील मोबाईल घेत म्हणाले. 
"या मोबाइलच्या जगात तुला जे योग्य आहे , जे तुझ्या फायद्याचं आहे तेच घ्यायचं आहे हे लक्षात ठेव !! हा मोबाईल मी फक्त तुझ्या सोयीसाठी दिला आहे."
"हो बाबा !! मी लक्षात ठेवेन हे सगळं !!

एवढं बोलून आकाश मोबाईल घेऊन आपल्या खोलीत निघून गेला. आई बाबांना आज त्याच्याकडे पाहून आनंद झाला. आकाश नव्या जगात पाऊल ठेवू लागला.

क्रमशः

लेखक : योगेश खजानदार

टिप्पण्या

Trending Now

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||

रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !! दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !! पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !! चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !! चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !! गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !! कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !! स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !! सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !! धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !! सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !! शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !! झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !! कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !! कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !! कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !! कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !! कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !! कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !! बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !! घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !! बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !! धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !! तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !! होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !! कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !! गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !! माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !! बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !! प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !! अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !! अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !! काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !! कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !! होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !! दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !! कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

आजी आणि आजोबा

  टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करता...

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||

भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ?? नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !! तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !! स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !! गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ?? क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !! कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !! निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे ! रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !! रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !! सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !! वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !! विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ?? क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !! तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !! व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !! मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !! अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !! अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !! ©योगेश खजानदार •ALL RIGHTS RESERVED•

अंतर कथा

"कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कार...

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !! सखे एक मी, एक तू उरावी !! गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !! पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !! सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !! ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !! गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !! माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !! सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !! सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !! चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !! नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !! मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !! मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !! श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !! तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !! कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !! तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !! वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !! ©️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*

हरवलेल्या गावाकडे ...

  संध्याकाळच्या वेळी गावाकडच्या त्या चावडीवर म्हाताऱ्या लोकांची मस्त मैफिल बसायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या आणि एखाद दोन शिव्याही हसडल्या जायच्या. पण यातही ...

मनातलं प्रेम

"मनातलं प्रेम"    तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसेज तिचाच आला. ' अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!' त...